AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astrology: वर्षभरासाठी गुरु ग्रहाचा मीन राशीत मुक्काम, या राशींना मिळणार विशेष लाभ

ज्योतिषशास्त्रामधे (Astrology) गुरु ग्रहाला (Jupiter) विशेष स्थान आहे. ज्ञान, वृद्धी, शिक्षक, संतती, शिक्षण संपत्ती, परोपकार, पिता-पुत्राच्या नातेसंबंध इत्यादींचा हा कारक ग्रह आहे.  जेव्हा जेव्हा गुरु ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा या सर्व घटकांवर त्याचा प्रभाव पडतो. यासोबतच गुरूच्या राशींवरही बृहस्पती परिवर्तनाचा परिणाम होतो. गुरू ग्रहाने 12 एप्रिलला मीन राशीत प्रवेश केला आहे. […]

Astrology: वर्षभरासाठी गुरु ग्रहाचा मीन राशीत मुक्काम, या राशींना मिळणार विशेष लाभ
| Updated on: Jul 20, 2022 | 11:10 AM
Share

ज्योतिषशास्त्रामधे (Astrology) गुरु ग्रहाला (Jupiter) विशेष स्थान आहे. ज्ञान, वृद्धी, शिक्षक, संतती, शिक्षण संपत्ती, परोपकार, पिता-पुत्राच्या नातेसंबंध इत्यादींचा हा कारक ग्रह आहे.  जेव्हा जेव्हा गुरु ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा या सर्व घटकांवर त्याचा प्रभाव पडतो. यासोबतच गुरूच्या राशींवरही बृहस्पती परिवर्तनाचा परिणाम होतो. गुरू ग्रहाने 12 एप्रिलला मीन राशीत प्रवेश केला आहे. जोतिषशास्त्रानुसार 20 जुलैपासून  3 राशींवर विशेष प्रभाव पडेल. चला जाणून घेऊया कोण आहेत या 3 राशी आणि त्यांचा काय फायदा होऊ शकतो.

वृषभ: गुरु राशी बदलताच तुमच्यासाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. कारण तुमच्या राशीतून गुरू ग्रहाने 11 व्या घरात प्रवेश केला आहे. जे उत्पन्न आणि लाभाचे स्थान मानले जाते. त्यामुळे या काळात तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ होईल. यासोबतच उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. व्यवसायात प्रचंड नफा होऊ शकतो. तसेच, यावेळी तुम्हाला सर्व राज सुख मिळतील. आपण या कालावधीत कोणत्याही व्यावसायिक व्यवहारात चांगला नफा कमवू शकता. तुम्हाला तुमच्या कार्यशैलीत सुधारणा देखील पाहायला मिळेल. ज्यांना नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांच्यासाठी वेळ फॅबरमध्ये आहे. तो सुरू करू शकतो. तसेच गुरु हा तुमच्या 8 व्या घराचा स्वामी आहे. त्यामुळे यावेळी संशोधनाशी निगडित असलेल्यांसाठी हा काळ अनुकूल असणार आहे. तुम्ही हिरा रत्न घालू शकता. जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.

मिथुन: गुरू राशी बदलताच तुम्हाला नशीबाची साथ मिळू शकते. कारण तुमच्या दशम भावात गुरु ग्रहाचे भ्रमण झाले आहे. ज्याला नोकरी, व्यवसाय आणि कामाची जागा समजली गेली आहे. त्यामुळे यावेळी तुम्हाला नवीन नोकरी मिळू शकते. कामाच्या ठिकाणी बदलाची शक्यता आहे. यासोबतच तुम्हाला या काळात प्रमोशनही मिळू शकते. व्यवसायात चांगला फायदा होऊ शकतो. तसेच नवीन व्यावसायिक संबंध निर्माण होऊन व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो. त्याचबरोबर मार्केटिंग, निवेदक, चित्रपट क्षेत्र आणि मीडिया या क्षेत्राशी निगडीत असलेल्यांसाठी हा काळ खूप चांगला असणार आहे. तुम्ही पन्ना आणि पुष्कराज घालू शकता, जे तुमच्यासाठी भाग्यवान ठरू शकतात.

कर्क: गुरु ग्रहाचे राशी परिवर्तन होताच तुम्ही चांगली कमाई करू शकता. कारण तुमच्या गोचर कुंडलीवरून गुरु ग्रह नवव्या भावात प्रवेश करत आहे. ज्याला ज्योतिष शास्त्रात भाग्य आणि परदेश प्रवासाचे घर मानले जाते. त्यामुळे या काळात तुम्हाला नशीबाची पूर्ण साथ मिळू शकते. यासोबतच रखडलेली कामेही मार्गी लागणार आहेत. आपण व्यवसायाच्या संदर्भात लहान आणि मोठे प्रवास देखील करू शकता, जे फायदेशीर सिद्ध होऊ शकते.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

अजित पवार यांच्या विमानात बॉम्ब होता का?
अजित पवार यांच्या विमानात बॉम्ब होता का?.
एक स्वीकृत नगरसेवकपद मिळण्यासाठी मनसे आग्रही
एक स्वीकृत नगरसेवकपद मिळण्यासाठी मनसे आग्रही.
सुनेत्रा पवारांचा शपथविधी इतक्या लवकर का? शिवसेना नेत्यांचा सवाल
सुनेत्रा पवारांचा शपथविधी इतक्या लवकर का? शिवसेना नेत्यांचा सवाल.
महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपला MIM चा पाठिंबा?
महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपला MIM चा पाठिंबा?.
कोल्हापूरच्या महापौरपदी रुपाराणी निकम यांची निवड
कोल्हापूरच्या महापौरपदी रुपाराणी निकम यांची निवड.
भाजपचंच वर्चस्व... आठ महापालिकेत कोण बनलं महापौर? घ्या जाणून
भाजपचंच वर्चस्व... आठ महापालिकेत कोण बनलं महापौर? घ्या जाणून.
मोदींचा विद्यार्थ्यांना कानमंत्र, कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा?
मोदींचा विद्यार्थ्यांना कानमंत्र, कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा?.
मुंबईच्या राजकारणात उलथापालथ; शरद पवार गटाचा आवाज सत्ताधाऱ्यांमध्ये
मुंबईच्या राजकारणात उलथापालथ; शरद पवार गटाचा आवाज सत्ताधाऱ्यांमध्ये.
महत्वाच्या महामार्गावर 32 तास वाहतूक ठप्प; प्रशासन यंत्रणेवर सवाल
महत्वाच्या महामार्गावर 32 तास वाहतूक ठप्प; प्रशासन यंत्रणेवर सवाल.
सत्ता हातात आली की शिंगं फुटतात; राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
सत्ता हातात आली की शिंगं फुटतात; राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल.