AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Palmistry : तळहातावरील या 6 चिन्हांमुळे तुम्ही होता मालामाल! काय सांगतं हस्तरेखाशास्त्र जाणून घ्या

तळहातावरील चिन्हांच्या विद्येला हस्तसामुद्रिक म्हणतात.ही भविष्य बघण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींमधली एक लोकप्रिय पद्धत आहे. तळहातांवरच्या रेषा, उंचवटे यांच्या अभ्यासातून ही पद्धत विकसित झाली आहे.

Palmistry : तळहातावरील या 6 चिन्हांमुळे तुम्ही होता मालामाल! काय सांगतं हस्तरेखाशास्त्र जाणून घ्या
तळहातावरील सहा चिन्हांचा अर्थ नीट समजून घ्या, हस्तरेखाशास्त्रानुसार मिळते नशिबाची साथ
| Updated on: Feb 21, 2023 | 4:10 PM
Share

मुंबई : ज्योतिषशास्त्रातील कोष्टकाप्रमाणे हस्तरेखाशास्त्रात तळहातावरील रेषा आणि चिन्हं बरंच काही सांगून जातात. तळहातावरील चिन्हांच्या विद्येला हस्तसामुद्रिक म्हणतात.ही भविष्य बघण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींमधली एक लोकप्रिय पद्धत आहे. तळहातांवरच्या रेषा, उंचवटे यांच्या अभ्यासातून ही पद्धत विकसित झाली आहे. तळहातावरील उंचवटे, बोटांची रचना, खुणा यामुळे भाकीत वर्तवलं जातं. हस्तरेखाशास्त्रानुसरा तळाहातावरील काही चिन्हं तुम्हाला भविष्याचे संकेत देतात. तुम्ही किती नशिबवान आहात आणि भविष्यात श्रीमंतीबाबत सूचना देतात. अशाच काही चिन्हांचा उल्लेख हस्तरेखाशास्त्रात करण्यात आला आहे. यामुळे जातकांना जीवनात सर्व सुख सुविधा यांची प्राप्ती होते. कोणतंही आर्थिक अडचण सहजासहजी भेडसावत नाही. विष्णूपुराणानुसार, हे शास्त्र लक्ष्मीने विष्णूस सांगितले आणि ते समुद्र देवतेने ऐकून त्याचा प्रचार केला असे म्हटले जाते.त्यामुळे याला ‘हस्तमुद्रिका शास्त्र’ असे म्हणतात.

हस्तरेखाशास्त्रनुसार तळहातावरील खुणा

माशाचं चिन्ह – हस्तरेखाशास्त्रानुसार तळहातावर माशाचं चिन्ह असणं शुभ मानलं जातं. अशा जातकांकडे पैशांची कोणतीच कमतरता राहात नाही. यांच्याकडे भरपूर पैसा खेळत राहतो. तसेच विदेश प्रवासाची शक्यता असते. अशा लोकांचं जीवन सुखकर असतं.

हत्तीचं चिन्ह – तळहातावर हत्तीचं चिन्ह असल्यास असा जातक बुद्धीवंत असल्याचं मानलं जातं. अशी लोकं बुद्धीच्या जोरावर बराच पैसा कमवतात.त्यामुळे या लोकांच्या जीवनात तशी कोणतीच अडचण येत नाही.

पालखीचं चिन्ह – काही लोकांच्या हातावर पालखीचं चिन्हं असतं. हे चिन्ह देवी लक्ष्मीशी निगडीत असल्याचं मानलं जातं. हे चिन्हं काही भाग्यवंत लोकांच्या हातावरच असतं. असे लोक शांत आणि धैर्यवान असतात. लग्झरी जीवन जगण्यासोबत भौतिक सुख सुविधा यांना सहज मिळतात.

स्वास्तिक चिन्ह – हिंदू धर्मात स्वास्तिक चिन्हं शुभ मानलं जातं. हे चिन्ह हातावर असलं की ती व्यक्ती लहानपणापासून आरामाचं जीवन जगते. तसेच हात घालेल त्या कामात सहज यश मिळतं. या व्यक्ती मेहनती आणि चिकित्सक वृत्तीच्या असतात. समाजात यांना मानसन्मान मिळतो.

कलश चिन्ह – जे लोक आधात्मिक जीवनशैलीशी जोडलेले असतात त्यांच्या हातावर कलशाचं चिन्हं असत. तसेच यांच्या बोलण्यातही गोडवा दिसून येतो. त्यामुळे समाजात यांना चांगलं स्थान असतं. सुख, वैभव आणि धनाची काहीच कमतरता नसते.

सूर्य चिन्ह – सूर्यदेवांना ग्रहमंडळात राजाचा दर्जा देण्यात आला आहे.त्यामुळे हातावर सूर्याचं चिन्ह असलेले जातक राजासारखं जीवन जगतात. समाजात उच्च पदावर राहून मानसन्मान मिळवतात. याचं आयुष्य सूर्यासारखं उज्ज्वल असतं.

Follow Us
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?.
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह..
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह...
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी.
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला.
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?.
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?.
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप.
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?.
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले.
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा.