AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shiv Sena : बंड राज्यव्यापी, मग ठाणे नाही, कल्याण नाही, पुणे नाही, औरंगाबाद नाही, मेळावे मुंबईतच का?; शिवसेनेची नेमकी स्टॅटेजी काय?

Shiv Sena : मुंबई, ठाण्यासह राज्यात काही ठिकाणी महापालिकेच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकांना अवघे काही महिने बाकी असतानाच शिवसेनेत उभी फूट पडली आहे. विशेष म्हणजे महत्त्वाच्या महापालिकेतील आमदारच शिवसेनेला सोडून गेले आहेत.

Shiv Sena : बंड राज्यव्यापी, मग ठाणे नाही, कल्याण नाही, पुणे नाही, औरंगाबाद नाही, मेळावे मुंबईतच का?; शिवसेनेची नेमकी स्टॅटेजी काय?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 26, 2022 | 2:29 PM
Share

मुंबई: शिवसेना नेते एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी बंड केलं आहे. त्यांच्यासोबत एकूण 55 आमदारांनीही बंड केलं. त्यापैकी 40 आमदार हे शिवसेनेचे असल्याचं सांगितलं जात आहे. एकनाथ शिंदे यांचं बंड हे केवळ ठाणे आणि मुंबई (mumbai) पुरतं मर्यादित नाही. तर राज्यव्यापी आहे. मात्र, तरीही शिवसेनेने केवळ मुंबईवरच फोकस केला आहे. शिवसेनेने (shivsena) केवळ मुंबईतच मेळावे घेण्यास सुरुवात केली आहे. राज्यव्यापी बंड असताना आणि अख्खा ठाणे जिल्हा हातातून जात असतानाही शिवसेनेने केवळ मुंबईवरच लक्ष केंद्रीत केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. बंडखोरांच्या जिल्ह्यात शिवसेनेकडे नेता नाहीये का? शिवसेनेला मुंबईच महत्त्वाची वाटत आहे का? केवळ मुंबईतच मेळावे घेण्यासाठी शिवसेनेची स्टॅटेजी नेमकी काय आहे? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे.

मुंबई, ठाण्यासह राज्यात काही ठिकाणी महापालिकेच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकांना अवघे काही महिने बाकी असतानाच शिवसेनेत उभी फूट पडली आहे. विशेष म्हणजे महत्त्वाच्या महापालिकेतील आमदारच शिवसेनेला सोडून गेले आहेत. मुंबईतील तीन ते चार आमदारांनी शिंदे गटाची वाट धरली आहे. तर ठाण्यातून एकनाथ शिंदे, पालघरमधून एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आहे. त्यामुळे संघटनात्मक आणि आर्थिक रसद पुरवणाऱ्याच नेत्यांनी बंड केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. तर औरंगाबादमध्ये अब्दुल सत्तार यांच्यासह सहा आमदारांनी बंड केलं आहे. त्यामुळे शिवसेनेत एकच खळबळ उडाली आहे.

तीन महापालिका महत्त्वाच्या पण…

शिवसेनेसाठी मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, औरंगाबाद, या महापालिका नेहमीच महत्त्वाच्या राहिल्या आहेत. त्यातही मुंबई आणि ठाणे महापालिका अत्यंत महत्त्वाची राहिली आहे. त्यामुळे शिवसेनेने या महापालिकांकडे सर्वाधिक लक्ष दिलं आहे. मात्र, राज्यव्यापी बंड झालेलं असतानाही शिवसेनेने केवळ मुंबईवरच लक्ष केंद्रीत केलं आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि औरंगाबादमध्ये पक्ष सावरण्याची सर्वाधिक गरज असताना शिवसेनेने मुंबईतच मेळावे घेण्यावर भर दिल्यानेही आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

कारण काय?

मुंबईत जे काही घडतं. त्याचा मेसेज देशात जातो. मुंबईतील आंदोलन आणि रॅलीचे पडसादही देशभर उमटतात. त्यामुळे शिवसेनेने मुंबईत मेळावे घेण्यावर भर दिल्याचं सांगितलं जात आहे. या मेळाव्यातून देशभरात मेसेज देण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. मुंबईत शक्तीप्रदर्शन करून इतर जिल्ह्यातील शिवसैनिकांना कामाला लागण्याचे आदेश देण्यामागची ही स्टॅटेजी आहे. शिवाय महापालिका निवडणुका असल्याने मुंबईतील शिवसेना संघटन मजबूत करणं हा त्यामागचा हेतू असल्याचंही सांगितलं जात आहे. त्यामुळेही शिवसेनेने मुंबईवर भर दिला आहे. राज्यातील सत्ता केव्हाही हातातून जाऊ शकते. पण मुंबईतील शिवसेना हातून जाऊ नये यासाठी शिवसेनेने प्रयत्न सुरू केल्याचंही सूत्रांनी सांगितलं.

Follow Us
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना...
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा