AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फडणवीसांसारख्या प्रगल्भ माणसाकडून ही अपेक्षा नाही; श्रेयवादाच्या टीकेला आव्हाडांचे प्रत्युत्तर

राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. कोणाचे लग्न झाले तरी त्याचे श्रेय घ्यायचे, कोणाला मुलगा झाला तरी त्याचे देखील श्रेय घ्यायचे अशी टीका फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) केली होती.

फडणवीसांसारख्या प्रगल्भ माणसाकडून ही अपेक्षा नाही; श्रेयवादाच्या टीकेला आव्हाडांचे प्रत्युत्तर
जितेंद्र आव्हाड
| Edited By: | Updated on: Feb 20, 2022 | 9:15 PM
Share

ठाणे : राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. कोणाचे लग्न झाले तरी त्याचे श्रेय घ्यायचे, कोणाला मुलगा झाला तरी त्याचे देखील श्रेय घ्यायचे अशी टीका फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) केली होती. त्या टीकेला आता जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिले आहे. फडणवीस यांच्यासारख्या प्रगल्भ माणसाने असं काहीतरी बोलावे हे अपेक्षित नसल्याचे आव्हाड यांनी म्हटले आहे. ठाण्यात मला आजपर्यंत कुठेच श्रेयवादाची लढाई दिसली नाही. कार्यकर्त्यांचा हुरूप वाढवण्यासाठी तसं कधीकधी बोलावं लागतं असे आव्हाड यांनी म्हटले आहे. ते आज  राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधीर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते.

काय म्हणाले आव्हाड?

यावेळी बोलताना आव्हाड यांनी म्हटले की, देवेंद्र फडणवीस महाविकास आघाडीवर टीका करताना म्हणाले की, महाविकास आघाडीला प्रत्येक गोष्टीचे श्रेय घेण्याचे सवय आहे. कोणाचे लग्न झाले तरी श्रेय घे, कोणाला मुलगा झाला तरी श्रेय घे अशी टीका त्यांनी केली. मात्र मला वाटते फडणवीस यांच्यासारख्या प्रगल्भ माणसाने असं काहीतरी बोलावे हे अपेक्षित नाही. ठाण्यात मला कुठेही श्रेयवादाची लाढई दिसली नाही. कार्यकर्त्यांचा हूरूप वाढवण्यासाठी कधी -कधी  बोलावे लागते असं म्हणत आव्हाड यांनी फडणवीसांना टोमणा लगावला आहे.

सुधीर पाटलांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला हजेरी

कल्याण राष्ट्रवादीचे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष वंडार पाटील यांचे पुत्र आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधीर पाटील यांचा आजा वाढदिवस होता. वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला जितेंद्र आव्हाड यांनी हजेरी लावली. वाढदिवसाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आव्हाड हे आज डोंबिवली पूर्वेतील गोलवली परिसरात आले होते. यावेळी बोलताना त्यांनी फडणवीसांवर निशाणा साधला.

संबंधित बातम्या

नेत्यांनो तुमच्या टाईमपासमुळे जनतेचे लाखो रूपये वाया, नरहरी झिरवळांनी कान उपटले

Hijab Controversy : हिजाब वादात प्रकाश आंबेडकरांची उडी! कायदा आणि संविधानाचा दाखला देत काय म्हणाले?

काँग्रेसशिवाय भाजपा विरोधी आघाडी यशस्वी होणार? राज्यातील काँग्रेस नेत्यांचं मत काय? जाणून घ्या

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.