AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आचार्य चाणक्यांनी सांगितले की जीवनात संकट येण्यापूर्वी दिसतात ‘हे’ 3 मोठे संकेत

आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या 'नीती शास्त्र' या पुस्तकात काही संकेतांबद्दल सांगितले आहे जे येणाऱ्या वाईट काळाची किंवा संकटांची सूचना देतात. जर तुम्हाला यापैकी कोणतेही संकेत दिसले तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. चला जाणून घेऊया ती संकेत कोणती आहेत.

आचार्य चाणक्यांनी सांगितले की जीवनात संकट येण्यापूर्वी दिसतात 'हे' 3 मोठे संकेत
Acharya Chanakya
| Edited By: | Updated on: Nov 21, 2025 | 7:57 AM
Share

भारतातील महान अर्थशास्त्रज्ञ ऋषी आणि राजकारणी आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीति शास्त्र या पुस्तकात जीवनाच्या प्रत्येक पैलूसाठी रहस्य आणि नियम सांगितले आहेत. आचार्य चाणक्य यांचे तत्व आणि त्यांच्या नीति शास्त्रातील तत्वे आजही लोकांना यश, संपत्ती आणि समृद्धीकडे मार्गदर्शन करतात. त्यांच्या ग्रंथात त्यांनी काही संकेताचं वर्णन केलं आहेत जे तुमच्यावर येणाऱ्या वाईट काळ किंवा संकटाच्या आगमनाचे संकेत देतात. जर तुम्हालाही असे काही संकेत जाणवत किंवा दिसत असतील तर तुम्ही सावध राहावे आणि संकट टाळण्याचा प्रयत्न करावा. चला तर मग आजच्या लेखात आपण याबद्दल जाणून घेऊयात.

तुळस कोमेजणे किंवा सुकणे

नीतिशास्त्रानुसार तुळशीचे रोप अचानक कोमेजणे किंवा सुकणे हे खूप अशुभ लक्षण मानले जाते. तुळशीला लक्ष्मी देवीचे प्रतीक मानले जाते आणि आपल्या प्रत्येकाच्या घरात तिचे अस्तित्व सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवते. म्हणून तुमच्या घरातील तुळशीचे रोप कोणत्याही कारणाशिवाय कोमेजणे किंवा सुकणे सुरू झाले तर ते अशुभ लक्षण मानले जाते. हे सूचित करते की घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत आहे आणि आर्थिक समस्या वाढू शकतात.

घरातील वातावरण खराब होणे

चाणक्य यांच्या मते जेव्हा तुमच्यावर वाईट संकट येणार असेल तर त्यांचे आणखी एक लक्षण म्हणजे घरगुती कलह, म्हणजेच घरात वाढती भांडणे, तणाव किंवा वाद. चाणक्य नीतिनुसार जर तुमच्या कुटुंबात कोणत्याही कारणाशिवाय अशांतता किंवा कलह वाढला तर ते सूचित करते की एखादा कठीण काळ किंवा वाईट घटना घडणार आहे, ज्यामुळे तुमचे आर्थिक नुकसान, तणाव किंवा नातेसंबंधांमध्ये अंतर येऊ शकते.

काच फुटणे

आचार्य चाणक्य यांच्या मते येणाऱ्या संकटाचे तिसरे लक्षण म्हणजे काच फुटणे. चाणक्य नीतिनुसार जर तुमच्या घरातील कपाटाचा आरसा किंवा कोणतीही काच स्वतःहून फुटली तर ते येणाऱ्या दुर्दैवाचे किंवा संकटाचे संकेत देते. असे मानले जाते की हे एखाद्या व्यक्तीच्या नशिबात येणाऱ्या अडचणी दर्शवते. घरात तुटलेली काच ठेवू नये, कारण त्यामुळे गरिबी वाढते.

तर आचार्य चाणक्य यांच्या नुसार या 3 लक्षणांव्यतिरिक्त, प्रार्थनेत रस नसणे, झोप न लागणे, जेवताना कुत्रा भुंकणे, रात्री मांजरीचे रडणे आणि घड्याळ वारंवार थांबणे ही देखील येणाऱ्या काळात काही त्रास, चिंता किंवा मोठ्या संकटाची लक्षणे मानली जातात.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या भागात पवासाची हजेरी!
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या  भागात पवासाची हजेरी!
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले तरी कुठे? वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप!
विरोधीपक्ष मोठ्या तयारीत? ममता बॅनर्जींची सोनिया गांधींसोबत बंद दाराआड
विरोधी पक्ष मोठ्या तयारीत? ममता बॅनर्जींची सोनिया गांधींसोबत बंद दाराआड चर्चा; 45 मिनीटे... काय घडलं?
यूट्यूब टिचर खान सरांच्या अटकेविषयी सर्वात मोठी अपडेट, कोर्टाने दिला..
यूट्यूब टिचर खान सरांच्या अटकेविषयी सर्वात मोठी अपडेट, कोर्टाने दिला महत्त्वाचा आदेश, आता...
राष्ट्रवादीत मोठं घडतंय? राजीनाम्याऐवजी नायकवडींना पवरांनी दिली मोठी..
राष्ट्रवादीत मोठं घडतंय? राजीनाम्याऐवजी नायकवडींना दिली मोठी जबाबदारी, स्वतःच म्हणाले...
पुणेकरांनो सावधान! पाणी वाचवा, नाहीतर नळ कोरडे पडतील
Pune Water Cut | पुणेकरांनो सावधान! पाणी वाचवा, नाहीतर नळ कोरडे पडतील; महापालिकेची मोठी घोषणा काय?
4 सिलेंडरनंतर महिलांनी काय करायचं? उरलेले 8 महिने धूरच घ्यायचा का?
Sachin Sawant | 4 सिलेंडरनंतर महिलांनी काय करायचं? उरलेले 8 महिने धूरच घ्यायचा का?; उज्ज्वला योजनेवरून काँग्रेसचा संताप
लक्ष्मण हाकेंच्या व्हिडीओने खळबळ, बड्या नेत्याबद्दल सांगताना...थेट केल
Video | लक्ष्मण हाकेंच्या व्हिडीओने खळबळ, बड्या नेत्याबद्दल सांगताना...थेट केलेल्या विधानाची राज्यात मोठी चर्चा!
धरण भरलं, आश्वासनं भरली; पण गावकऱ्यांच्या घागरी मात्र रिकाम्याच!
Dahanu | धरण भरलं, आश्वासनं भरली; पण गावकऱ्यांच्या घागरी मात्र रिकाम्याच! साखरे गावाचा पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष
Video | बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावर शिंदेची प्रतिक्रिया, हावभावानेच
Video | बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावर शिंदेची प्रतिक्रिया, हावभावानेच वेधलं लक्ष