Vinayk Raut: विनायक राऊतांना कोर्टाचा मोठा झटका, गिरिजा राऊत प्रकरणात महत्त्वाचा निर्णय आला, केव्हाही अटक…
विनायक राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली असून त्यांच्यावर ठाणे पोलिसांकडून कारवाई होण्याची शक्यता आहे. २३ तारखेच्या सुनावणी आधी देखील पोलीस अटकेची कारवाई करू शकतात.

ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांचे संपूर्ण कुटुंब गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहे. राऊत यांची सून गिरिजा राऊत यांनी केलेल्या तक्रारीवरून विनायक राऊत, गीतेश राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर विनायक राऊत यांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. विनायक राऊत आणि त्यांच्या कुटुंबीयांचा अंतरिम जामीन अर्ज ठाणे न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली असून त्यांच्यावर ठाणे पोलिसांकडून कारवाई होण्याची शक्यता आहे. २३ तारखेच्या सुनावणी आधी देखील पोलीस अटकेची कारवाई करू शकतात.
कोर्टाचा निकाल काय?
या अर्जावर सुनावणी होईपर्यंत न्यायालयाकडून राऊत यांना संरक्षण मिळणार नाहीच. तसेच पोलिस चौकशीसाठी कधीही विनायक राऊत यांना ताब्यात घेऊ शकतात. अटकपूर्व जामीनावर मुख्य सुनावणी २३ जुलैला होणार असून २३ तारखेपर्यंत विनायक राऊत यांना अटकेपासून संरक्षण मिळणार नसल्याचे समोर आले आहे.
नेमकं प्रकरण काय?
गितेश राऊत यांची पत्नी गिरिजा राऊत यांनी ठाण्यात राऊत कुटुंबाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या तक्रारीमध्ये त्यांनी गितेश राऊत आणि सासूबाईंवर अनेक गंभीर आरोप केले. तसेच अघोरी प्रकार केल्याचे देखील सांगितले. त्यांना जबरदस्तील अघोरी पुजेला बसवण्यात आल्याचे गिरिजा यांनी सांगितले आहे. त्यावर विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया देत, अघोरी पूजेचं खंडन करतो. आम्ही त्या पंथातले नाही. आम्हाला ते मान्यच नाही. आईवडिल असताना अघोरी प्रकार कसे सहन केले. तिच्या आईवडिलांनी कसे सहन केले. न्याय देवता न्याय देईल अशी आशा आहे असे म्हटले. त्यानंतर विनायक राऊत यांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र, कोर्टाने हा अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे राऊत कुटुंबियांना कधीही अटक होण्याची शक्यता आहे.
