AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti | या सहा परिस्थिती होते खऱ्या मित्राची पारख, जाणून घ्या आचार्य चाणक्य काय म्हणतात…

प्रत्येक व्यक्तीचे बरेच मित्र, नातेवाईक आणि जवळचे व्यक्ती असतात (True Friendship). ज्यांच्याशी आपले जुने नाते असते. पण फक्त त्या व्यक्तीसोबत बराच वेळ घालवल्याने आपण कोणालाही आपला खरा मित्र मानू शकत नाही.

Chanakya Niti | या सहा परिस्थिती होते खऱ्या मित्राची पारख, जाणून घ्या आचार्य चाणक्य काय म्हणतात...
Acharya Chanakya
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Updated on: May 29, 2021 | 8:47 AM
Share

मुंबई : प्रत्येक व्यक्तीचे बरेच मित्र, नातेवाईक आणि जवळचे व्यक्ती असतात (True Friendship). ज्यांच्याशी आपले जुने नाते असते. पण फक्त त्या व्यक्तीसोबत बराच वेळ घालवल्याने आपण कोणालाही आपला खरा मित्र मानू शकत नाही. खऱ्या मित्राची परीक्षा नेहमीच कठीण परिस्थितीत होते. वास्तविकता अशी आहे की बर्‍याचदा जेव्हा परिस्थिती विपरीत असते तेव्हा आपल्या आजूबाजूचा घोळकाकमी होतो (Acharya Chanakya Said In These Six Conditions True Friendship Tested In Chanakya Niti).

आचार्य चाणक्य यांचंही हेच मत होतं. आचार्य चाणक्य विद्वान, दूरदर्शी आणि विलक्षण व्यक्तिमत्त्वाचे स्वामी होते. आयुष्यातील प्रत्येक बाबींचा त्यांनी अभ्यास केला आणि आपल्या अनुभवातून इतरांना नेहमी योग्य मार्ग दाखवला. चाणक्य नीति या ग्रंथात त्यांनी अशा सहा घटनांचा उल्लेख केला आहे, ज्यामध्ये जर एखादी व्यक्ती तुमच्या पाठीशी उभी असेल तर समजून घ्या की तिच तुमचा खरा मित्र आणि शुभचिंतक आहे.

1. जेव्हा आपण एखाद्या भयंकर आजाराला तोंड देत असाल, तर त्यावेळी जर एखादी व्यक्ती तुमची मदत करत असेल आणि तुमच्या पाठीशी उभी असेल तर ती खरोखर तुमचा खरा मित्र आहे. कोरोना काळात खऱ्या मित्राची पारख सहज होऊ शकते.

2. जेव्हा-जेव्हा दुष्काळ पडतो किंवा तुमच्या घरात अशी परिस्थिती असते की कुटुंबातील सदस्या दोन वेळच्या जेवणासाठी संघर्ष करत असतात, तेव्हा जो तुम्हाला मदत करतो तो खरोखर तुमचा मित्र असतो.

3. आनंद साजरा करायला अनेक येतात, परंतु दु:खाच्या वेळी केवळ तेच तुमच्या सोबत असतील ज्यांना खरंच तुमची काळजी असेल. अशा परिस्थितीत जेव्हा आपण खूप दु:खी असाल तेव्हा जो कोणी तुम्हाला पाठिंबा देतो तो तुमचा खरा मित्र असतो.

4. जेव्हा तुम्ही शत्रूंनी वेढलेले असाल आणि जर कोणी तुम्हाला कठीण परिस्थितीत मदत करत असेल तर तो तुमचा खरा मित्र आहे.

5. जीवनात बर्‍याच वेळा अशा काही परिस्थिती उद्भवतात, ज्या तुम्हाला कोर्टाच्या पायरीपर्यंत नेऊन ठेवतात. अशा परिस्थितीत, जी व्यक्ती तुमच्याबरोबर असतो, तुम्हाला मदत करतो, तो तुमच्यासाठी खरा मित्र आहे.

6. आपल्या जवळच्या कोणाचा मृत्यू झाल्यानंतर जो तुमच्यासोबत असेल तोच तुमचा खरा मित्र आणि शुभचिंतक असेल.

Acharya Chanakya Said In These Six Conditions True Friendship Tested In Chanakya Niti

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chanakya Niti | या चार व्यक्ती असतात पितृतुल्य, कधीही दुखवू नका, जाणून घ्या चौघांबद्दल

Chanakya Niti : या 4 गोष्टींची ज्याला ‘ओढ’, त्याच्याकडून प्रेम, दया आणि इमानदारीची अपेक्षा करणं व्यर्थ!

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...