AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sushant Singh Rajput Case | सुशांतच्या तपासादरम्यान छाती बडवणारे आता कुठे? अनिल परबांचा आठवले-कंगनावर निशाणा

मुंबई पोलिसांचा तपास योग्य पद्धतीने सुरू होता, यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे’, अशी प्रतिक्रिया राज्य परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी दिली आहे.

Sushant Singh Rajput Case | सुशांतच्या तपासादरम्यान छाती बडवणारे आता कुठे? अनिल परबांचा आठवले-कंगनावर निशाणा
| Updated on: Oct 04, 2020 | 2:34 PM
Share

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावर एम्सच्या अहवालानंतर (AIIMS report) शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. सुशांतचा मृत्यू हत्या नसून, आत्महत्याच असल्याचा दावा एम्सच्या पथकाने केला आहे. हा अहवाल आता सीबीआयकडे सुपूर्द करण्यात आला आहे. यावरून परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. ‘सुशांत प्रकरणाच्या तपासा दरम्यान छाती बडवून घेणारे आता बोलणार का?’, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे (Sushant Singh Rajput Case Transport Minister Anil Parab Reaction after AIIMS report).

‘अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास आत्महत्या केली की हत्या? या प्रश्नभोवती फिरत होता. गेल्या तीन महिन्यापासून मुंबई पोलिस आणि नंतर सीबीआयनेही तपास सुरू केला होता. पण, आता AIIMS हॉस्पिटलच्या रिपोर्टमध्ये (report) या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे. मुंबई पोलिसांचा तपास योग्य पद्धतीने सुरू होता, यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे’, अशी प्रतिक्रिया राज्य परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी दिली आहे.

‘सुशांत प्रकरणाचा तपास करताना ज्यांनी छाती बडवल्या, त्यांनी शिवसेना आणि ठाकरे कुटुंबांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. पण, हे बोलणारे आता कुठे आहेत? रामदास आठवले कंगनावर बोलत होते, कात्रज प्रकरणी रामदास आठवले यांचे मौन का?’, असा प्रतिप्रश्न देखील परिवहन मंत्री अनिल परब यांनी केला आहे. (Sushant Singh Rajput Case Transport Minister Anil Parab Reaction after AIIMS report)

‘सुशांत प्रकरणात दिल्लीतील​ AIIMSच्या डॉक्टरांच्या टीमने सीबीआयकडे आपला अहवाल सुपूर्द केला आहे. AIIMSच्या डॉक्टरांनी सुशांत सिंह राजपूतची हत्या झाली असावी, या थेअरीला नकार दिला आहे. सुशांतची आत्महत्या असल्याचे स्पष्ट केली आहे. त्यामुळे सीबीआयच्या चार्जशीटनंतर शिवसेना पूर्णपणे भूमिका मांडेल,’ असे देखील अनिल परब (Anil Parab) यांनी म्हटले आहे.

हे तर मुंबईला बदनाम करण्याचे षड्यंत्र : महापौर किशोरी पेडणेकर

‘स्वतःच्या प्रसिद्धीसाठी इतरांना बदनाम करण्याचे काम सुशांत सिंह राजपूत प्रकरणात झाले आहे. मुंबई पोलिस, मनपा आणि मुंबईला बदनाम करण्याचे कारस्थान रचले गेले होते. मात्र, आता खोट्यांचे पितळ उघडे पडले आहे. व्हिसेरा अहवाल आणि शवविच्छेदन अहवाल (AIIMS Report) यामुळे आता लोकांचा मनपावरचा विश्वास वाढला आहे’, अशी प्रतिक्रिया महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली होती.

‘यंत्रणांनी काय समोर आणले ते पाहा. हे मुंबईला, आदित्य ठाकरेंना, शिवसेनेला बदनाम करण्याचे षड्यंत्र होते. आमचा यंत्रणांवर विश्वास आहे. मात्र, यंत्रणांचा चुकीचा वापर केला जातो आहे. आरोग्य सेवा, पोलिस सेवा आणि नेत्यांची बदनामी करणाऱ्यांबाबत मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यावा. त्यांची चौकशी होणे गरजेचे आहे’, असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या. आता प्रतिमा मलीन करणाऱ्यांचे हात खाली राहिले आहेत. मुंबईच्या जनतेने समाज माध्यमांतून त्यांना चागले उत्तर दिले आहे, असे म्हणत त्यांनी विरोधकांना टोला लगावला होता.

(Sushant Singh Rajput Case Transport Minister Anil Parab Reaction after AIIMS report)

संबंधित बातम्या : 

Sushant Singh Rajput | सुशांतची हत्या नव्हे आत्महत्याच!, एम्सच्या विशेष पथकाचा दावा 

Sushant Singh case | ‘एम्स’च्या रिपोर्टने महाराष्ट्राच्या बदनामीचा कट उधळला, शिवसेनेचा आक्रमक पवित्रा

Sushant Singh Rajput Case | सुशांतचा सीबीआय अहवाल लवकरात लवकर यावा; जनतेला सत्य समजलंच पाहिजे : अनिल देशमुख

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.