Sushant Singh Rajput Case | सुशांतच्या तपासादरम्यान छाती बडवणारे आता कुठे? अनिल परबांचा आठवले-कंगनावर निशाणा

मुंबई पोलिसांचा तपास योग्य पद्धतीने सुरू होता, यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे’, अशी प्रतिक्रिया राज्य परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी दिली आहे.

Sushant Singh Rajput Case | सुशांतच्या तपासादरम्यान छाती बडवणारे आता कुठे? अनिल परबांचा आठवले-कंगनावर निशाणा
Follow us
| Updated on: Oct 04, 2020 | 2:34 PM

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावर एम्सच्या अहवालानंतर (AIIMS report) शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. सुशांतचा मृत्यू हत्या नसून, आत्महत्याच असल्याचा दावा एम्सच्या पथकाने केला आहे. हा अहवाल आता सीबीआयकडे सुपूर्द करण्यात आला आहे. यावरून परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. ‘सुशांत प्रकरणाच्या तपासा दरम्यान छाती बडवून घेणारे आता बोलणार का?’, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे (Sushant Singh Rajput Case Transport Minister Anil Parab Reaction after AIIMS report).

‘अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास आत्महत्या केली की हत्या? या प्रश्नभोवती फिरत होता. गेल्या तीन महिन्यापासून मुंबई पोलिस आणि नंतर सीबीआयनेही तपास सुरू केला होता. पण, आता AIIMS हॉस्पिटलच्या रिपोर्टमध्ये (report) या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे. मुंबई पोलिसांचा तपास योग्य पद्धतीने सुरू होता, यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे’, अशी प्रतिक्रिया राज्य परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी दिली आहे.

‘सुशांत प्रकरणाचा तपास करताना ज्यांनी छाती बडवल्या, त्यांनी शिवसेना आणि ठाकरे कुटुंबांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. पण, हे बोलणारे आता कुठे आहेत? रामदास आठवले कंगनावर बोलत होते, कात्रज प्रकरणी रामदास आठवले यांचे मौन का?’, असा प्रतिप्रश्न देखील परिवहन मंत्री अनिल परब यांनी केला आहे. (Sushant Singh Rajput Case Transport Minister Anil Parab Reaction after AIIMS report)

‘सुशांत प्रकरणात दिल्लीतील​ AIIMSच्या डॉक्टरांच्या टीमने सीबीआयकडे आपला अहवाल सुपूर्द केला आहे. AIIMSच्या डॉक्टरांनी सुशांत सिंह राजपूतची हत्या झाली असावी, या थेअरीला नकार दिला आहे. सुशांतची आत्महत्या असल्याचे स्पष्ट केली आहे. त्यामुळे सीबीआयच्या चार्जशीटनंतर शिवसेना पूर्णपणे भूमिका मांडेल,’ असे देखील अनिल परब (Anil Parab) यांनी म्हटले आहे.

हे तर मुंबईला बदनाम करण्याचे षड्यंत्र : महापौर किशोरी पेडणेकर

‘स्वतःच्या प्रसिद्धीसाठी इतरांना बदनाम करण्याचे काम सुशांत सिंह राजपूत प्रकरणात झाले आहे. मुंबई पोलिस, मनपा आणि मुंबईला बदनाम करण्याचे कारस्थान रचले गेले होते. मात्र, आता खोट्यांचे पितळ उघडे पडले आहे. व्हिसेरा अहवाल आणि शवविच्छेदन अहवाल (AIIMS Report) यामुळे आता लोकांचा मनपावरचा विश्वास वाढला आहे’, अशी प्रतिक्रिया महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली होती.

‘यंत्रणांनी काय समोर आणले ते पाहा. हे मुंबईला, आदित्य ठाकरेंना, शिवसेनेला बदनाम करण्याचे षड्यंत्र होते. आमचा यंत्रणांवर विश्वास आहे. मात्र, यंत्रणांचा चुकीचा वापर केला जातो आहे. आरोग्य सेवा, पोलिस सेवा आणि नेत्यांची बदनामी करणाऱ्यांबाबत मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यावा. त्यांची चौकशी होणे गरजेचे आहे’, असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या. आता प्रतिमा मलीन करणाऱ्यांचे हात खाली राहिले आहेत. मुंबईच्या जनतेने समाज माध्यमांतून त्यांना चागले उत्तर दिले आहे, असे म्हणत त्यांनी विरोधकांना टोला लगावला होता.

(Sushant Singh Rajput Case Transport Minister Anil Parab Reaction after AIIMS report)

संबंधित बातम्या : 

Sushant Singh Rajput | सुशांतची हत्या नव्हे आत्महत्याच!, एम्सच्या विशेष पथकाचा दावा 

Sushant Singh case | ‘एम्स’च्या रिपोर्टने महाराष्ट्राच्या बदनामीचा कट उधळला, शिवसेनेचा आक्रमक पवित्रा

Sushant Singh Rajput Case | सुशांतचा सीबीआय अहवाल लवकरात लवकर यावा; जनतेला सत्य समजलंच पाहिजे : अनिल देशमुख

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.