AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ashadha Amavasya 2021 | आर्थिक अडचणी, बेरोजगारी, शत्रूचा त्रास, काळसर्प दोष किंवा पितृ दोष दूर करायचा असेल तर अमावस्येला हे उपाय करा

प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाची शेवटची तारीख अमावस्या तिथी मानली जाते (Ashadha Amavasya 2021). कोणतीही अमावस्या तर्पण, पिंड दान, पितृदोष निवारण आणि काल सर्प दोष निवारण यांच्यासाठी खूप चांगली तिथी मानली जाते. हिंदू दिनदर्शिकेनुसार आषाढ महिना सुरु आहे. आषाढ महिन्यात येणाऱ्या अमावस्येला आषाढ अमावस्या किंवा हलाहारी अमावस्या म्हणतात

Ashadha Amavasya 2021 | आर्थिक अडचणी, बेरोजगारी, शत्रूचा त्रास, काळसर्प दोष किंवा पितृ दोष दूर करायचा असेल तर अमावस्येला हे उपाय करा
आषाढ अवामस्या उपाय
| Edited By: | Updated on: Jul 09, 2021 | 8:58 AM
Share

मुंबई : प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाची शेवटची तारीख अमावस्या तिथी मानली जाते (Ashadha Amavasya 2021). कोणतीही अमावस्या तर्पण, पिंड दान, पितृदोष निवारण आणि काल सर्प दोष निवारण यांच्यासाठी खूप चांगली तिथी मानली जाते. हिंदू दिनदर्शिकेनुसार आषाढ महिना सुरु आहे. आषाढ महिन्यात येणाऱ्या अमावस्येला आषाढ अमावस्या किंवा हलाहारी अमावस्या म्हणतात (Ashadha Amavasya 2021 Do these upay for financial problems kaalsarp dosh and pitru dosh).

पावसाळ्याची सुरुवात या अमावस्येनंतरच होते. पाऊस हा शेतीसाठी खूप महत्वाचा आहे. म्हणूनच शेतकरी या अमावस्येला हलाहारी अमावस्या म्हणून संबोधतात आणि या दिवशी नांगर आणि शेतीच्या अवजारांची पूजा करतात. यावेळी आषाढ अमावस्या आज शुक्रवार 9 जुलै रोजी पडत आहे. आपल्या आयुष्यात आर्थिक अडचणी, बेरोजगारी, शत्रूचा अडथळा, कालसर्प दोष किंवा पितृ दोष यासारख्या समस्या असल्यास आपण उद्या या उपायांवर प्रयत्न करू शकता.

समस्या समाप्त करण्यासाठी

तुमच्या आयुष्यातील अडचणी आणि अडथळे संपत नसल्यास आषाढी अमावस्येच्या दिवशी तुम्ही देवाचे नाव घेऊन पिठाच्या गोळ्या बनवा आणि या गोळ्या कुठल्याही तलावात किंवा नदीत जिथे मासे असतील त्यांना खायला द्यावे. याशिवाय साखर मिसळलेले गोड पीठ मुंग्यांना खायला द्यावे. यामुळे, अनेक प्रकारचे त्रास दूर होतात, दुर्दैव दूर होते, तसेच आर्थिक परिस्थिती देखील सुधारते. आपण दररोज किंवा प्रत्येक अमावस्येला हे करु शकत असाल तर आपल्याला आणखी चांगले परिणाम मिळतील.

काळसर्प दोष दूर करण्यासाठी

जर कुंडलीत काळसर्प दोषांच्या अशुभ परिणामामुळे प्रत्येक कामात अडथळे येत असतील तर अमावस्येच्या दिवशी चांदीचा नाग-नागिनचा जोडा बनवा आणि एखाद्या पवित्र नदीच्या काठावर पंडितच्या मदतीने पूजा करा. नाग-नागिनचा जोडा पाण्यात प्रवाहित करा. या व्यतिरिक्त आपण गारुडीकडून सर्पाची जोडी खरेदी करुन त्यांना जंगलात मुक्त करु शकता. यामुळे काळसर्प दोषाची समस्या देखील दूर होते.

पितरांच्या शांतीसाठी

पूर्वजांच्या शांतीसाठी प्रत्येक अमावस्या दिवशी पितरांसाठी गीतेचे पठण करा. याशिवाय अमावस्येच्या दिवशी पिंपळाचे झाड लावणे देखील खूप शुभ मानले जाते. कलियुगात पिंपळाच्या झाडाला भगवान श्रीकृष्णाचे रुप मानले जाते. मान्यता आहे की अमावस्येच्या दिवशी पिंपळाचं झाड लावल्यानंतर याची काळजी घ्या. पिंपळाचे झाड वाढत असताना, आपल्या समस्या समाप्त होऊ लागतात.

Ashadha Amavasya 2021 Do these upay for financial problems kaalsarp dosh and pitru dosh

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Ashadha Amavasya 2021 | जर कुंडलीत पितृ दोष असेल तर अमावस्येला ही झाडं लावा…

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.