AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : या तिघांना झोपेतून जागं करण्याची चूक कधीच करू नका, चाणक्यांनी दिला मोलाचा सल्ला

चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील अनेकांना मार्गदर्शन करतात. चाणक्य म्हणतात की जगात असे तिघं आहेत, ज्यांना कधीही झोपेतून उठवण्याची चूक करू नये.

Chanakya Niti : या तिघांना झोपेतून जागं करण्याची चूक कधीच करू नका, चाणक्यांनी दिला मोलाचा सल्ला
CHANAKYAImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 29, 2026 | 8:32 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील अनेकांना मार्गदर्शक ठरतात. चाणक्य आपल्या या ग्रंथामध्ये म्हणतात काही संकटं ही अशी असतात की जी अकस्मात येतात. त्याला आपण काहीच करू शकत नाही. अशा संकटांच्या काळात खचून न जाता, त्यावर योग्य मार्ग शोधल्यास आपल्याला निश्चितपणे यश मिळू शकतं, परंतु काही संकट ही अशी असतात, की जी आपण स्वत: ओढून घेतो, अशा संकटामुळे आपण मोठ्या अडचणीत सापडू शकतो. त्यामुळे कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तो विचारपूर्वकच घेतला पाहिजे. हेच सांकेतिक भाषेत सांगताना चाणक्य यांनी तीन उदाहरणं दिली आहे. चाणक्य म्हणतात या जगात असे तिघं आहेत, ज्यांना तुम्ही कधीच झोपेतून जागं केलं नाही पाहिजे, ते जर झोपेतून जागे झाले तर तुम्ही मात्र मोठ्या संकटात सापडू शकता, प्रसंगी तुमचा मृत्यू देखील होऊ शकतो, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

सिंह – चाणक्य म्हणतात सिंहाला जंगलाचा राजा म्हणतात, त्याची एक वेगळीच दहशत असते. समजा तुम्ही एखाद्या जंगलामध्ये फिरायला गेलात आणि तिथे तुमची गाठ सिंहाशी पडली, तो जर झोपलेला असेल तर त्याला जागं करण्याची चूक करू नका, सिंह जर जागा झाला तर तुम्ही मोठ्या संकटामध्ये सापडू शकता, तुमचा मृत्यू देखील होऊ शकतो, त्यामुळे जंगलामध्ये असताना कधीही सिंहाला झोपेतून जागं करण्याची चूक करू नका.

लहान मुलं – चाणक्य म्हणतात लहान मुलांना कधीही झोपेतून उठवू नका, जर तुम्ही लहान मुलांना झोपेतून उठवलं आणि त्याची झोप पूर्ण झाली नाही तर तो रडून -रडून संपूर्ण घर डोक्यावर घेऊ शकतो, त्याला शांत करण्यासाठी तुमची ऊर्जा खर्च होते.

राजा – चाणक्य म्हणतात राजाला देखील कधीही झोपेतून उठवू नये, राजाची झोप पूर्ण नाही झाली आणि त्याला जर राग आला तर तो तुम्हाला मृत्यूदंडाची शिक्षा देखील देऊ शकतो. त्यामुळे काहीही झालं तरी राजाला झोपेतून उठवू नये.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
अस्वच्छतेमुळे सिंधुदुर्ग रुग्णालयाचे उपहारगृह बंद; परवाना निलंबित
सिंधुदुर्ग शासकीय रुग्णालयाच्या उपहारगृहात मिसळमध्ये आढळले झुरळ; एफडीएची कारवाई
नेपाळ महापुरात बँकेची तिजोरी नदीत वाहून गेली
नेपाळ महापुरात बँकेची तिजोरी नदीत वाहून गेली. २९ जणांना लुटमारीचा प्रयत्न करताना अटक
कुंभमेळ्याला बदनाम करणे थांबवा, अन्यथा नाशिककर चोप देतील; राऊतांना...
कुंभमेळ्याला बदनाम करणे थांबवा, अन्यथा नाशिककर चोप देतील; बड्या नेत्याचा राऊतांना इशारा
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी गृहमंत्री अमित शाह यांना बांधली राखी,
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी गृहमंत्री अमित शाह यांना बांधली राखी, पहा खास क्षणाचा व्हिडीओ
ममता बॅनर्जींवर थेट गुन्हा दाखल, कोर्टाच्या आदेशात...नेमकं प्रकरण काय?
ममता बॅनर्जींवर थेट गुन्हा दाखल, कोर्टाच्या आदेशात... नेमकं प्रकरण काय?
परभणीत एकनाथ शिंदे यांचा भव्य शेतकरी मेळावा; महाराष्ट्राच्या राजकारणात
परभणीत एकनाथ शिंदे यांचा भव्य शेतकरी मेळावा; महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाचं ठरणार
वैजापुरातील पानटपरीवर एफडीएची कारवाई, मुदत बाह्य पदार्थ जप्त
छत्रपती संभाजीनगर: वैजापुरातील पानटपरीवर एफडीएची कारवाई, मुदत बाह्य पदार्थ जप्त
लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही; विद्यार्थ्यांचा...
लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही; आदिवासी विद्यार्थ्यांचा मोठा निर्णय
मोठी बातमी!18 हजारांहून अधिक लाभार्थ्यांची रेशन कार्ड होणार रद्द,
मोठी बातमी!18 हजारांहून अधिक लाभार्थ्यांची रेशन कार्ड होणार रद्द, अचानक काय घडलं?
45 लाख गाड्या, 5 टप्प्यात 6 कोटी मराठे... मनोज जरांगेंनी सांगितलं...
45 लाख गाड्या, 5 टप्प्यात 6 कोटी मराठे... मनोज जरांगेंनी सांगितला मोठा प्लॅन