AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Neeti : घरातल्या या 5 गोष्टी कोणालाच सांगू नका, नाहीतर करावा लागेल पश्चताप

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत आणि अर्थतज्ज्ञ होते, त्यांनी आपल्या चाणक्य नीतीमध्ये अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील लोकांना मार्गदर्शक ठरतात.

Chanakya Neeti : घरातल्या या 5 गोष्टी कोणालाच सांगू नका, नाहीतर करावा लागेल पश्चताप
| Updated on: Jul 26, 2025 | 10:00 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये जे विचार मांडले आहेत, ते आजही अनेकांना आपलं आयुष्य जगत असताना प्रेरणा देतात.  आर्य चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये व्यक्तीनं आपलं आयुष्य कशापद्धतीनं जगलं पाहिजे, याबाबत अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.

आर्य चाणक्य म्हणतात अशा काही गोष्टी असतात त्या माणसानं आयुष्यात करू नये, अन्यथा त्याच्यावर पश्चताप करण्याची वेळ येऊ शकते. माणसानं पूर्वी ज्या चुका केल्या आहेत, त्यातून बोध घ्यायला हवा, त्याच चुका पून्हा करू नये, त्यामुळे मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे.

चाणक्य पुढे असंही म्हणतात की, आपल्या घरातील अशा काही गोष्टी असतात ज्या माणसानं बाहेर सांगता कामा नये? यामुळे संसाराचं वाटोळं होऊ शकतं, त्याची तुम्हाला फार मोठी किंमत मोजावी लागू शकते, तुमचं नुकसान होऊ शकतं, त्या नेमक्या कोणत्या गोष्टी आहेत? आणि चाणक्य यांनी काय म्हटलं आहे? त्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत.

योजना गुप्त ठेवा – चाणक्य म्हणतात तुम्ही जर तुमच्या भविष्यकाळासाठी काही योजना तयार करत असाल तर त्याची चर्चा कधीही बाहेर करू नका.

घरातील समस्या – चाणक्य म्हणतात की जर तुमच्या घरात काही समस्या असतील तर त्या घरातच सोडवण्याचा प्रयत्न करा, त्या बाहेरच्या व्यक्तीला सांगू नका, कारण त्यामुळे तुमची समस्या सुटणार तर नाहीच उलट वाढण्याचा धोका असतो.

कमाई – चाणक्य म्हणतात तुम्ही किती कमवता, हे कधीच कोणाला सांगू नका, त्यातून तुमचे शत्रू वाढण्याचा धोका असतो.

कर्ज – चाणक्य म्हणतात तुमच्यावर किती कर्ज आहे, याबाबत देखील कुठेही बाहेर चर्चा करू नका, अशा गोष्टी नेहमी गुप्त ठेवाव्यात.

पत्नीसोबतचा वाद – चाणक्य म्हणतात जर तुमचा पत्नीसोबत वाद असेल तर ही गोष्ट देखील कोणाला सांगू नका.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.