AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

होळीनंतर राहु आणि शुक्र ग्रहाची होणार युती, 25 दिवस चार राशींची डोकेदुखी वाढणार

मेष राशीत राहु आणि शुक्र यांची युती होणार आहे. यामुळे अशुभ परिणाम भोगावे लागतील. त्यामुळे या दिवसात रोज ओम शुं शुक्राय नम: या मंत्राचा जप करावा. तसेच शुक्रवारी नियमित उपवास करावा. तसेच शुक्रवारी पांढऱ्या रंगांचे वस्त्र परिधान करावेत.

होळीनंतर राहु आणि शुक्र ग्रहाची होणार युती, 25 दिवस चार राशींची डोकेदुखी वाढणार
राहुसोबत युतीमुळे शुक्र होणार दुषित, 25 दिवस चार राशींचं गणित बिघडणार
| Updated on: Feb 20, 2023 | 10:04 PM
Share

मुंबई : ज्योतिषशास्त्रात काही ग्रहांना शुभ, तर काही ग्रहांना पापग्रहाचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे शुभ आणि अशुभ ग्रहांच्या युतीमुळे थोड्या अधिक प्रमाणात वाईट परिणाम भोगावे लागतात. म्हणजे वाईट संगतीत चांगले ग्रहही वाईट फळं देतातं असंच ज्योतिष्याचं म्हणणं आहे. शुक्र हा भौतिक सुख, कला आणि सौंदर्यकारक ग्रह आहे. शुक्राची स्थिती कुंडलीत चांगली असली की चांगली फळं मिळतात. पण राहु, केतु आणि मंगळ या सारख्या पापग्रहांसोबत युती झाली तर शुभ ग्रह तशीच फळं देतात. शुक्र ग्रह मेष राशीत 12 मार्चला प्रवेश करणार आहे. त्यामुळे मेष राशीत राहु आणि शुक्र यांची युती होणार आहे. ही युती 6 एप्रिल 2023 पर्यंत असणार आहे. या दिवसात रोज ओम शुं शुक्राय नम: या मंत्राचा जप करावा. तसेच शुक्रवारी नियमित उपवास करावा. तसेच शुक्रवारी पांढऱ्या रंगांचे वस्त्र परिधान करावेत. चला जाणून घेऊयात या युतीमुळे कोणत्या राशींचं नुकसान होईल.

मेष : शुक्र आणि राहुच्या युती या राशीच्या लग्न भावात होणार आहे. त्यामुळे जोडीदारासोबत वाद होण्याची शक्यता आहे. या काळात तुमचे एखाद्या व्यक्तीसोबत जवळचे संबंध निर्माण होऊ शकतात. त्यामुळे वाद निर्माण होऊ शकतो. दुसरीकडे तरुणांना प्रेमात विरह सहन करावा लागू शकतो. प्रेमाच्या बाबतीत काही घडामोडी या काळात घडतील. कौटुंबिक वाद टाळण्यासाठी या काळात वाणीवर ताबा ठेवा.

वृषभ : राहु शुक्राच्या युतीमुळे जीवनात अडचणी निर्माण होतील.त्यामुळे 25 दिवस जरा जपूनच राहावं. जुने संबंध आपल्या वादाचं कारण ठरू शकतं. प्रेम जीवनात सावधपणे आपली पावलं उचला. यावेळी आपल्या वागण्यावर नियंत्रण ठेवा. तसेच वाद होईल असं अजिबात बोलू नका. कारण यामुळे जोडीदाराचं मन दुखू शकतं.

कन्या : शुक्र राहुच्या युतीमुळे राशीला 25 दिवस नाहक त्रास सहन करावा लागेल. या काळात तुमचं वागणं थोडं बदलेलं दिसेल. व्यवहारात तुम्हाला फटका बसू शकतो. त्यामुळे कोणताही व्यवहार काळजीपूर्वक कराल. तसेच या काळात अपघात होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे वाहन काळजीपूर्वक चालवा. आपल्या जोडीदाराला प्राथमिकता द्या. तसेच कोणतंही चुकीचा निर्णय घेऊ नका.

मीन : शुक्र आणि राहुच्या युतीमुळे मीन राशीला परिणाम भोगावे लागतील. त्यात शनीच्या साडेसातीचा पहिला टप्पा त्यामुळे जास्तच त्रास होईल. वैवाहिक जीवनात अडचण येऊ शकते. कुटुंबाकडून कोणतंही सहकार्य मिळणार नाही. पती आणि पत्नीमध्ये वाद होऊ शकतो. तसेच विनाकारण कौटंबिक वाद होण्याची दाट शक्यता आहे.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.