AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नितेश राणे यांनीच जयदीप आपटेच्या कॉन्ट्रॅक्टसाठी… सुषमा अंधारे यांचा गंभीर आरोप

nitesh rane sushma andhare: पुतळ्याच्या प्रकरणात जयदीप आपटेच्या ऐवजी जावेद अन् अक्षय शिंदेच्या ऐवजी अक्रम शेख असता तर नितेश राणेने कसा थयथयाट केला असता. नितेश राणे नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली.

नितेश राणे यांनीच जयदीप आपटेच्या कॉन्ट्रॅक्टसाठी... सुषमा अंधारे यांचा गंभीर आरोप
nitesh rane sushma andhare
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Aug 29, 2024 | 3:52 PM
Share

malvan shivaji maharaj statue: मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा असलेला पुतळा कोसळला. हा पुतळा शिल्पकार जयदीप आपटे यांनी उभारला होता. यावरुन आता राजकारण तापू लागले आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणात नितेश राणे यांनाचा संबंध असल्याचा आरोप केला आहे. नितेश राणे हे आपटे यांच्या स्टुडिओत जात होते. जयदीप आपटे यांना कॉन्ट्रॅक्ट देण्यासाठी नितेश राणे यांनीच प्रयत्न केले, असा आरोप त्यांनी केला.

देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप

सुषमा अंधारे यांनी यावेळी राणे कुटुंबियांवर आरोप केले. ते म्हणाले, संस्कार नसलेल्या कुटुंबाबाबत काय भूमिका घ्यायची हे देवेंद्र फडणवीस यांना सांगावे लागेल. नारायण राणे आणि नितेश राणे यांचा मग्रुरपणाला देवेंद्र फडणवीस यांच्या वरदहस्त आहे. देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्र शांत राहून द्यायचा नाही. देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रातील लेकींना सुरक्षित ठेवायचा नाहीत.

पुतळ्याच्या प्रकरणात जयदीप आपटेच्या ऐवजी जावेद अन् अक्षय शिंदेच्या ऐवजी अक्रम शेख असता तर नितेश राणेने कसा थयथयाट केला असता. नितेश राणे नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली.

लोकसभा निवडणुकीमुळे घाई

आता देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत, हे नौसेनेचे काम होते. मग त्या कामाचे क्रेडीट घेताना ते का? बोलला नाही. त्यांना आता राजनाथ सिंह यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करायचे आहे? आता राज्याचे कलासंचलन म्हणतेय आम्ही फक्त सहा फुटांची परवानगी दिली होती. परंतु सरकारने इंटरनॅशनल इव्हेंटसाठी घाईघाईने पुतळा उभा केला. त्यांना फक्त आणि फक्त लोकसभेचे निवडणूक डोळ्यासमोर दिसली. हा खेळ शिवप्रेमींच्या भावनांचे आहे, असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला.

अजित पवार यांच्या निर्णयाचे स्वागत

अजित पवारांनी माफी मागितली. आम्ही अजित पवार यांच्या त्या निर्णयाचे स्वागत करतो. त्यांनी या प्रकरणात सरकारमध्ये असून वेगळी भूमिका घेतली आहे. या पद्धतीची भूमिका एकनाथ शिंदे अन् देवेंद्र फडणवीस घेणार आहेत का? त्या ठिकाणी पुतळ्याला खर्च केला दीड कोटी आणि हेलिपॅडला खर्च केला सव्वादोन कोटी, असा आरोप अंधारे यांनी केला.

Follow Us
चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार गटाला जबर धक्का, तो अधिकृत आदेश येताच...
चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार गटाला जबर धक्का, तो अधिकृत आदेश येताच मोठी खळबळ; महापालिकेत काय घडलं?
सांभाळून बोला अन्यथा फोडायचं कसं...शिंदे गटातील महिला नेत्याचा प्रचंड
सांभाळून बोला अन्यथा फोडायचं कसं...शिंदे गटातील महिला नेत्याचा प्रचंड संताप; नाव न घेता राऊतांना थेट इशारा?
आता काही खऱं नाही! लोकशाहीचं... ठाकरे गटातील फुटीबाबत तज्ज्ञांचा मोठा
आता काही खऱं नाही! लोकशाहीचं... ठाकरे गटातील फुटीबाबत तज्ज्ञांचा मोठा इशारा, काय म्हणाले?
ठाकरेंचे आणखी दोन खासदार....बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ, खासदर फुट
ठाकरेंचे आणखी दोन खासदार....बड्या नेत्याच्या दाव्याने  खळबळ, खासदर फुटीनंतर आणखी मोठा धक्का!
अजितदादांच्या पक्षाने व्हीप काढला पण...त्या उल्लेखानंतर मोठी खळबळ
मोठी बातमी! अजितदादांच्या पक्षाने व्हीप काढला पण...त्या उल्लेखानंतर मोठी खळबळ; सोलापुरात नेमकं काय घडतंय?
तर त्यांना गाडीसकट पेटवू...बंड करणाऱ्या खासदाराविरोधात वातावरण तापलं;
तर त्यांना गाडीसकट पेटवू...बंड करणाऱ्या खासदाराविरोधात वातावरण तापलं; थेट इशाराच दिला!
मुंबईत पोलीस तैनात! दिना पाटील यांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त!
Operation Tiger | दिल्लीत बंड, मुंबईत पोलीस तैनात! संजय दिना पाटील यांच्या घराबाहेर अचानक वाढवला पोलिस बंदोबस्त!
दिल्लीहून आल्यानंतर ओमराजे 3 तास विमानतळावरच बसून; नंतर दुसऱ्या...
दिल्लीहून आल्यानंतर ओमराजे 3 तास विमानतळावरच बसून; नंतर दुसऱ्या... नेमकं कारण काय?
ठाकरेंना दुसरा मोठा धक्का! 6 खासदारांच्या बंडानंतर व्हीपही ठरला अवैध?
Sushma Andhare | ठाकरेंना दुसरा मोठा धक्का! 6 खासदारांच्या बंडानंतर व्हीपही ठरला अवैध?
6 खासदार कुठे गेले?; सामंतांच्या एका वक्तव्याने राजकारणत खळबळ!
Uday Samant | 6 खासदार कुठे गेले?; उदय सामंतांच्या एका वक्तव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ!