AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आचार्य चाणक्यांनी सांगितले की जीवनात संकट येण्यापूर्वी दिसतात ‘हे’ 3 मोठे संकेत

आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या 'नीती शास्त्र' या पुस्तकात काही संकेतांबद्दल सांगितले आहे जे येणाऱ्या वाईट काळाची किंवा संकटांची सूचना देतात. जर तुम्हाला यापैकी कोणतेही संकेत दिसले तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. चला जाणून घेऊया ती संकेत कोणती आहेत.

आचार्य चाणक्यांनी सांगितले की जीवनात संकट येण्यापूर्वी दिसतात 'हे' 3 मोठे संकेत
Acharya Chanakya
| Edited By: | Updated on: Nov 21, 2025 | 7:57 AM
Share

भारतातील महान अर्थशास्त्रज्ञ ऋषी आणि राजकारणी आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीति शास्त्र या पुस्तकात जीवनाच्या प्रत्येक पैलूसाठी रहस्य आणि नियम सांगितले आहेत. आचार्य चाणक्य यांचे तत्व आणि त्यांच्या नीति शास्त्रातील तत्वे आजही लोकांना यश, संपत्ती आणि समृद्धीकडे मार्गदर्शन करतात. त्यांच्या ग्रंथात त्यांनी काही संकेताचं वर्णन केलं आहेत जे तुमच्यावर येणाऱ्या वाईट काळ किंवा संकटाच्या आगमनाचे संकेत देतात. जर तुम्हालाही असे काही संकेत जाणवत किंवा दिसत असतील तर तुम्ही सावध राहावे आणि संकट टाळण्याचा प्रयत्न करावा. चला तर मग आजच्या लेखात आपण याबद्दल जाणून घेऊयात.

तुळस कोमेजणे किंवा सुकणे

नीतिशास्त्रानुसार तुळशीचे रोप अचानक कोमेजणे किंवा सुकणे हे खूप अशुभ लक्षण मानले जाते. तुळशीला लक्ष्मी देवीचे प्रतीक मानले जाते आणि आपल्या प्रत्येकाच्या घरात तिचे अस्तित्व सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवते. म्हणून तुमच्या घरातील तुळशीचे रोप कोणत्याही कारणाशिवाय कोमेजणे किंवा सुकणे सुरू झाले तर ते अशुभ लक्षण मानले जाते. हे सूचित करते की घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत आहे आणि आर्थिक समस्या वाढू शकतात.

घरातील वातावरण खराब होणे

चाणक्य यांच्या मते जेव्हा तुमच्यावर वाईट संकट येणार असेल तर त्यांचे आणखी एक लक्षण म्हणजे घरगुती कलह, म्हणजेच घरात वाढती भांडणे, तणाव किंवा वाद. चाणक्य नीतिनुसार जर तुमच्या कुटुंबात कोणत्याही कारणाशिवाय अशांतता किंवा कलह वाढला तर ते सूचित करते की एखादा कठीण काळ किंवा वाईट घटना घडणार आहे, ज्यामुळे तुमचे आर्थिक नुकसान, तणाव किंवा नातेसंबंधांमध्ये अंतर येऊ शकते.

काच फुटणे

आचार्य चाणक्य यांच्या मते येणाऱ्या संकटाचे तिसरे लक्षण म्हणजे काच फुटणे. चाणक्य नीतिनुसार जर तुमच्या घरातील कपाटाचा आरसा किंवा कोणतीही काच स्वतःहून फुटली तर ते येणाऱ्या दुर्दैवाचे किंवा संकटाचे संकेत देते. असे मानले जाते की हे एखाद्या व्यक्तीच्या नशिबात येणाऱ्या अडचणी दर्शवते. घरात तुटलेली काच ठेवू नये, कारण त्यामुळे गरिबी वाढते.

तर आचार्य चाणक्य यांच्या नुसार या 3 लक्षणांव्यतिरिक्त, प्रार्थनेत रस नसणे, झोप न लागणे, जेवताना कुत्रा भुंकणे, रात्री मांजरीचे रडणे आणि घड्याळ वारंवार थांबणे ही देखील येणाऱ्या काळात काही त्रास, चिंता किंवा मोठ्या संकटाची लक्षणे मानली जातात.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.