AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘महायुतीत जागावाटपावरुन खूनखराबा होऊ नये, एवढीच अपेक्षा’, ठाकरे गटाच्या खासदाराच वक्तव्य

"नवाब मलिक यांच्याविषयी कारवाई सूडाने केली आहे. नवाब मलिक हे देवेंद्र फडणवीसांसह काही लोकांविषयी सातत्याने पुराव्यासह बोलत होते. ते पुरावे समोर आल्याने सीबीआय, एनआयएला कारवाई करावी लागली"

'महायुतीत जागावाटपावरुन खूनखराबा होऊ नये, एवढीच अपेक्षा', ठाकरे गटाच्या खासदाराच वक्तव्य
शिंदे गट आणि अजितदादांना विधानसभेच्या किती जागा मिळणार ?
| Updated on: Aug 20, 2024 | 10:36 AM
Share

“महायुतीमधील तीन पक्षात एक वाक्यता नाहीय. महायुती हा शब्द गोंडस आहे. ही महायुती नसून संघर्ष आहे. रोज त्यांच्या मारामाऱ्या सुरु आहेत. पण त्या दिसत नाहीत. एक मंत्री आपल्या सहकारी पक्षाच्या नेत्याला मारण्याची, थोबाड फोडण्याची भाषा करतो. यावरुन प्रकरण किती टोकाला गेलय ते दिसतं. हे कशावरुन चाललय. मुंबई-गोवा महामार्ग स्वर्गात जाण्याचा मार्ग बनलाय. मुंबईतील अनेक रस्ते, कोकणातील रस्ते, मुंबई-नाशिक रस्ता जाऊन पाहा. ठेकेदारांकडून लूट सुरु आहे. पीडब्ल्यूडी, नगरविकास खातं शिंदे गटाच्या ATM मशीन्स आहेत. काम होत नाहीयत. सरकार पैशांच्या मागे लागलय” अशी टीका संजय राऊत यांनी केली.

“ज्या मंत्र्याविषयी, रस्त्यांबाबत शिंदे गटाच्या नेत्याने सांगितलं, ते सत्य आहे. प्रकरण मारामारीपर्यंत गेलय. जागावाटपात त्यांच्या मारामाऱ्या होणार आहेत. एकमेकाच्या जागा पाडल्या जातील. जागावाटपाच्या बैठकीत खूनखराबा होऊ नये, एवढीच अपेक्षा” असं संजय राऊत म्हणाले. काँग्रेस आमदार झीशान सिद्दीकी आणि नवाब मलिक अजित पवारांसोबत दिसलेत, तरी काँग्रेस कारवाई करत नाही, या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले की, “तो काँग्रेसचा प्रश्न आहे. विधानसभेची मुदत संपत आली आहे. नवाब मलिक यांच्याविषयी कारवाई सूडाने केली आहे. नवाब मलिक हे देवेंद्र फडणवीसांसह काही लोकांविषयी सातत्याने पुराव्यासह बोलत होते. ते पुरावे समोर आल्याने सीबीआय, एनआयएला कारवाई करावी लागली”

‘खटले खोटे आहेत, हे जाहीर करावं’

“नवाब मलिक विधानसभेत सरकारी बाकावर बसले होते, तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना पत्र लिहिलं. हे कसं योग्य नाही. भाजपाच्या त्यांच्याविषयीच्या भावना फडणवीसांनी लिहिल्या. ते पत्र देवेंद्र फडणवीस यांनी मागे घ्यावं किंवा नवाब मलिक यांच्यावरील खटले खोटे आहेत, हे जाहीर करावं” असं संजय राऊत म्हणाले.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा