AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्या, पण 1500 रुपयात महाराष्ट्र विकणार?; उद्धव ठाकरे यांचा सवाल

लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार टिका केली आहे. या योजनेचा लाभ जनतेने घ्यावाच कारण हे पैसे जनतेचे असल्याचे ठाकरे यावेळी म्हणाले...

लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्या, पण 1500 रुपयात महाराष्ट्र विकणार?; उद्धव ठाकरे यांचा सवाल
| Updated on: Aug 10, 2024 | 10:10 PM
Share

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा मेळावा ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे झाला. या मेळाव्याची सुरुवात राड्याने झाली. उद्धव ठाकरे यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर मनसैनिकांनी नारळ फेकले.त्यामुळे आता विधानसभेच्या निवडणूकात मनसे आणि शिवसेनेत मोठे राडे होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.उद्धव ठाकरे यांनी लाडकी बहीण योजनेवरुन जोरदार टिका केली. आपण मराठवाडा दौऱ्यात तेथील शेताच्या बांधावर महिलांना विचारले की 1500 रुपये मिळणार काय वाटतंय तर त्या म्हणाल्या की 1500 रुपयांत काय होते असा सवाल त्यांनी आपल्या केल्याचे उद्धव ठाकरे यांनी भाषणात सांगितले.

उद्धव ठाकरे आपल्या भाषणात पुढे म्हणाले की आम्ही पाठून वार करणारे नाही. समोरा समोर वार करणारे आहोत. जे काही करायचं आहे ते विधानसभा निवडणुकीत करायचं आहे. लोकसभा लांबली. पाच टप्पे. तुम्ही काय क्रिकेट खेळत आहात का ? असा सवाल ठाकरे यांनी केंद्र सरकारला उद्देश्यून केला. ते पुढे म्हणाले की पाच टप्प्यात निवडणूक घेतली तशी आता कानावर वेगळीच माहिती येते आहे. आता कानावर येतंय की नोव्हेंबरमध्ये हे निवडणूक घेणार आहेत. कारण चार महिने हप्ते दिले की महिलांचा विश्वास बसेल आणि मतदान होईल असं त्यांना वाटतंय असेही उद्धव  ठाकरे म्हणाले.

१५०० रुपयात महाराष्ट्र विकणार?

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की कॉंग्रेसच्या राजवटीत मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी अशीच घोषणा केली होती.आणि शिवसैनाप्रमुखांनी कृषी पिकविम्याचे कर्ज माफ करू असं आश्वासन दिले होते. परंतू सुशील कुमार शिंदे यांनी ही योजना सुरू केली. त्यामुळे लोकांनी काँग्रेसला मतदान केलं. ते सत्तेत आले. त्यानंतर सुशीलकुमारांची विकेट पडली. विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले . त्यांनी दामदुपटीने बिल पाठवलं. बिल भरा नाही तर तुरुंगात पाठवू असा इशारा दिला. तशी ही मिंध्याची योजना आहे. योजना आहे, लाभ घ्या. ते तुमचे पैसे आहेत. त्यांच्या खिशातील नाही. पण 1500 रुपयात महाराष्ट्र विकणार? असा सवाल ही उद्धव ठाकरे यांनी केला.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.