नगर शहराच्या विकासासाठी राष्ट्रवादीचा भाजपला पाठिंबा : संग्राम जगताप

अहमदनगर : राजकारणात कोण कशासाठी काय करेन याचा काही नेम नाही. अहमदनगर महापालिकेत झालेल्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीची सध्या सर्वत्र चर्चा आहे. पण आम्ही भाजपला शहराच्या विकासासाठी पाठिंबा दिला, असं स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे अहमदनगरचे आमदार संग्राम जगताप यांनी दिलंय. अहमदनगरला राष्ट्रवादीच्या मदतीने भाजपाचा महापौर आणि उपमहापौर निवडून आलाय. मात्र हा निर्णय शहराच्या विकासासाठी घेण्यात […]

नगर शहराच्या विकासासाठी राष्ट्रवादीचा भाजपला पाठिंबा : संग्राम जगताप
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:46 PM

अहमदनगर : राजकारणात कोण कशासाठी काय करेन याचा काही नेम नाही. अहमदनगर महापालिकेत झालेल्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीची सध्या सर्वत्र चर्चा आहे. पण आम्ही भाजपला शहराच्या विकासासाठी पाठिंबा दिला, असं स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे अहमदनगरचे आमदार संग्राम जगताप यांनी दिलंय.

अहमदनगरला राष्ट्रवादीच्या मदतीने भाजपाचा महापौर आणि उपमहापौर निवडून आलाय. मात्र हा निर्णय शहराच्या विकासासाठी घेण्यात आल्याचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितलं. वाचा राज्याचं गणित बिघडवणाऱ्या अहमदनगर महापौर निवडणुकीतील 18 मुद्दे

याविषयी राज्यातील कोणत्याच नेत्यांशी चर्चा झाली नव्हती. तशी कोणाला माहिती देखील नव्हती, तर हा ऐन वेळी झालेला निर्णय आहे. निवडणुकीपूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहराच्या विकासासाठी मोठा निधी उपलब्ध करून देऊ, असं आश्वासन दिलं होतं, असाही खुलासा संग्राम जगताप यांनी केलाय. वाचाशिवसेनेने माझ्याकडे मदत मागितली, छिंदमकडून कॉल रेकॉर्डिंग व्हायरल

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी काल आम्हाला विकासाचं आश्वासन दिलं आहे. त्यामुळे मी आणि नगरसेवकांनी मिळून हा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय स्थानिक पातळीवर झाला असून याचा वरिष्ठ नेत्याचा कोणताही संबंध नसल्याचा दावा संग्राम जगताप यांनी केला. वाचाअहमदनगरमध्ये सासऱ्याची जावयाशी युती, तिसऱ्या नंबरवरील भाजपचा महापौर

महापौर निवडणुकीत नेमकं काय झालं?

अहमदनगर महानगरपालिका महापौर निवडणुकीत भाजप आमदार शिवाजी कर्डिलेच किंगमेकर ठरले आहेत. कारण 14 जागा मिळवून तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या भाजपने राष्ट्रवादी काँग्रेससोबत अभद्र युती करत, महापौरपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला आहे. महापालिका निवडणुकीत शिवसेना 24 जागांसह पहिल्या क्रमांकावर होती, मात्र भाजपने स्वत:चे 14 अधिक दुसऱ्याक्रमांकावरील राष्ट्रवादीचे 18 तसंच बसपाचे 4 आणि अपक्ष 1 असा मिळून 37 जागांचं बळ भाजपच्या पदरात पडलं. त्यामुळे भाजपचे बाबासाहेब वाकळे महापौरपदी विजयी झाले.

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.