AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astrology 2025 : जून महिन्यात गुरुच्या स्थितीमुळे तीन राशींचं नशिब फळफळणार, असा मिळेल फायदा

ज्योतिषशास्त्रात ग्रहांची स्थिती खूपच महत्त्वाची असते. ग्रहांनी राशीबदल किंवा स्थितीत बदल झाला तर राशीचक्रावर परिणाम दिसून येतो. गुरु ग्रह जून महिन्यात अस्ताला जाणार आहे. त्यामुळे तीन राशींचं भलं होणार आहे. चला जाणून घेऊयात सविस्तर

Astrology 2025 : जून महिन्यात गुरुच्या स्थितीमुळे तीन राशींचं नशिब फळफळणार, असा मिळेल फायदा
गुरु ग्रह
| Updated on: May 08, 2025 | 3:05 PM
Share

ज्योतिषशास्त्रात गुरु ग्रहाचं महत्त्व आहे. ग्रहमंडळातील सर्वात मोठा ग्रह म्हणून ख्याती आहे. यावरून गुरु ग्रहाचं कुंडलीत चांगल्या स्थितीत असणं महत्त्वपूर्ण ठरतं. गुरु ग्रहाला ज्ञान, धन, संतान आणि धर्माचा कारक मानलं जातं. त्यामुळे गुरु ग्रहाची स्थिती बदलली तर राशीचक्रावर त्याचा परिणाम होतो. गुरु ग्रहाने जवळपास एका वर्षाने मिथुन राशीत प्रवेश केला आहे. आता राशी बदल केल्यानंतर पुढच्या महिन्यात म्हणजेच जून महिन्यात गुरु ग्रहाच्या स्थितीत बदल होणार आहे. गुरु ग्रह 12 जूनला संध्याकाळी 7 वाजून 37 मिनिटांनी मिथुन राशीत अस्ताला जाणार आहे. जवळपास गुरु ग्रहाची 27 दिवस अशी स्थिती असणार आहे. गुरू ग्रहाला 9 जूनला पुन्हा एकदा तेज प्राप्त होईल. पण हे 27 दिवस काही राशींसाठी चांगले जाणार आहेत. चला जाणून घेऊयात या राशी कोणत्या त्या…

मेष : या राशीच्या तिसऱ्या स्थानात गुरु ग्रह अस्ताला जाणार आहे. त्यामुळे या राशीच्या जातकांना याची चांगली फळं मिळतील. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेले नकारात्मक परिणाम दूर होतील. कौटुंबिक पातळीवर चांगले संबंध प्रस्थापित होतील. गेल्या काही दिवसांपासून अडकलेली सरकारी कामं मार्गी लागतील. न्यायालयीन प्रकरणातही यश मिळेल. नशिबाची साथही मिळेल.

धनु : या राशीच्या नवव्या म्हणजेच भाग्य स्थानात गुरु ग्रह अस्ताला जाणार आहे. गुरुची स्थिती या राशीसाठी फलदायी ठरणार आहे. काही कामं चुटकीसरशी पूर्ण होतील. आत्मविश्वास वाढ झाल्याचं दिसून येईल. समाजात मानसन्मान मिळेल. पण या कालावधीत लांबचा प्रवास करणं टाळा. या कालावधीत शत्रूपीडा काही अंशी कमी होऊ शकते.

वृषभ : या राशीच्या दुसऱ्या स्थानात गुरु ग्रह अस्ताला जाणार आहे. धनस्थान असल्याने या स्थितीचा या राशीला फायदा होईल. या राशीच्या जातकांना चांगले परिणाम अनुभवण्यास मिळतील. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील. गेल्या काही दिवसांपासून असलेल्या अडचणी दूर होतील. खासकरून अडकलेले पैसे परत मिळतील. इतकंच काय तर जीवनात सुख समृद्धी येऊ शकते.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत... पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट
Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे...
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णय
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा
स्वार्थासाठी गेले, जनता हिशोब चुकता करणार! नाईकांचा खासदारांना इशारा
Vaibhav Naik | स्वार्थासाठी गेले, आता जनता हिशोब चुकता करणार! वैभव नाईकांचा फुटीर खासदारांना इशारा
विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट
Beed | विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट निर्णय घेतला; लवकरच...
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं!
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं! त्या वादाला आता नवं वळण!
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता बड्या नेत्याचं विधान चर्चेत