AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोदीजी आय एम सॉरी, मी शपथग्रहण सोहळ्याला येणार नाही : ममता बॅनर्जी

नवी दिल्‍ली : पश्चिम बंगालच्या मुख्‍यमंत्री ममता बनर्जी या नरेंद्र मोदी यांच्या शपथग्रहण कार्यक्रमाला हजर राहणार नाहीत. बंगालमध्ये झालेल्या राजकीय हिंसाचारात 54 जणांचा मृत्यू झाला, असा दावा भापज कार्यकर्त्यांनी केला होता. या आरोपांमुळे ममता यांनी मोदींच्या शपथग्रहण कार्यक्रमाला उपस्थित न राहाण्याचा निर्णय घेतला आहे. ममता बॅनर्जी यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली. त्यांनी मोदींना पुन्हा एकदा […]

मोदीजी आय एम सॉरी, मी शपथग्रहण सोहळ्याला येणार नाही : ममता बॅनर्जी
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Updated on: May 29, 2019 | 6:58 PM
Share

नवी दिल्‍ली : पश्चिम बंगालच्या मुख्‍यमंत्री ममता बनर्जी या नरेंद्र मोदी यांच्या शपथग्रहण कार्यक्रमाला हजर राहणार नाहीत. बंगालमध्ये झालेल्या राजकीय हिंसाचारात 54 जणांचा मृत्यू झाला, असा दावा भापज कार्यकर्त्यांनी केला होता. या आरोपांमुळे ममता यांनी मोदींच्या शपथग्रहण कार्यक्रमाला उपस्थित न राहाण्याचा निर्णय घेतला आहे.

ममता बॅनर्जी यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली. त्यांनी मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच, बंगाल हिंसाचार प्रकरणी करण्यात येत असलेले सर्व आरोप हे तथ्यहीन आहेत, त्यामुळे त्या नाईलाजाने मोदींच्या शपथग्रहण कार्यक्रमात सहभागी होऊ शकणार नाहीत, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.

“बंगालमध्ये कुठलीही राजकीय हत्या झालेली नाही. या हत्या वैयक्तिक शत्रूता, कौटुंबीक वाद आणि इतर विवादांमुळे झाल्या असाव्या. यांचा राजकारणाशी संबंध नाही. आमच्याजवळ असा कुठलाही रेकॉर्ड नाही”, असं स्पष्टीकरण ममता बॅनर्जींनी दिलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मंत्रिमंडळातील काही सदस्य गुरुवारी 30 मे रोजी शपथ ग्रहण करतील. यावेळी बिम्सटेक देशांचे प्रतिनिधी, ख्यातनाम लोक, राजकारणी आणि 54 विशेष पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. त्याशिवाय किर्गिस्तानचे राष्ट्रपती सुरोन्बे जीनबेकोव आणि मॉरिशअसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जगन्नाथ हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. तसेच, गेल्या काही वर्षात पश्चिम बंगालमध्ये राजकीय हिंसाचारात मृत्यू पावलेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांना आवर्जून आमंत्रित करण्यात आलं आहे, अशी माहिती भारतीय जनता पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने दिली.

नरेंद्र मोदींच्या शपथग्रहण सोहळ्याला कोण-कोण येणार

  • सर्व भाजप मुख्यमंत्री
  • सर्व एनडीए मुख्यमंत्री
  • प्रत्येक राज्याची लोकसभा निवडणूक नियोजन समिती
  • भारतातील सर्व देशाचे राजदूत
  • माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग
  • माजी राष्ट्रपती प्रतिभा सिंग पाटील
  • माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी
  • सर्व भाजप खासदार
  • पंजाब मुख्यमंत्री कॅप्टन अमेन्द्रसिंग
  • दिल्ली मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल
  • काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी
  • रजनीकांत
  • कमल हसन

शपथग्रहण सोहळ्याला कोण गैरहजर राहणार

  • पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी
  • तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलमीस्वामी

पश्चिम बंगालमध्ये भाजपची स्थिती

नुकत्याचं पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपने ऐतिहासिक असा विजय मिळवला. देशात भाजपप्रणित एनडीएने 542 पैकी 352 जागांवर विजय मिळवला. पश्चिम बंगालमध्येही पक्षाची कामगिरी उल्लेखनिय ठरली. तृणमूल काँग्रेसची एकहाती सत्ता असलेल्या पश्चिम बंगालमध्ये भाजपने 18 जागा जिंकल्या. गेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये ही संख्या केवळ दोन होती.

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली