AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“बिनकामी नेते गेल्याने पक्षावर परिणाम नाही, नवीन पदाधिकारी जोमाने कामं करतील”

पक्षाच्या विश्वासहार्तेवर प्रश्न उपस्थित करणे बेईमानीचा नवा अध्याय आहे, असं वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते राजेंद्र पातोडे (vanchit bahujan aaghadi activist resignation) यांनी सांगितले.

बिनकामी नेते गेल्याने पक्षावर परिणाम नाही, नवीन पदाधिकारी जोमाने कामं करतील
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Feb 23, 2020 | 11:36 AM
Share

मुंबई : पक्षाच्या विश्वासहार्तेवर प्रश्न उपस्थित करणे बेईमानीचा नवा अध्याय आहे, असं वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते राजेंद्र पातोडे (vanchit bahujan aaghadi activist resignation) यांनी सांगितले. माजी आमदार बळीराम सिरस्कार आणि 47 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देत काल (22 फेब्रुवारी) पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय (vanchit bahujan aaghadi activist resignation) घेतला.

राजेंद्र पातोडे म्हणाले, “30 वर्षे सत्ता आणि पदे मिळाली, 10 वर्षे आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत सभापती, लोकसभा उमेदवारी, जिल्हाध्यक्ष पदासहीत सर्व काही मिळविले आणि पक्षाच्या विश्वासाहार्तेवर प्रश्न उपस्थित करणे बेईमानीचा नवा अध्याय आहे.”

“विधानसभा निवडणुकीत आणि जिल्हा परिषद निवडणुकीत उघड उघड पक्षाच्या विरोधात उमेदवार पाडण्यासाठी फिरणाऱ्या दोन्ही माजी आमदारांनी स्वतःची विश्वासाहार्ता तपासली पाहीजे. पक्षाचा विश्वास संपला असता, तर दोन्ही माजी आमदारांची उघड बेईमानी यशस्वी झाली असती. स्वबळावर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये सत्ता मिळाली नसती. त्यामुळे पक्षाची नव्हे तर दोन्ही माजी आमदारांची विश्वासाहार्ता संपली आहे”, असंही राजेंद्र पातोडे म्हणाले.

“वंचित आता राज्याबाहेर विविध राज्यात एनआरसी, सीएए आणि एनपीआर विरोधात आंदोलन करत आपल्या कक्षा रुंदावत आहे. पक्षाच्या विरोधात जावून केलेल्या बेईमानीवर जालीम उपाय करण्यासाठी अकोला जिल्ह्यातील वंचितचे कार्यकर्ते सक्षम आहेत. यापूर्वी तसा प्रयत्न करणारे अनेक सुरमा आज राजकीय वनवासात आहेत. दोन्ही माजी आमदारांनी पक्ष सोडला असेल तर पक्षाच्या नावावर मिळालेल्या आमदारकीची पेंशन आणि सवलती देखील स्वाभिमान पूर्वक सोडून दिल्या पाहिजे”, असंही पातोडे यांनी सांगितले.

दरम्यान, वंचित बहुजन आघाडीतून एकूण 47 जणांनी राजीनामे दिले आहेत. यामध्ये माजी आमदार बळीराम सिरस्कार, हरिदास भदे, राज्याचे महासचिव नवनाथ पडळकर, अर्जुन सलगर यांच्यासह अनेक जिल्हाध्यक्ष, संपर्क प्रमुख, महासचिव, सल्लागारांसह अनेक कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक