AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नेत्यांनो तुमच्या टाईमपासमुळे जनतेचे लाखो रूपये वाया, नरहरी झिरवळांनी कान उपटले

विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ (Narhari Zirval) यांनी नेते मंडळीची कान उपटणी केली आहे. विधानसभा सदस्यांचे वर्तन चुकीचं आहे, असेच चालू राहील तर सभागृहाचे सर्व अधिकार संपुष्टात येणार, अशी काळजी झिरवळ यांनी व्यक्त केली आहे.

नेत्यांनो तुमच्या टाईमपासमुळे जनतेचे लाखो रूपये वाया, नरहरी झिरवळांनी कान उपटले
नरहरी झिरवळांनी नेत्यांचे कान उपटले
| Edited By: | Updated on: Feb 20, 2022 | 10:06 PM
Share

ठाणे : राज्यात सध्या मोठा पॉलिटिकल राडा सुरू आहे. किरीट सोमय्या आणि संजय राऊत रोज एकमेकांवर तुटून पडत आहेत. तर दुसकडे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Cm Uddhav Thackeray) भाजपवर सुडाचे राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे. याच वादाचे पडसाद येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Assembly Session) दिसून येण्याची शक्यता आहे. कारण याआधीची अधिवेशनं सुद्ध अशाच वादात गेली आहेत. जनतेचे मुद्दे राहतात बाजुला. मात्र नेत्यांची जुंपल्याचे दिसून येते. यावरूनच आता विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ (Narhari Zirval) यांनी नेते मंडळीची कान उपटणी केली आहे. विधानसभा सदस्यांचे वर्तन चुकीचं आहे, असेच चालू राहील तर सभागृहाचे सर्व अधिकार संपुष्टात येणार, अशी काळजी झिरवळ यांनी व्यक्त केली आहे. अधिवेशावेळी एवढा मोठा पॉलिटिकल राडा झाला होता की त्यानंतर भाजपच्या बारा आमदारांवर निलंबनाची कारवाई झाली होती. नंतर सुप्रीम कोर्टात धाव घेतल्यानंतर सुप्रीम कोर्टाने हे निलंबन रद्द ठरवलं आहे.

लवकरच सर्वपक्षीयांची बैठक बोलवणार

येत्या अधिवेशना आधी लवकरच सर्व पक्षीय नेत्यांची बैठक बोलावणार अशी माहिती नरहरी झिरवळ यांनी दिली आहे. आजच्या राजकारणात आरोप प्रत्यारोप करताना भाषेचा स्तर खाली गेलाय, यासह सभागृहात सदस्यांचे वर्तन याबाबत प्रतिक्रीया देताना विधानसभेचे प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी सध्या जे काही चाललं आहे ते चुकीचं आहे आणि असच सुरू राहील तर सभागृहाचे सर्व अधिकार संपुष्टात येणार. त्यामुळे याबाबत मी सर्वपक्षीय नेत्यांची एक बैठक लवकरच बोलावणार आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे या बैठकीने तर राजकारण शांत होणार का, हेही पाहणं तेवढेच महत्वाचे ठरणार आहे.

जनतेचा पैसा वाया घालवू नका

अधिवेशनात यंदा फक्त 6 दिवस सेशन चाललं. मात्र त्यातही एखादा प्रश्न उपस्थित झाला की मागचं काही तरी काढून वेळ वाया घालवण्यात आला. या नेत्यांच्या टाइमपासमुळे यामध्ये प्रत्येक मिनिटाला जनतेचे पैसे खर्च होत आहेत .अशी खंत व्यक्त करत याचा विचार सर्व पक्षीय नेत्यांनी केला पाहिजे, असे मत नरहरी झिरवळ यांनी व्यक्त केलं आहे. गेल्या अनेक अधिवेशनाच राज्यातल्या राजकीय मुद्द्यावरून विरोधक आणि सत्ताधारी आमनसामने येताना दिसून आले. याआधीच्या अदिवेशनात कोरोनामुळे अधिवेशनही पूर्ण वेळ घेता आले नाही. अशातच वेळ कमी असताना हा पॉलिटिकल राडा झाल्याने त्याची भुर्दंड थेट जनतेला बसत आहे. त्यामुळेच झिरवळांनी ही चिंता व्यक्त केली आहे.

Hijab Controversy : हिजाब वादात प्रकाश आंबेडकरांची उडी! कायदा आणि संविधानाचा दाखला देत काय म्हणाले?

काँग्रेसशिवाय भाजपा विरोधी आघाडी यशस्वी होणार? राज्यातील काँग्रेस नेत्यांचं मत काय? जाणून घ्या

तिसऱ्या आघाडीने काही फरक पडत नाही, येणार तर मोदीच-रामदास आठवले

Follow Us
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....