AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वाझे प्रकरणात आमची नाहक बदनामी, संजय राऊतांना समज द्या; काँग्रेस ठाकरे सरकारवर नाराज?

हे प्रकरण सरकारने व्यवस्थितपणे हाताळले नाही. त्यामुळे आमच्यावरही विनाकारण शिंतोडे उडाले. | Sachin Waze Congress Thackeray govt

वाझे प्रकरणात आमची नाहक बदनामी, संजय राऊतांना समज द्या; काँग्रेस ठाकरे सरकारवर नाराज?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
| Updated on: Apr 03, 2021 | 9:37 AM
Share

मुंबई: अंबानी स्फोटक प्रकरणात पोलीस दलापर्यंत पोहोचलेल्या धाग्यादोऱ्यांमुळे झालेली नाचक्की आणि कोरोना परिस्थिती हाताळताना अगोदरच मेटाकुटीस आलेल्या ठाकरे सरकारला (Thackeray govt) आता काँग्रेसने आणखी एक इशारा दिला आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी आपली नाराजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना स्पष्टपणे बोलून दाखवल्याची माहिती, सूत्रांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला दिली आहे. (Congress leaders warns Thackeray govt)

या माहितीनुसार, काँग्रेसने सचिन वाझे प्रकरणात आमची नाहक बदनामी झाली, असे मुख्यमंत्र्यांना सांगितल्याचे समजते. हे प्रकरण सरकारने व्यवस्थितपणे हाताळले नाही. त्यामुळे आमच्यावरही विनाकारण शिंतोडे उडाले, असा नाराजीचा सूर काँग्रेसच्या नेत्यांनी लावला.

तर दुसरीकडे संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (UPA) अध्यक्षपदासाठी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याकडून सुरु लॉबिंगविषयीही काँग्रेसने नाराजी व्यक्त केली. संजय राऊत यांनी यूपीएचे अध्यक्षपद सोनिया गांधी यांच्याऐवजी शरद पवार यांच्याकडे सोपवण्यात यावे, अशी मागणी लावून धरली आहे. या मुद्द्यावरुन गेल्या काही दिवसांत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यात शाब्दिक चकमकीही झाल्या आहेत. नाना पटोले यांनी आम्ही हा मुद्दा उद्धव ठाकरे यांच्यापुढे मांडणार असल्याचेही सांगितले होते. त्यामुळे आता शिवसेनेने संजय राऊत यांनी समज द्यावी, अशी मागणीही काँग्रेस नेत्यांनी केल्याचे समजते.

लक्षात ठेवा, ठाकरे सरकार काँग्रेसच्या टेकूवर, नाना पटोलेंचा शिवसेनेला रोखठोक इशारा

गेल्या काही दिवसांत काँग्रेसने ठाकरे सरकारला दोनदा निर्वाणीचा इशारा दिला आहे. यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली 10 वर्षे मनमोहन सिंग यांचे केंद्रात सरकार होते. त्यात शरद पवार मंत्री होते हे विसरता कामा नये. काँग्रेस नेत्यांवर केली जाणारी टीका पक्षाकडून सहन केली जाणार नाही. लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्या लक्षात ही बाब आणून देणार आहोत. काँग्रेसमुळे सरकार आहे, आम्ही म्हणजे सरकार नाही, हे लक्षात आणून देण्याची वेळ आली आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले होते.

संबंधित बातम्या:

प्रवाहाविरुद्ध राजकारण, प्रस्थापितांना घरी बसवलं; वाचा, दादा भुसेंची ‘राज’नीती

VIDEO: वाझेंची नियुक्ती करू नये म्हणून पवार, राऊत, देशमुखांना भेटलो होतो, अबू आजमींचा गौप्यस्फोट

महाराष्ट्राने नवी दिशा दिली, राष्ट्रीय स्तरावरही तेच व्हावं; संजय राऊतांकडून ममतादीदींचं समर्थन

(Congress leaders warns Thackeray govt)

Follow Us
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.