AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

OBC Reservation : स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी अर्ज दाखल केलेल्यांना दिलासा, पण नामांकन प्रक्रियेला आठवड्याची स्थगिती, सुप्रीम कोर्टाचा निर्णय

OBC Reservation : ही निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यास आरक्षण लाभार्थ्यांचं नुकसान होईल. त्यामुळे उद्याच सुनावणी व्हावी, असा आग्रहही मेहता यांनी धरला होता. यावर न्यायालयाने अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ती थांबवता येणार नाही.

OBC Reservation : स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी अर्ज दाखल केलेल्यांना दिलासा, पण नामांकन प्रक्रियेला आठवड्याची स्थगिती, सुप्रीम कोर्टाचा निर्णय
ईडब्ल्यूएस आरक्षणाचे काय होणार?Image Credit source: tv9 marathi
Reporter Sandeep Rajgolkar
Reporter Sandeep Rajgolkar | Edited By: | Updated on: Jul 12, 2022 | 2:15 PM
Share

नवी दिल्ली: ओबीसी आरक्षण (OBC Reservation) प्रश्नावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने अत्यंत महत्त्वाचा निर्णय दिला आहे. ज्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केला अशांची प्रक्रिया थांबवता येणार नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने (supreme court) दिला आहे. त्यामुळे ज्या उमदेवारांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत अर्ज दाखल केला आहे. त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच उद्यापासून सुरू होणाऱ्या नामांकन प्रक्रियेवर एक आठवड्याची स्थगिती देण्यात येत असल्याचंही कोर्टाने म्हटलं आहे. मात्र, कोर्टाची सुनावणी पूर्ण होत नाही तोपर्यंत निवडणूक प्रक्रिया थांबवण्याचे आदेश देण्याची विनंती महाराष्ट्र सरकारच्या (maharashtra government) वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात केली होती. मात्र, कोर्टाने त्यास नकार दिला आहे. कोर्टाने या प्रकरणावर येत्या मंगळवारी सुनावणी ठेवली आहे. मात्र, निवडणूक आयोगाचं म्हणणंही कोर्ट काही वेळात ऐकून घेणार असून त्यात आणखी काही निर्णय येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ओबीसी आरक्षणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी अॅटर्नी जनरल तुषार मेहता यांनी महाराष्ट्र सरकारच्या बाजूने युक्तिवाद केला. या संदर्भात एक आयोग नेमण्यात आला आहे. मात्र, जोपर्यंत अहवाल पू्र्ण होत नाही तोपर्यंत निवडणूक आयोगाला निवडणूक प्रक्रिया थांबवण्याचे निर्देश द्यावे, अशी मागणी मेहता यांनी केली. त्यावर कोर्टाने निवडणूक आयोगाने आपली भूमिका मांडावी असे निर्देश दिले. 271 ग्रामपंचायतीच्या निवडणूकांना उद्या सुरूवात होत आहे. निवडणूक आयोग त्याला एक आठवड्यापर्यंत मुदत वाढव देऊ शकतो, असं मेहता यांनी सांगितलं. त्यावर या प्रकरणी येत्या मंगळवारी सुनावणी होणार असल्याचं कोर्टाने स्पष्ट केलं.

निवडणूक आयोग म्हणणं मांडणार

ही निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यास आरक्षण लाभार्थ्यांचं नुकसान होईल. त्यामुळे उद्याच सुनावणी व्हावी, असा आग्रहही मेहता यांनी धरला होता. यावर न्यायालयाने अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ती थांबवता येणार नाही. मात्र, उद्यापासून अर्ज दाखल होणार आहेत. त्याला एक आठवडा मुदत वाढ देण्यात येत आहे, असं कोर्टाने सांगितलं. निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात नवीन आदेश जारी करावेत, असंही आयोगाला सांगण्यात आलं आहे. आज 2 वाजता पुन्हा एकदा भूमिका स्पष्ट करावे, असे निर्देशही कोर्टाने आयोगाला दिले आहेत.

प्रक्रिया थांबणार नाही

ज्या ठिकाणी अजून निवडणूक जाहीर झालेली नाही त्या ठिकाणचे ओबीसी आरक्षण बांठिया आयोगाच्या वैधतेवर अवलंबून असणार आहे. ज्या ठिकाणी निवडणूक जाहीर झाली आहे (92 नगरपरिषदांची) त्या ठिकाणी मात्र आता प्रक्रिया थांबणार नाही.

Follow Us
पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
Rohit Pawar | रोहित पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले.....
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले, पश्चात्ताप झाला असेल तर या... रोख कुणाकडे?
काँग्रेसच्या झेंड्याखाली या...राऊतांच्या एका वक्तव्याने चर्चांना उधाण
Sanjay Raut UNCUT | काँग्रेसच्या झेंड्याखाली या... संजय राऊतांच्या त्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ....
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ एवढे टक्के साठा...
विधान परिषदेआधी पवारांच्या गोटात भूकंप; 3 आमदारांनी घेतला मोठा निर्णय
tv9 Marathi Special Report | विधान परिषदेआधी पवारांच्या गोटात भूकंप; 3 आमदारांनी घेतला मोठा निर्णय! राजकारणातील सर्वात मोठा ट्विस्ट
राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन होणार?
Nana Patole On NCP Merger | राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन होणार? नाना पटोलेंच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या...
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या हलाचाली, नेमकं काय घडलं?
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या विधानाची चर्चा, नेमकं काय म्हणाले?
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप प्रदेशाध्यक्षांच्या भेटीला; नेमकं काय घडतंय?*
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट...
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट म्हणाल्या न्याय देण्यासाठी...