AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti | साथीचा रोग आणि युद्धजन्य परिस्थितीत व्यक्तीचं आचरण कसं असावं? आचार्य चाणक्य काय सांगतात

आचार्य चाणक्य हे जगप्रसिद्ध तक्षशिला विद्यापीठाचे आचार्य होते (Behaviour Of Person During Epidemic). त्यांना राजकारण आणि मुत्सद्देगिरीचे प्रचंड ज्ञान होते.

Chanakya Niti | साथीचा रोग आणि युद्धजन्य परिस्थितीत व्यक्तीचं आचरण कसं असावं? आचार्य चाणक्य काय सांगतात
Chanakya Niti
| Updated on: May 06, 2021 | 7:42 AM
Share

मुंबई : आचार्य चाणक्य हे जगप्रसिद्ध तक्षशिला विद्यापीठाचे आचार्य होते (Behaviour Of Person During Epidemic). त्यांना राजकारण आणि मुत्सद्देगिरीचे प्रचंड ज्ञान होते. चाणक्य यांची गणना देशातील सर्वश्रेष्ठ विद्वानांमध्ये केली जाते. चाणक्य नीति नावाच्या ग्रंथात आचार्य यांनी आपले अनुभव सांगितले आहेत, जेणेकरुन भविष्यातील पिढ्यांना त्यांच्या अनुभवांमधून शिकता येईल. आचार्य चाणक्य यांनी आयुष्याच्या प्रत्येक गोष्टीबाबत आपले अनुभव सांगितले आहेत. आजही जीवनातील सर्व परिस्थितींमध्ये त्यांची धोरणे जवळपास योग्य सिद्ध झाली आहेत (Acharya Chanakya Told What Should Be The Behaviour Of A Person During Epidemic And War Situation In Chanakya Niti).

या भागात आचार्य चाणक्य यांनी साथीच्या आजार आणि युद्धासारख्या परिस्थितीबद्दल शिकवण दिली आहे आणि एखाद्या व्यक्तीने अशा परिस्थितीला कसे तोंड द्यावे ते सांगितले आहे. सध्या कोरोनाने देशात आपले पाय पसरले आहेत. यामुळे सामान्य जनता त्रस्त झाली आहे. अशावेळी आचार्य यांच्या धोरणांमधून बरेच काही शिकता येऊ शकते.

1. आचार्य चाणक्य म्हणणात की जेव्हा महामारीसारखे संकट येते तेव्हा व्यक्तीने घाबरुन जाऊ नये. त्याने सतर्कता आणि सावधगिरी बाळगली पाहिजे आणि समजुतदारपणाने निर्णय घ्यावेत. चिंताग्रस्त किंवा अस्वस्थ झाल्याने समस्येचे निराकरण कधीही होणार नाही. या परिस्थितीतही आपण सकारात्मक विचार ठेवला पाहिजे आणि इतरांनाही त्यासाठी प्रेरित केले पाहिजे.

2. युद्धाची परिस्थिती असल्यास कधीही घाबरुन जाऊ नये. नेहमी लक्षात ठेवा की एखाद्याची प्रतिभा केवळ संकटाच्या वेळीच ओळखली जाते. आपल्यात हिम्मत आणि धैर्य असेल तर आपण काहीही करु शकता. आपल्या मनात परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी धैर्य आणा आणि आपली शक्ती योग्य दिशेने लावा. तसेच समस्येचे निराकरण आणि बचाव याबद्दल विचार करत रहावे.

3. चाणक्य यांच्या मते जर शत्रू तुमच्यापेक्षा सामर्थ्यवान असेल तर उत्साहाऐवजी चेतनेने कार्य करा. जर तुम्ही त्याला आव्हान देण्याचे धाडस केले तर तुमचा नक्कीच पराभव होईल. अशा परिस्थितीत आपल्या समजुतीने शत्रूचा पराभव करा. गरज पडल्यास लपून राहल्याने कोणतीही हानी होत नाही.

Acharya Chanakya Told What Should Be The Behaviour Of A Person During Epidemic And War Situation In Chanakya Niti

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chanakya Niti | मांसाहारापेक्षा 10 पट, धान्यापेक्षा 38 पट अधिक शक्तीवर्धक, प्रत्येकाने दररोज सेवन करावा हा पदार्थ

Chanakya Niti | माणसाने ‘या’ तीन गोष्टींमध्ये समाधानी राहावं, अन्यथा जीवन जगणे कठीण होईल

Chanakya Niti : निकटवर्तीयांशीही ‘या’ पाच गोष्टी कधीहीह शेअर करु नये, आचार्य चाणक्य यांचा महत्त्वाचा सल्ला

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.