AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत अधिवेशन घेतल्याने कोरोना कमी होतो आणि नागपूरला वाढतो? सरकारला नोबेल द्यायला हवा; भाजपचा सरकारला चिमटा

मुंबईत अधिवेशन घेतलं की कोरोना कमी होतो आणि नागपूरमध्ये घेतलं की वाढतो. अशी कल्पना सरकारच्या सुपिक डोक्यात आली आहे. त्यामुळे राज्य सरकारला नोबेल पुरस्कार द्यायला हवा, असा चिमटा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारला काढला.

मुंबईत अधिवेशन घेतल्याने कोरोना कमी होतो आणि नागपूरला वाढतो? सरकारला नोबेल द्यायला हवा; भाजपचा सरकारला चिमटा
| Updated on: Nov 12, 2020 | 4:46 PM
Share

नागपूर : मुंबईत अधिवेशन घेतलं की कोरोना कमी होतो आणि नागपूरमध्ये घेतलं की वाढतो. अशी कल्पना सरकारच्या सुपिक डोक्यात आली आहे. त्यामुळे राज्य सरकारला नोबेल पुरस्कार द्यायला हवा, असा चिमटा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (sudhir mungantiwar) यांनी सरकारला काढला. ते नागपुरात माध्यमांशी बोलत होते. (sudhir mungantiwar slams state government on assembly winter session)

“राज्य सरकारच्या सुपिक डोक्यात कल्पना आली की मुंबईत अधिवेशन घेतलं की कोरोना कमी होतो. नागपूरमध्ये अधिवेशन घेतलं की कोरोना वाढतो. तसे असेल तर सरकारला नोबेल पुरस्कार दिला पाहिजे” असं मुनगंटीवार म्हणाले. तसेच सरकारने यावर रिसर्च पेपर केला का? असा खोचक सवालही सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारला केला.

मागील काही दिवसांपासून हिवाळी अधिवेशनावरुन विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये घमासान सुरु आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशन मुंबईत घेण्याच्या विचार ठाकरे सरकारने केला आहे. तर, अधिवेशन नियमाप्रमाणे नागपुरातच व्हावे असा पवित्रा विरोधकांचा आहे. त्यावर माजी मंत्री आणि भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी वरील भाष्य केले.

सरकारकडून विदर्भावर अन्याय

मुनगंटीवार म्हणाले, “विदर्भ वैज्ञानिक विकास महामंडळाचा कार्यकाळ एप्रिल महिन्यात संपला. मात्र अजूनही सरकारने त्याची पुनर्रचना केली नाही. हिवाळी अधिवेशन देखील मुंबईत हलविलं आहे. या सर्व गोष्टींमुळे विदर्भावर अन्याय होत आहे. हे सरकार विदर्भावर अन्याय करणारं सरकार आहे.” तसेच, निदान विदर्भवाद्यांचं नेतृत्व करणाऱ्या विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनीतरी याला विरोध करायला हवा होता; अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

दरम्यान, हिवाळी अधिवेशन मुंबईला घेण्यात येणार असलं तरी मार्च महिन्यातील अधिवेशन नागपूरमध्ये घेण्याची मागणी मुनगंटीवार यांनी केली. तर, आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूरला घेऊ, विदर्भाला मोठा न्याय मिळेल असे ऐतिहासिक अधिवेशन नागरपुरात घेऊ, असे आश्वासन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहे. नाना पटोले भंडारा येथे पत्रकारांशी बोलत होते.

संबंधित बातम्या :

हिवाळी अधिवेशनातील खर्च नागपुरातील आरोग्य यंत्रणेला द्या, काँग्रेस आमदाराचं मुख्यमंत्र्यांना पत्र

हिवाळी अधिवेशनातून सरकार पळ काढण्याचा प्रयत्न करतेय, गिरीश महाजनांचं टीकास्त्र

“नागपुरात अधिवेशन घ्यायचं असेल तर मातोश्रीच्या बाहेर पडावं लागेल”

(sudhir mungantiwar slams state government on assembly winter session)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...