AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुढचे 5 दिवस सावधान, बनतोय खतरनाक योग, नव्या वर्षात बसू शकतो मोठा फटका, जे मिळणार ते पाचपट मिळणार

हिंदू धर्मामध्ये कोणंतही शुभ कार्य करण्यापूर्वी सर्वातआधी शुभ मुहूर्त पाहिलं जातं. प्राचीन काळापासून ही परंपरा सुरू आहे. प्रत्येक महिन्यात काही अशुभ मुहूर्त असतात तर काही शुभ मुहूर्त असतात.

पुढचे 5 दिवस सावधान, बनतोय खतरनाक योग, नव्या वर्षात बसू शकतो मोठा फटका, जे मिळणार ते पाचपट मिळणार
| Updated on: Jan 02, 2025 | 9:52 PM
Share

हिंदू धर्मामध्ये कोणंतही शुभ कार्य करण्यापूर्वी सर्वातआधी शुभ मुहूर्त पाहिलं जातं. प्राचीन काळापासून ही परंपरा सुरू आहे. प्रत्येक महिन्यात काही अशुभ मुहूर्त असतात तर काही शुभ मुहूर्त असतात. या मुहूर्तांना लक्षात घेऊनच घरातील कुठलंही शुभ कार्य ठरवलं जातं.मात्र ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक महिन्यामध्ये असे पाच दिवस असतात ज्या पाच दिवसांमध्ये कुठलंही शुभ कार्य केलं जात नाही. त्याला पंचक असं म्हणतात.

चंद्र जेव्हा या पाच नक्षत्रातून प्रवेश करतो तेव्हा लागतं पंचक

या पाच दिवसांना हिंदू धर्म शास्त्रात पंचक असं म्हणतात. ज्योतिष शास्त्रानुसार चंद्र प्रत्येक आडीच दिवसाला राशी आणि प्रत्येक दिवशी नक्षत्र परिवर्तन करतो.चंद्र जेव्हा घनिष्ठा, शतभिषा, पूर्वाभारद्रपद, उत्तराभाद्रपद आणि रेवती नक्षत्रातून जातो, तेव्हा पंचक लागतं.जानेवारी महिन्यात तीन जानेवारी म्हणजे शुक्रवारपासून पंचकाला सुरुवात होणार आहे.

वैदिक पंचांगांनुसार नव्या वर्षात पहिलं पंचक तीन जानेवारी रोजी सकाळी 10 वाजून 47 मिनिटांनी सुरुवात होणार आहे, हे पंचक सात जानेवारीला पूर्ण होणार आहे. सात जानेवारीला सायंकाळी 5 वाजून 50 मिनिटांनी या पंचकाची समाप्ती होणार आहे.पंचक काळात कोणतंही शुभ कार्य केलं जात नाही.

पंचक सुरू असताना या गोष्टी करू नका

हिंदू धर्मामध्ये पंचक काळात काही गोष्टी करू नये असं मानलं जातं. ज्यामध्ये पैशांची संबंधित देवाण घेवाण करू नये, असं म्हटलं आहे. कारण हा काळच असा असतो की तुम्हाला जर तोटा झाला तर तो पाच पट होणार किंवा कधी नफा झाला तरी देखील तो पाचपट होऊ शकतो. तसेच पंचक काळत कोणतंही शुभ कार्य करू नये, तुम्ही कुठे दूर एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी जाणार असाल तर या मुहूर्तावर जाणे टाळावे. तसेच एखादा नवा उद्योग व्यवसायाला सुरुवात करायची असेल तरी देखील करू नये असं धर्मशास्त्र सांगते.

Follow Us
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही.
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?.
ठाकरेंच्या काळात पाणी दिलं हा आरोप दिशाभूल करणारा
ठाकरेंच्या काळात पाणी दिलं हा आरोप दिशाभूल करणारा.
पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत फडणवीसांचं मोठं विधान
पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत फडणवीसांचं मोठं विधान.
लॉकडाऊन लागणार नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - CM फडणवीस
लॉकडाऊन लागणार नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - CM फडणवीस.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सभागृहात गोंधळ; ठाकरेंच्या नगरसेवकांना...
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सभागृहात गोंधळ; ठाकरेंच्या नगरसेवकांना....
बुलढाणा चांदी बाजारात मंदी; LPGच्या तुटवड्यामुळे दागिन्यांचे काम ठप्प
बुलढाणा चांदी बाजारात मंदी; LPGच्या तुटवड्यामुळे दागिन्यांचे काम ठप्प.
राजकारण संपल्यानंतर काय करणार? पंकजा मुंडे यांचं मोठं विधान काय?
राजकारण संपल्यानंतर काय करणार? पंकजा मुंडे यांचं मोठं विधान काय?.
सुप्रिया सुळेंच्या त्या वक्तव्यावर काँग्रेसची टीका; फडणवीस यांच्या....
सुप्रिया सुळेंच्या त्या वक्तव्यावर काँग्रेसची टीका; फडणवीस यांच्या.....
पुन्हा लॉकडाऊन?केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींचं ट्विट काय
पुन्हा लॉकडाऊन?केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींचं ट्विट काय.