AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : राज्यात पुरात 100 लोक दगावले, कुठे आहेत राज्यपाल?; संजय राऊत यांचा सवाल

Sanjay Raut : केंद्र सरकारने काही शब्दांवर बंदी घातली आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. या शब्दांवर बंदी घालण्याची वेळ सध्याच्या सरकारवर का आली? कारण हे शब्द याच सरकारविरोधात वापरले जाऊ शकतात, त्यामुळे हा निर्णय घेतला का? भ्रष्ट, गद्दार हा शब्द असंसदीय नाही.

Sanjay Raut : राज्यात पुरात 100 लोक दगावले, कुठे आहेत राज्यपाल?; संजय राऊत यांचा सवाल
राज्यात पुरात 100 लोक दगावले, कुठे आहेत राज्यपाल?; संजय राऊत यांचा सवालImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jul 14, 2022 | 11:05 AM
Share

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , गुलाबराव पाटील (gulabrao patil) आणि शिवसेनेचे इतर बंडखोर नेते हे शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांच्या रडारवर होते. या बंडखोरांवर टीका करण्याची राऊत एकही संधी सोडत नव्हते. मात्र, राऊत यांच्या रडारवर आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (bhagat singh koshyari) आले आहेत. राज्यात पूर आहे, जोरदार पाऊस पडत आहे. वादळाची स्थिती आहे. कॉलराचं थैमान आहे. विविध ठिकाणी 100 लोकांचा पुरात वाहून गेल्याने मृत्यू झाला आहे. आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी कुठे आहेत? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. अशा परिस्थितीत राज्यपाल आम्हाला खूप सल्ला द्यायचे. आता त्यांची गरज आहे. आता त्यांना ही परिस्थिती दिसत नाही का? असा संतप्त सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. राज्यात 100हून अधिक लोक दगावले आहेत. आता राज्यपाल कुठे आहेत? राज्यात वादळ आहे. पूर आहे. पावसाने थैमान घातलं आहे. अनेक ठिकाणी कॉलराने डोकंवर काढलं आहे. रुग्णालयांची अवस्था वाईट आहे. राज्यपाल कुठे आहेत? आम्हाला ते खूप सल्ले द्यायचे. आता त्यांची खरी गरज आहे. आता त्यांनी बोललं पाहिजे. पण राज्यपाल आहेत कुठे? असा सवाल संजय राऊत यांनी केला.

मंत्र्यांना शपथ देणं राजद्रोह

महाराष्ट्र परत लॉकडाऊनमध्ये गेला आहे. काहीच सुरू झाला नाही. 100 हून अधिक लोक महापुरात वाहून गेले. मृत्यूमुखी पडले. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कॉलराचं थैमान आहे. लोक मृत्यूमुखी पडत आहेत. सरकार अस्तित्वात नाही. शपथ घेतली म्हणजे सरकार आलं असं नाही. 12 दिवस झाले तरी सरकार अस्तित्वात नाही. कारण दोन लोकांचं सरकार हे बेकायदेशीर आहे. आमदार अपात्रं ठरू शकतात. त्यांना शपथ देणं हा राजद्रोह आहे. हे घटनाबाह्य कृत्य आहे. हा राजकीय भ्रष्टाचार आहे. त्याची भीती असल्याने त्यांना रोखलं असावं. राज्यपालांनी कोणतंही घटनाद्रोही कृत्य करू नये, असं ते म्हणाले.

याच सरकार विरोधात ते शब्द वापरले जाऊ शकतात

केंद्र सरकारने काही शब्दांवर बंदी घातली आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. या शब्दांवर बंदी घालण्याची वेळ सध्याच्या सरकारवर का आली? कारण हे शब्द याच सरकारविरोधात वापरले जाऊ शकतात, त्यामुळे हा निर्णय घेतला का? भ्रष्ट, गद्दार हा शब्द असंसदीय नाही. तरीही बंदी का? भ्रष्टाचार संपला काय? तरीही भ्रष्ट शब्द वापरायचा नाही. गद्दार हा शब्द तर इतिहास काळापासूनचा आहे. तो शब्द चुकीचा कसा आहे. गद्दाराला गद्दार नाही तर काय म्हणणार? भ्रष्टाचारी व्यक्तीला भ्रष्ट नाही तर काय म्हणायचं? असा सवालही त्यांनी केला.

Follow Us
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या...
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या हलाचाली, नेमकं काय घडलं?
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या विधानाची चर्चा, नेमकं काय म्हणाले?
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप प्रदेशाध्यक्षांच्या भेटीला; नेमकं काय घडतंय?*
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट...
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट म्हणाल्या न्याय देण्यासाठी...
खो-खो, कबड्डी... राजकारणाचा खेळ करू नका; भुजबळांचा अप्रत्यक्ष निशाणा
Chhagan Bhujbal | खो-खो, कबड्डी, बुद्धिबळ... राजकारणाचा खेळ करू नका; भुजबळांचा अप्रत्यक्ष निशाणा
बीड पुन्हा हादरलं! पंचायतीच्या कार्यालयाजवळच...समाधान खिंडकरांना
बीड पुन्हा हादरलं! पंचायतीच्या कार्यालयाजवळच...समाधान खिंडकरांना बेदम मारहाण
एसटी कर्मचाऱ्यांना मोठी लॉटरी, महागाई भत्त्यात मोठी वाढ
Pratap Sarnaik | एसटी कर्मचाऱ्यांना मोठी लॉटरी, महागाई भत्त्यात मोठी वाढ; सरकारचा निर्णय काय
कबड्डीचा उत्कृष्ट डाव खेळणारे भुजबळ... पक्षाच्या वर्धापन दिनी सुनील
कबड्डीचा उत्कृष्ट डाव खेळणारे भुजबळ... पक्षाच्या वर्धापन दिनी सुनील तटकरे भरमंचावरुन हे काय बोलले?
ठाकरे गटाला पुन्हा धक्का? शिरसाटांच्या वक्तव्याने ऑपरेशन टायगरची चर्चा
ठाकरे गटाला पुन्हा धक्का? अनेक आमदार-खासदार संपर्कात; शिरसाटांच्या वक्तव्याने ऑपरेशन टायगरची चर्चा!
कृषीमंत्री दत्ता भरणे पुन्हा अडचणीत; कोट्यावधींच्या धान घोटाळ्याचा
कृषीमंत्री दत्ता भरणे पुन्हा अडचणीत; कोट्यावधींच्या धान घोटाळ्याचा आरोप झालेल्या मोटवानीसोबतचे फोटोसेशन चर्चेत