AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ मतदारसंघात दादागिरी चालणार नाही, पोलीस आपल्यासोबत : प्रकाश आंबेडकर

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभांमध्ये सत्ताधारी भाजप-शिवसेनेसह काँग्रेस-राष्ट्रवादीवरही जोरदार टीका केली.

'या' मतदारसंघात दादागिरी चालणार नाही, पोलीस आपल्यासोबत : प्रकाश आंबेडकर
| Updated on: Oct 16, 2019 | 10:51 PM
Share

पुणे: वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभांमध्ये सत्ताधारी भाजप-शिवसेनेसह काँग्रेस-राष्ट्रवादीवरही जोरदार टीका केली. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar on Ajit Pawar) म्हणाले, “पिंपरी चिंचवड मतदारसंघात एक दादागिरी चालते. तशी दादागिरी केंद्रात देखील चालते. मात्र आता पोलीस आपल्यासोबत आहेत. त्यामुळे या मतदारसंघात दादागिरी चालणार नाही.” यातून आंबेडकरांनी अजित पवार यांच्यावर (Prakash Ambedkar on Ajit Pawar) निशाणा साधल्याचं बोललं जात आहे. ते पिंपरी चिंचवड येथे प्रचारसभेत बोलत होते.

प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही जोरदार टीका केली. आंबेडकर म्हणाले, “निवडणुकीत यश येत नाही, तेव्हा मोदी बॉम्बस्फोट होण्याची शक्यता आहे, देशाला धोका आहे, असं सांगतात. मात्र, आपल्याकडे पोलीस आहेत. असा धोका असेल तर तो शोधून काढला पाहिजे. मात्र, तसे होत नाही. केवळ निवडणूक आली की देशाला धोका होतो आणि निवडणूक संपली की धोका जातो. निवडणूक आली की लोकांना भावनात्मक करायचं आणि मत मिळवायची. त्यातून सत्ता मिळवायची असंच काम सुरू आहे.” मध्यम वर्गीय नागरिकांनी खोट्या राष्ट्रवादाला बळी पडू नये, असंही आवाहन आंबेडकरांनी केलं.

सोलापूर, लातूर भागात दुष्काळ पडतो. मात्र, तेथे छावण्या होत नाहीत. ज्या छावण्या झाल्या त्या अगदी पावसाळ्यात सुरू झाल्या, असाही आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. कोल्हापूर, सांगली, सातारामध्ये पूर परिस्थिती होती. या सरकारने काहीच मदत केली नाही. उलट लोकांनी एकमेकांना मदत केली. मुख्यमंत्री विमानाने येऊन घिरट्या घालून परत गेले, तर त्यांचा दुसरा मंत्री सेल्फी काढत होता, असंही आंबेडकर म्हणाले.

“2 बँका बुडाल्या, अजून 5 बँका बुडणार”

प्रकाश आंबडेकरांनी बँकाच्या स्थितीवरही भाष्य केलं. आता तर 2 बँका बदलल्या आहेत, अजून 5 बँका बुडणार आहेत, असंही भाकीत आंबेडकरांनी केलं. ते म्हणाले, “आर्थिक संकटाबाबत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा सल्ला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन घेणार असल्याचं कळतं आहे. मात्र, ही आर्थिक मंदी नैसर्गिक नसून अनैसर्गिक आहे.”

Follow Us
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया.
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान.
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका.
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका.
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता.
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात.