AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संसदेत कृषी कायदा मांडला तेव्हा शिवसेना तटस्थ, मग आता विरोध कसा? विनोद तावडेंचा सवाल

भाजप आणि मनसेची युती होईल का? या प्रश्नावर विनोद तावडेंनी मौन पाळलं. त्यासाठी अजून भरपूर वेळ अल्याचं सांगत त्यांनी प्रश्नाला उत्तर देणं टाळलं (Vinod Tawde slams Shiv Sena). 

संसदेत कृषी कायदा मांडला तेव्हा शिवसेना तटस्थ, मग आता विरोध कसा? विनोद तावडेंचा सवाल
| Updated on: Dec 07, 2020 | 3:47 PM
Share

रत्नागिरी : संसदेत कृषी कायदा मांडला तेव्हा त्याला पाठिंबा दिला गेला. त्यानंतर भूमिका कशी बदलते? काही पक्ष तटस्थ राहिले ते पक्ष आज विरोध कसा करु शकतात? असा सवाल करत भाजप नेते विनोद तावडे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. “आधीच्या सरकारमध्ये कायदा मांडताना काही लोकं सरकारमध्ये होते. मात्र, आज ते विरोध कसे करतात? असा जर विरोध असेल आणि त्यासाठी भारत बंदला पाठिंबा असेल तर या मुद्यावरून राजकारण केलं जातंय”, असं तावडे म्हणाले (Vinod Tawde slams Shiv Sena).

शिरोमणी अकाली दलाचे उपाध्यक्ष आणि खासदार प्रेमसिंग चंदू माजरा यांनी काल (7 डिसेंबर) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. याबाबत विनोद तावडे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी अकाली दल आणि शिवसेनेवर टीका केली. “पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीं आणि उद्धव ठाकरेंना भेटले होते, अगदी तशाच प्रकारची ही भेट आहे. विरोधी पक्षाला मोदी सरकारला विरोधी करायला संधी मिळत नाही. एखादी संधी आली तर त्यात आपल्याला कसं जाता येईल हे पहाण्याचा दोन्ही पक्षांचा प्रयत्न आहे. मात्र जनता जनार्दन फायनल आहेत. शेवटी काय करायचं ते जनता ठरवेल”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस सुरु असल्याचा दावा केला आहे. मात्र, त्यांच्या या दाव्यात तथ्य नसल्याचं तावडे म्हणाले. “गेहलोत यांचा हा गौप्यस्फोट नाही. गौप्यस्फोट करण्यासाठी पुरावे लागतात. राजकीय नेते आणि विरोधक अशी वक्तव्ये करत असतात”, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं.

दरम्यान, भाजप आणि मनसेची युती होईल का? या प्रश्नावर विनोद तावडेंनी मौन पाळलं. त्यासाठी अजून भरपूर वेळ अल्याचं सांगत त्यांनी प्रश्नाला उत्तर देणं टाळलं (Vinod Tawde slams Shiv Sena).

“घटनेप्रमाणे केंद्राने केलेला कायदा राज्याला लागू असतो. राज्याला त्यापेक्षा कडक करायचा असेल तर राज्य सरकार कायदा बदलू शकतं. हे अधिकार घटनेने नेमून दिलेले अधिकारी आहेत. कायद्यात बदल करायचे असतील तर राष्ट्रपतींची अनुमती मिळते”, असं तावडे म्हणाले.

राज्यातील विधान परिषदेच्या सहा जागांच्या निवडणुकीत भाजपचा पराभव झाला. यावरदेखील तावडेंनी प्रतिक्रिया दिली. “पराभव एक झाला तरी सर्वच संपले किंवा त्यांच्या बाजूनी सर्व आहे असं नाही. थोडंफार मागे-पुढे होतं. याशिवाय त्यातून नवीन गोष्टी चांगल्या पद्धतीने उभ्या राहतील. महाविकास आघाडीची तीन पक्षांची ताकदीचाअंदाज चुकला हे फडणवीसांचे म्हणणे बरोबर आहे”, असं विनोद तावडे म्हणाले.

हेही वाचा :

FARMER PROTEST | कृषी कायद्यावर विरोधी पक्षांची भूमिका दुतोंडी ? केंद्रीय कायदा मंत्र्यांचा हल्लाबोल 

FARMER PROTEST | शरद पवार ‘वाहत्या गंगेत’ हात धुवून घेतायत?

FARMER PROTEST | भाजपचा अजून एक मित्रपक्ष NDAतून बाहेर पडणार? 8 डिसेंबरनंतर निर्णय!

FARMER PROTEST | शेतकऱ्यांनी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला काँग्रेस, टीआरएस आणि ‘आप’चा पाठिंबा

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.