AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : प्रत्येक आई -वडिलांना या गोष्टी माहिती हव्याच, चाणक्य काय सांगतात?

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये आई-वडिलांनी आपल्या मुलांचं संगोपन कसं करावं? याबद्दल चाणक्य यांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्यातीलच काही गोष्टींबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

Chanakya Niti : प्रत्येक आई -वडिलांना या गोष्टी माहिती हव्याच, चाणक्य काय सांगतात?
chanakya nitiImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 24, 2026 | 10:07 PM
Share

आर्य चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी आदर्श आई -वडील कसे असावेत? आई वडिलांचं आपल्या पाल्यांप्रति काय कर्तव्य आहेत? आदर्श आई -वडील कोणाला म्हणावं? मुलांवर आई-वडिलांनी संस्कार कसे करावेत? याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य मुलांच्या जीवनातील आई-वडिलांचं महत्त्व सांगताना म्हणतात जेव्हा मुलं जन्माला येत तेव्हा त्यासाठी त्याचे आई्-वडील हेच त्याच्यासाठी संपूर्ण जग असतं. आई -वडील आपल्या मुलांवर कसे संस्कार करतात? ते त्यांचं संगोपन कशापद्धतीने करतात यावरच त्या मुलाच्या आयुष्याचा भविष्यातील डोलारा उभा राहत असतो. त्यामुळे जर आई -वडील आपल्या कर्तव्यात चुकले तर मुलांचं त्यांच्या आयुष्यात फार मोठं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे आई वडिलांनी आपल्या मुलांचं संगोपन करताना काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

आई वडिलांची कर्तव्य – चाणक्य चाणक्य नीतीमध्ये म्हणतात की मुलांवर चांगले संस्कार करणं, त्यांच्या मनात श्रमप्रतिष्ठेची भावना रूजवणं आणि त्यांना त्यांच्या भविष्यासाठी चांगलं शिक्षण देणं ही आई-वडिलांची सर्वात मोठी कर्तव्य आहेत. जर आई वडिलांनी आपल्या या कर्तव्याचं प्रामाणिकपणे पालन केल तर अशी मुलं आयुष्यात यशस्वी होतात. मात्र जर आई वडिलांनी आपल्या कर्तव्यांचं पालन केलं नाही, तर मुलं चुकीच्या मार्गावर जाण्याची शक्यता अधिक असते, त्याची भविष्यात मुलांसोबतच त्यांच्या आई-वडिलांना देखील फार मोठी किंमत मोजावी लागू शकते, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

असे आई -वडील असतात शत्रू – चाणक्य पुढे म्हणतात. जे आईवडील आपल्या मुलांना चांगले शिक्षण देत नाहीत, त्यांच्यावर चांगले संस्कार करत नाहीत, मुलांना जगण्याचा दृष्टीकोन देत नाहीत, असे आई वडील आपल्याच मुलांचं फार मोठं नकसान कत असतात. त्यामुळे असे आई-वडील हे आपल्या मुलांचे शत्रू असतात. तसेच जे आई-वडील आपल्या मुलांना संघर्ष करायला शिकवत नाहीत. त्यांना सर्व गोष्टी आयत्या देतात असे आई वडील देखील नकळत आपल्या मुलांचं फार मोठं नुकसान करत असतात, असं देखील चाणक्य यांनी म्हटलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
ठाकरेंचे बाकी तीन खसादर भाजपच्या... थेट पत्रकार परिषद घेत बड्यानेत्यान
ठाकरेंचे बाकी तीन खसादर भाजपच्या... थेट पत्रकार परिषद घेत बड्यानेत्यानं सांगितलं मोठं गुपित
खासदारांच्या बंडखोरीमागे देवेंद्र फडणवीस यांची मोठी भूमिका? 2 महिन्याआ
खासदारांच्या बंडखोरीमागे देवेंद्र फडणवीस यांची मोठी भूमिका? 2 महिन्याआधीच...मोठी अपडेट समोर!
तब्बल 13 कोटी 99 लाख रुपयांच्या नुकसानानंतर विधानसभेत मोठी घोषणा!
तब्बल 13 कोटी 99 लाख रुपयांच्या नुकसानानंतर विधानसभेत मोठी घोषणा! 1 एप्रिल 2021 पासून...
वरीष्ठांकडून दखल; शिंदे- फडवीसांची चर्चा अन्... संजय दीना पाटलांचं
वरीष्ठांकडून दखल; शिंदे- फडवीसांची चर्चा अन्... संजय दीना पाटलांचं विधान वादाच्या भोवऱ्यात, काय निर्णय घेणार?
संजय पाटील यांच्या त्या वक्तव्यांवरून ठाकरे गट आक्रमक; पोलिसांत तक्रार
Shivsena | संजय दिना पाटील यांच्या त्या वक्तव्यांवरून ठाकरे गट आक्रमक; पोलिसांत तक्रार दाखल
आता सगळंच समोर आलं... लोहगडावर जाण्यापूर्वी... आरोपी सिया आणि चेतनच्या
आता सगळंच समोर आलं... लोहगडावर जाण्यापूर्वी... आरोपी सिया आणि चेतनच्या कॅफेतील CCTVतून हादरवणार खुलासे
बदलापूरमध्ये पत्नीच्या हत्येचा धक्कादायक प्रकार उघड; हार्ट अटॅकचा बनाव
मोठी बातमी! बदलापूरमध्ये पत्नीच्या हत्येचा धक्कादायक प्रकार उघड; हार्ट अटॅकचा बनाव फसला, पती आणि सासू अटकेत
सत्ता डोक्यात गेलीय! संजय पाटलांवर सुषमा अंधारेंचा घणाघात
Sushma Andhare | सत्ता डोक्यात गेलीय! संजय दिना पाटलांवर सुषमा अंधारेंचा घणाघात; फडणवीसांनाही केला थेट सवाल
दोन शक्तिशाली भूकंपांनी व्हेनेझुएलात हाहाकार; मृतांचा आकडा 10
Venezuela | दोन शक्तिशाली भूकंपांनी व्हेनेझुएलात हाहाकार; मृतांचा आकडा 10 हजारांच्या पार जाण्याची भीती!
उद्धव ठाकरेंना जबर धक्का, कोणतंही कारण न सांगता जिल्हाप्रमुखाने थेट...
Big Breaking | उद्धव ठाकरेंना जबर धक्का, कोणतंही कारण न सांगता जिल्हाप्रमुखाने थेट....कोल्हापुरात नेमकं काय घडलं?