AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ashadha Amavasya 2021 | आर्थिक अडचणी, बेरोजगारी, शत्रूचा त्रास, काळसर्प दोष किंवा पितृ दोष दूर करायचा असेल तर अमावस्येला हे उपाय करा

प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाची शेवटची तारीख अमावस्या तिथी मानली जाते (Ashadha Amavasya 2021). कोणतीही अमावस्या तर्पण, पिंड दान, पितृदोष निवारण आणि काल सर्प दोष निवारण यांच्यासाठी खूप चांगली तिथी मानली जाते. हिंदू दिनदर्शिकेनुसार आषाढ महिना सुरु आहे. आषाढ महिन्यात येणाऱ्या अमावस्येला आषाढ अमावस्या किंवा हलाहारी अमावस्या म्हणतात

Ashadha Amavasya 2021 | आर्थिक अडचणी, बेरोजगारी, शत्रूचा त्रास, काळसर्प दोष किंवा पितृ दोष दूर करायचा असेल तर अमावस्येला हे उपाय करा
आषाढ अवामस्या उपाय
| Edited By: | Updated on: Jul 09, 2021 | 8:58 AM
Share

मुंबई : प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाची शेवटची तारीख अमावस्या तिथी मानली जाते (Ashadha Amavasya 2021). कोणतीही अमावस्या तर्पण, पिंड दान, पितृदोष निवारण आणि काल सर्प दोष निवारण यांच्यासाठी खूप चांगली तिथी मानली जाते. हिंदू दिनदर्शिकेनुसार आषाढ महिना सुरु आहे. आषाढ महिन्यात येणाऱ्या अमावस्येला आषाढ अमावस्या किंवा हलाहारी अमावस्या म्हणतात (Ashadha Amavasya 2021 Do these upay for financial problems kaalsarp dosh and pitru dosh).

पावसाळ्याची सुरुवात या अमावस्येनंतरच होते. पाऊस हा शेतीसाठी खूप महत्वाचा आहे. म्हणूनच शेतकरी या अमावस्येला हलाहारी अमावस्या म्हणून संबोधतात आणि या दिवशी नांगर आणि शेतीच्या अवजारांची पूजा करतात. यावेळी आषाढ अमावस्या आज शुक्रवार 9 जुलै रोजी पडत आहे. आपल्या आयुष्यात आर्थिक अडचणी, बेरोजगारी, शत्रूचा अडथळा, कालसर्प दोष किंवा पितृ दोष यासारख्या समस्या असल्यास आपण उद्या या उपायांवर प्रयत्न करू शकता.

समस्या समाप्त करण्यासाठी

तुमच्या आयुष्यातील अडचणी आणि अडथळे संपत नसल्यास आषाढी अमावस्येच्या दिवशी तुम्ही देवाचे नाव घेऊन पिठाच्या गोळ्या बनवा आणि या गोळ्या कुठल्याही तलावात किंवा नदीत जिथे मासे असतील त्यांना खायला द्यावे. याशिवाय साखर मिसळलेले गोड पीठ मुंग्यांना खायला द्यावे. यामुळे, अनेक प्रकारचे त्रास दूर होतात, दुर्दैव दूर होते, तसेच आर्थिक परिस्थिती देखील सुधारते. आपण दररोज किंवा प्रत्येक अमावस्येला हे करु शकत असाल तर आपल्याला आणखी चांगले परिणाम मिळतील.

काळसर्प दोष दूर करण्यासाठी

जर कुंडलीत काळसर्प दोषांच्या अशुभ परिणामामुळे प्रत्येक कामात अडथळे येत असतील तर अमावस्येच्या दिवशी चांदीचा नाग-नागिनचा जोडा बनवा आणि एखाद्या पवित्र नदीच्या काठावर पंडितच्या मदतीने पूजा करा. नाग-नागिनचा जोडा पाण्यात प्रवाहित करा. या व्यतिरिक्त आपण गारुडीकडून सर्पाची जोडी खरेदी करुन त्यांना जंगलात मुक्त करु शकता. यामुळे काळसर्प दोषाची समस्या देखील दूर होते.

पितरांच्या शांतीसाठी

पूर्वजांच्या शांतीसाठी प्रत्येक अमावस्या दिवशी पितरांसाठी गीतेचे पठण करा. याशिवाय अमावस्येच्या दिवशी पिंपळाचे झाड लावणे देखील खूप शुभ मानले जाते. कलियुगात पिंपळाच्या झाडाला भगवान श्रीकृष्णाचे रुप मानले जाते. मान्यता आहे की अमावस्येच्या दिवशी पिंपळाचं झाड लावल्यानंतर याची काळजी घ्या. पिंपळाचे झाड वाढत असताना, आपल्या समस्या समाप्त होऊ लागतात.

Ashadha Amavasya 2021 Do these upay for financial problems kaalsarp dosh and pitru dosh

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Ashadha Amavasya 2021 | जर कुंडलीत पितृ दोष असेल तर अमावस्येला ही झाडं लावा…

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.