AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

22 जानेवारीपासून शनि-यम यांची अद्भूत स्थिती, अर्धकेंद्र योगामुळे तीन राशींचं नशिब चमकणार

ग्रहमंडळात ठराविक कालावधीनंतर ग्रहांची स्थिती बदलत असते. या ग्रहांच्या युती आघाडीमुळे काही शुभ अशुभ योग तयार होत असतात. असाच एक दुर्मिळ योग शनि आणि यम ग्रहामुळे 22 जानेवारीला तयार होत आहे.

22 जानेवारीपासून शनि-यम यांची अद्भूत स्थिती, अर्धकेंद्र योगामुळे तीन राशींचं नशिब चमकणार
| Updated on: Jan 07, 2025 | 4:16 PM
Share

राशीचक्रात तसं पाहिलं तर नऊ ग्रहांचं गणित मांडलं जातं. पण प्लूटो ग्रहाची स्थितीही तितकीच महत्त्वाची मानली जाते. प्लूटो ग्रहाला यम ग्रह असंही संबोधलं जातं. त्यामुळे या ग्रहाची स्थितीही राशीचक्रावर परिणाम करणारी असते. यम ग्रह एका राशीत जवळपास 17-18 वर्षे विराजमान असतात. नोव्हेंबर 2021 मध्ये प्लूटो अर्थात यम ग्रहाने मकर राशीत प्रवेश केला होता. आता 27 मार्च 2039 पर्यंत याच राशीत राहणार आहे. दुसरीकडे, न्यायदेवता शनिदेव 30 वर्षांनंतर एका राशीत फिरून येतात. तसेच जातकाच्या कर्मानुसार फळं देतात. 22 जानेवारीला शनि आणि यम ग्रहाची एक अद्भुत स्थिती राशीचक्रावर परिणाम करणारी असणार आहे. 22 जानेवारील 2024 रोजी दोन्ही ग्रह सकाळी 9 वाजून 24 मिनिटांनी एकमेकांपासून 45 डिग्रीत असणार आहेत. यामुळे अर्धकेंद्र योग तयार होणार आहे. यामुळे काही राशीच्या जातकांना लाभ मिळणार आहे. चला जाणून घेऊयात या राशींबाबत

कन्या : अर्धकेंद्र योग या राशीच्या जातकांसाठी लाभदायक ठरणार आहे. गेल्या काही दिवसांपासून काम करत असलेल्या क्षेत्रात अपेक्षित यश मिळेल. गेल्या काही दिवसांपासून अडकलेली कामं मार्गी लागतील. कौटुंबिक पातळीवर आनंदाचं वातावरण राहील. गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही योग्य वेळ आहे. पण तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने गुंतवणूक फायदेशीर ठरेल.

तूळ : या राशीसाठी हा कालावधी अंत्यत चांगला जाणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या अध्यात्मिक वाटचालीला गती मिळेल. अध्यात्मिक उन्नती होईल. धार्मिक आणि तीर्थक्षेत्रांचं दर्शन घेण्याचा योग जुळून येईल. नोकरी धंद्यात अपेक्षित यश मिळेल. आरोग्यविषयक तक्रारी दूर होतील.

मीन : या राशीला साडेसाती सुरु आहे. असं असलं तर अर्धकेंद्र योग लाभदायी ठरेल. या काळात यशाची नवी शिखरं गाठाल. आपण जसं बोलू तसं काही तरी घडताना दिसेल. कौटुंबिक पातळीवर तुमच्या शब्दाला मान असेल. तुम्ही बोलाल तसं वागण्याचा प्रयत्न होईल. त्यामुळे कामंही झटपट होतील आणि अपेक्षित यश मिळेल.

(डिस्क्लेमर: वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.