AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti | ज्या व्यक्तीत असतात हे 4 गुण, ती मोठ्या-मोठ्या संकटांना तोंड देऊ शकते

एक शांत आणि सद्गुणी व्यक्ती प्रत्येक आव्हानावर सहज विजय मिळवते. तर जी आपल्या सवयी मोडू शकत नाही, त्याला कोणीही अडचणीतून मुक्त करु शकत नाही (Chanakya Niti Person with these four qualities can easily overcome any and biggest difficulty in life according to Acharya Chanakya).

Chanakya Niti | ज्या व्यक्तीत असतात हे 4 गुण, ती मोठ्या-मोठ्या संकटांना  तोंड देऊ शकते
Acharya Chanakya
| Edited By: | Updated on: Jul 02, 2021 | 7:36 AM
Share

मुंबई : प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात बर्‍याच समस्या येतात. परंतु काही लोक त्या समस्यांमधून सहज बाहेर पडतात, तर काही लोक त्यात अधिक अडकत जातात. हे सर्व व्यक्तीमधील गुण आणि क्षमता यांच्यामुळे घडते. एक शांत आणि सद्गुणी व्यक्ती प्रत्येक आव्हानावर सहज विजय मिळवते. तर जी आपल्या सवयी मोडू शकत नाही, त्याला कोणीही अडचणीतून मुक्त करु शकत नाही (Chanakya Niti Person with these four qualities can easily overcome any and biggest difficulty in life according to Acharya Chanakya).

आचार्य चाणक्य यांनी अशा चार गुणांबद्दल सांगितले आहे, जे एखाद्या व्यक्तीमध्ये असल्यास ते सर्वात मोठ्या संकटावरही सहज मात करु शकतात. परंतु हे गुण कोणावरही जबरदस्तीने लादले जाऊ शकत नाहीत, ते स्वतःच विकसित करावे लागते.

1. योग्य आणि अयोग्य यातील फरक स्वतःला त्या व्यक्तीला समजून घ्यावे लागतात. ज्यामध्ये ही समज विकसित असली, तो भविष्यातील सर्व समस्या उद्भवण्यापूर्वीच थांबवतो. योग्य आणि अयोग्य यांच्यात भेद करण्याची ही गुणवत्ता एकतर जन्मजात किंवा अनुभवाद्वारे मिळविली जाते. हे कोणालाही शिकवले जाऊ शकत नाही कारण प्रत्येक परिस्थिती ही वेगळी असते.

2. धैर्य हे असे गुण आहे जे एखाद्या व्यक्तीला अगदी वाईट काळातूनही बाहेर काढू शकते. पण धीर धरणे ही प्रत्येकासाठी सहज नाही. ज्यांना संयमाचे महत्त्व माहित आहे, ते जीवनाची प्रत्येक पायरी विचारपूर्वक घेतात. पण धैर्याचा हा गुण कोणालाही लादला जाऊ शकत नाही. एखाद्याला स्वत: सराव करुन जीवनात हा गुण आत्मसात करावा लागतो.

3. आपली वाणी नेहमी गोड ठेवावी, हे आपण लहानपणापासूनच ऐकत आलो आहोत. गोड बोलण्याने कोणाचेही मन मोहित होऊ शकते आणि सर्वात मोठ्या संकटांनाही ते टाळू शकते. परंतु जो माणूस नेहमी कडू बोलण्याची सवय ठेवतो, आपण त्याला गोड बोलायला शिकवू शकत नाही. हा गुण जन्मापासूनच मनुष्यांमध्ये असतो.

4. दान करण्याबाबत आपल्या शास्त्रातही सांगितलं गेलं आहे. पण, दान करण्याची सवय प्रत्येकाला नसते. आपण कोणालाही दानाचे महत्त्व समजावून सांगू शकतो, परंतु ही गुणवत्ता जन्मापासूनच प्रत्येक व्यक्तीमध्ये असते. ज्यांमधये हा गुण नाही, त्यांना हे शिकवले जाऊ शकत नाही.

Chanakya Niti Person with these four qualities can easily overcome any and biggest difficulty in life according to Acharya Chanakya

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chanakya Niti | ज्या घरात या तीन गोष्टींची काळजी घेतली जाते, तिथे लक्ष्मीदेवीची कृपा असते

Chanakya Niti | अभ्यास, प्रवास आणि शेती करताना आचार्य चाणक्य यांचे हे सल्ले लक्षात ठेवा…

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.