AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘चीन आणि मुस्लीम राष्ट्रे भारतावर हल्ला करतील’, तिसऱ्या महायुद्धाबाबत 16 शतकातच या संतानं केलीये मोठी भविष्यवाणी

जगाला तिसऱ्या महायुद्धाचा देखील सामना करावा लागणार आहे. या महायुद्धामध्ये भारताची मुख्य भूमिका असेल असा दावा या भाकीतामध्ये करण्यात आलेला आहे.

'चीन आणि मुस्लीम राष्ट्रे भारतावर हल्ला करतील', तिसऱ्या महायुद्धाबाबत 16 शतकातच या संतानं केलीये मोठी भविष्यवाणी
Image Credit source: टीव्ही 9 भारतवर्ष
| Updated on: May 03, 2025 | 3:27 PM
Share

संत अच्युतानंद दास हे 16 व्या शतकातील मोठे संत होते. त्यांनी ‘भविष्य मालिका’ नावाचं पुस्तक लिहीलं. या पुस्तकामध्ये त्यांनी कलियुगाचा अंत कसा होणार? जगात काय -काय घटना घडणार याबाबत मोठं भाकीत केलं आहे. अच्युतानंद दास यांनी जे भाकीतं वर्तवलेले आहेत, त्यातील अनेक भविष्यवाणी या ओडिशा आणि भगवान जगन्नाथ मंदिराच्या संबंधित आहेत. कारण अच्युतानंद दास हे ओडिशामध्ये राहत होते. जगन्नाथ पुरीमध्ये असलेलं भगवान जगन्नाथ यांचं मंदिर जगप्रसिद्ध आहे. अच्युतानंद दास यांनी आपल्या ‘भविष्य मालिका’ या पुस्तकामध्ये अनेक मोठे भाकीतं केली आहेत. त्यांनी तिसऱ्या महायुद्धाबाबत देखील मोठी भविष्यवाणी केली आहे, या युद्धात भारताची मोठी भूमिका असेल असंही त्यांनी म्हटलं आहे. जाणून घेऊयात या भविष्यवाणीबद्दल

संत अच्युतानंद दास यांनी आपल्या भविष्य मालिका या पुस्तकामध्ये असा दावा केला आहे की जेव्हा कलियुगाचा अंत जवळ येईल तेव्हा आकाशात दोन सूर्य दिसायला लागतील. दुसरा सूर्य जो असेल तो खरा सूर्य नसेल तर तो एक मोठा उल्कापिंड असेल. हा उल्कापिंड बंगालच्या खाडीमध्ये पडेल, तेव्हा देशात मोठा जलप्रलय येईल असं भाकीत अच्युतानंद दास यांनी वर्तवलं आहे.

तिसऱ्या महायुद्धाबाबत देखील त्यांनी मोठी भविष्यवाणी केली आहे. जगाला तिसऱ्या महायुद्धाचा देखील सामना करावा लागणार आहे. या महायुद्धामध्ये भारताची मुख्य भूमिका असेल, तिसरं महायुद्ध 6 वर्ष आणि 6 महिने चालेल चीन आणि मुस्लीम राष्ट्रं भारतावर हल्ला करतील, मात्र भारत हे सर्व हल्ले परतून लावेल, तिसऱ्या महायुद्धात भारत विजयी होईल, भारत विश्वगुरू होईल असं या ‘भविष्य मालिके’मध्ये दावा करण्यात आला आहे.

अच्युतानंद दास यांनी भूकंपाबाबत देखील मोठं भाकीत केलं आहे, कलियुगात पृथ्वीवर एवढे भूकंप होतील की त्यामुळे पृथ्वीची प्राकृतिक रचना बदलून जाईल, त्यामुळे जगात काही नव्या समस्या निर्माण होऊ शकतात असं त्यांनी म्हटलं आहे.

डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.

Follow Us
गटातटांनी राष्ट्रवादीला पोखरलं... थेट सुनेत्रा पवार मैदानात उतरणार...
गटातटांनी राष्ट्रवादीला पोखरलं... थेट सुनेत्रा पवार मैदानात उतरणार....
ठो ठो आवाज आला... एकदा नव्हे दोनदा... नागपूरमधल्या गजबजलेल्या भागात...
ठो ठो आवाज आला... एकदा नव्हे दोनदा... नागपूरमधल्या गजबजलेल्या भागात....
मुंबईत मराठी फलक नाही? मग कारवाई अटळ; हजारो आस्थापनांची तपासणी....
मुंबईत मराठी फलक नाही? मग कारवाई अटळ; हजारो आस्थापनांची तपासणी.....
राष्ट्रवादीत मोठी धुसफूस! पार्थ पवार vs तटकरे- पटेल?
राष्ट्रवादीत मोठी धुसफूस! पार्थ पवार vs तटकरे- पटेल?.
ही वादळापूर्वीची शांतता….डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्याने जगभरात तणाव
ही वादळापूर्वीची शांतता….डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्याने जगभरात तणाव.
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही..
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही...
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी..
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्....
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?.
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात....
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात.....