AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Big Breaking : मविआ फुटणार? उद्धव ठाकरे यांनी आता एकला चलो रेची भूमिका घ्यावी; ठाकरे गटाच्या खासदाराच्या सल्ल्याने खळबळ

देशातील राजकारणाचा चिखल झाला आहे. राजकारणाचे गजकरण झालं आहे. त्याला भाजपच जबाबदार आहे. पूर्वी देशात अशा पद्धतीचं राजकारण नव्हतं. अजित पवार बंड करतील हे आम्हाला आधीच माहीत होतं...

Big Breaking : मविआ फुटणार? उद्धव ठाकरे यांनी आता एकला चलो रेची भूमिका घ्यावी; ठाकरे गटाच्या खासदाराच्या सल्ल्याने खळबळ
uddhav thackerayImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 03, 2023 | 7:47 AM
Share

रत्नागिरी : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली आहे. अजित पवार हे 40 आमदारांसह राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये समील झाले आहेत. त्यामुळे आधीच कमकुवत झालेली महाविकास आघाडी आता आणखीनच कमकुवत झाली आहे. परिणामी आता महाविकास आघाडीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. ठाकरे गटाच्या एका बड्या खासदाराने तर उद्धव ठाकरे यांनी आता एकला चलो रेची भूमिका घ्यावी, असा सल्लाच दिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी फुटणार काय? अशी चर्चा सुरू झाली आहे. तसेच या खासदाराच्या विधानावरून ठाकरे गटातही सर्वकाही अलबेल नसल्याचं दिसून येत आहे.

ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना हा सल्ला दिला आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते. राज्यात शिवसेनेने एकला चलो रेची भूमिका घ्यायला पाहिजे. राज्यातील जनतेची तशी इच्छा आहे, असं विनायक राऊत यांनी म्हटलं आहे. प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीत घेण्याचा आमचा आग्र होता. पण आंबेडकरांना महाविकास आघाडीत घेऊ नये अशी मागणी अजित पवार यांनीच केली होती. आता मात्र, त्यांनीच कोलांटी उडी मारल्याचा गौप्यस्फोट विनायक राऊत यांनी केला आहे.

शिंदेंनी माफी मागावी

ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कंटाळून एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केलं, ते एकनाथ शिंदे आता अजित पवार यांच्या मांडीला मांडी लावून तीन चाकी सरकार चालवणार का? असा सवाल करतानाच एकनाथ शिंदे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केलेले आरोप खोटे होते हे सिद्ध झालं आहे. त्यांना जनाची नाही तर मनाची लाज असेल तर त्या आरोपांबाबत त्यांनी माफी मागावी, अशी मागणीत राऊत यांनी केली आहे.

हे घडणार माहीत होतं

आम्ही वरिष्ठांना सांगून निर्णय घेतला असं अजित पवार म्हणत आहेत. याचा अर्थ त्यांचा वरिष्ठ कोण? असा सवाल करतानाच अजित पवार बंड करतील याची कल्पना होती. पण आता या क्षणापासून शिंदे गटाच्या विसर्जनाची तयारी सुरू झाली आहे. शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र होणार म्हणून भाजपचा अजित पवार यांना सोबत घेऊन दुसरा प्लॅन तयार झाला आहे, असा दावाही त्यांनी केला.

ते सर्व लटकले

देशात राजकारणाचे गजकरण सुरू झालंय. अजित पवारांना सोबत घेऊन भाजपा कसा कृतघ्नपणा करू शकतो हे भाजपने दाखवून दिले आहे. ज्यांना मंत्री पदाची गाजरं दाखवली होती ते सर्व आता लटकले आहेत. लोकशाहीची कशी विटंबना केली जाते हे संपूर्ण जग पाहतंय, असंही ते म्हणाले.

Follow Us
नाशिक धर्मांतर प्रकरणात मोठी घडामोड! धर्मांतर, हिजाब ट्रेनिंग.....
नाशिक धर्मांतर प्रकरणात मोठी घडामोड! धर्मांतर, हिजाब ट्रेनिंग......
अखेर ठरलं! हा नेता होणार पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री
अखेर ठरलं! हा नेता होणार पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री.
तामिळनाडूत राजकीय खळबळ! थलपती विजय सरकार स्थापनेच्या उंबरठ्यावर?
तामिळनाडूत राजकीय खळबळ! थलपती विजय सरकार स्थापनेच्या उंबरठ्यावर?.
मी पालकमंत्र्यांना काडीमात्र भाव देत नाही, पालकमंत्री पोलीस आहेत का?
मी पालकमंत्र्यांना काडीमात्र भाव देत नाही, पालकमंत्री पोलीस आहेत का?.
TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान गरोदर?
TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान गरोदर?.
निदा खान प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट... एमआयएमचा नगरसेवक सहआरोपी
निदा खान प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट... एमआयएमचा नगरसेवक सहआरोपी.
नाशिक TCS प्रकरणातील मास्टरमाईंडला बेड्या; 42 दिवस पोलिसांना गुंगारा..
नाशिक TCS प्रकरणातील मास्टरमाईंडला बेड्या; 42 दिवस पोलिसांना गुंगारा...
जय पवारांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट....
जय पवारांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट.....
बदलापूरनंतर गोवंडीत संतापजनक घटना; शाळेतील शिपायाकडून 6 वर्षीय....
बदलापूरनंतर गोवंडीत संतापजनक घटना; शाळेतील शिपायाकडून 6 वर्षीय.....
दहावीच्या निकालात कोकण विभाग पुन्हा अव्वल; राज्याचा निकाल 92.09 टक्के
दहावीच्या निकालात कोकण विभाग पुन्हा अव्वल; राज्याचा निकाल 92.09 टक्के.