AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu tips for kitchen : गरम तव्यावर पाणी टाकल्यास होऊ शकते नुकसान, माता लक्ष्मीची होईल अवकृपा

गरम तव्यावर पाणी टाकल्यास अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. याबद्दल वास्तूशास्त्रामध्ये काय सांगितले आहे, जाणून घेऊयात

Vastu tips for kitchen : गरम तव्यावर पाणी टाकल्यास होऊ शकते नुकसान, माता लक्ष्मीची होईल अवकृपा
| Updated on: May 09, 2022 | 8:37 AM
Share

आपल्या संस्कृतीमध्ये अशा अनेक प्रथा असतात, ज्या ऐकण्यासाठी विचित्र वाटतात. मात्र समाजातील व्यक्ती त्या प्रथांचे वर्षानुवर्ष पालन करत आले आहेत. आपल्या घरातील जुणे-जानते व्यक्ती या प्रथांचे पालन करत आल्यामुळे आपण देखील पुढे या प्रथांचे पालन सुरूच ठेवतो. काही लोक या प्रथांना अंधश्रद्धा माणतात, मात्र वास्तूशास्त्रामध्ये (jyotish shastra) या प्रथांचे महत्त्व अनन्यसाधारण असते. वास्तू शास्त्रात जशी घरांची रचना (Vastu tips for kitchen) सांगितली आहे, तशी घराची रचना करणे शुभ मानले जाते. वास्तू शास्त्रात तुमच्या किचनसंबंधित (Kitchen) देखील काही नियम सांगितले आहेत. त्याचे उल्लंघन केल्यास अनेक संकटे येऊ शकतात असे देखील म्हटले आहे. यातीच एक प्रथा आहे ती म्हणजे गरम तव्यावर पाणी न टाकणे. तुम्ही जर गरम तव्यावर पाणी टाकत असाल तर वेळीच सावध व्हा असे वास्तूशास्त्र सांगते. गरम तव्यावर पाणी टाकल्यास अनेक संकटे येऊ शकतात. आज आपण या बद्दल जाणून घेणार आहोत.

माता लक्ष्मीची अवकृपा : मात लक्ष्मीला धनाची देवी माणण्यात येते. अशी माण्यता आहे की, किचनमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो. प्राचीन काळापासून असे माणण्यात येते की, गरम तव्यावर पाणी टाकल्यास लक्ष्मीची अवकृपा होते. लक्ष्मी नाराज होते. लक्ष्मी नाराज झाल्यास कुंटुंबात आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात. जर तुम्ही तुमच्या जीवनात येणाऱ्या आर्थिक समस्यांपासून दूर राहू इच्छित असाल तर चुकूनही गरम तव्यावर पाणी टाकू नका.

निगेटिव्हिटी : वास्तू शास्त्रात सांगितले आहे की, जर तुम्ही गरम तव्यावर पाणी टाकल्यास तुमच्या घरात काही नकारात्मक शक्ती प्रवेश करू शकतात. या नकारात्मक शक्तींचा प्रभाव वाढल्यास तुमच्या घरातील पॉझिटिव्ह शक्ती हळूहळू कमी होते. तुम्हाला अनेक संकटाचा सामना करावा लागू शकतो.

लग्नात अडथळे : तुम्ही जर अविवाहित आहात आणि तुम्ही गरम तव्यावर पाणी टाकत असाल तर वेळीच सावध व्हा, कारण यामुळे तुमच्या लग्नात अडथळे निर्माण होऊन, तुमच्या लग्नाला विलंब होऊ शकतो असे वास्तूशास्त्र सांगते.

तव्याशी संबंधित इतर नियम : असे देखील मानण्यात येते की, स्वयपाक झाल्यानंतर तवा नेहमी पालथा ठेवावा, तसे न केल्यास तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

Follow Us
सर्वात मोठी अपडेट! खारातच्या जमिनीत पार्टनरशिप... चाकणकरांचा पलटवार
सर्वात मोठी अपडेट! खारातच्या जमिनीत पार्टनरशिप... चाकणकरांचा पलटवार, सगळ्यांना कोर्टात ओढलं
महापौर कार्यालय उडवून देणार! पुण्यात धमकीचा मेल, महापालिकेत एकच खळबळ
Pune Mahapalika | महापौर कार्यालय उडवून देणार! पुण्यात धमकीचा मेल, महापालिकेत एकच खळबळ
गाडी, कॅबिनसह तुला... मुंबईच्या महापौरांना जीवे मारण्याची धमकी; थेट
गाडी, कॅबिनसह तुला... मुंबईच्या महापौरांना जीवे मारण्याची धमकी; त्या ई-मेलमागील सत्य प्रथमच समोर
पुरुषोत्तमपुरीत भीषण दुर्घटना! 50 भाविकांची बोट पलटी, एक बालक बेपत्ता
Beed | पुरुषोत्तमपुरीत भीषण दुर्घटना! 50 भाविकांची बोट पलटी, एक बालक बेपत्ता तर...
'विरोधी पक्षात असाल तर थेट कारवाई...' वर्धापन दिनाच्या भाषणादरम्यान
'विरोधी पक्षात असाल तर थेट कारवाई...' वर्धापन दिनाच्या भाषणादरम्यान NCP नेत्याचं मोठं विधान
Only Gujarati & Marwari, व्हायरल जाहिरातीवरून मराठी तरुण संतप्त
मुंबईत मराठींना नो एंट्री?; Only Gujarati & Marwari, व्हायरल जाहिरातीवरून मराठी तरुण संतप्त
नाराज छगन भुजबळ घेणार मोठा निर्णय? त्या वक्तव्याची जोरदार चर्चा
नाराज छगन भुजबळ घेणार मोठा निर्णय? त्या वक्तव्याची जोरदार चर्चा
ठाकरे गटात फूट पाडण्याचा प्लॅन?; राऊतांनी केला मोठा गौप्यस्फोट!
ठाकरे गटात फूट पाडण्याचा प्लॅन?; संजय राऊतांनी अमित शाहांचं नाव घेत केला मोठा गौप्यस्फोट! म्हणाले....
लंडनमध्ये मंत्री-न्यायाधीश एकत्र? हे आम्हाला काय न्याय देणार?
Sanjay Raut | लंडनमध्ये मंत्री-न्यायाधीश एकत्र? हे आम्हाला काय न्याय देणार? संजय राऊतांचा थेट हल्ला; लंडन दौऱ्यावरून खळबळ!
विधान परिषदेच्या रणधुमाळीत भयंकर घडलं, कॉंग्रेस उमेदवार रातोरात गायब,
विधान परिषदेच्या रणधुमाळीत भयंकर घडलं, कॉंग्रेस उमेदवार रातोरात गायब, नंतर अचानक... काय घडलं?