AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : हे दोन लोक आयुष्यात कधीच यशस्वी होत नाहीत, पाहा चाणक्य काय सांगतात?

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अनेक गोष्टी लिहून ठेवल्या आहेत. या गोष्टी आजही आपल्याला विचार करायला भाग पाडतात. आज आपण चाणक्य यांचे असेच काही विचार जाणून घेणार आहोत.

Chanakya Niti : हे दोन लोक आयुष्यात कधीच यशस्वी होत नाहीत, पाहा चाणक्य काय सांगतात?
Chanakya NitiImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 30, 2026 | 9:56 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी जे विचार मांडले ते विचार आजही अनेकांना प्रेरणा देतात, मार्गदर्शक ठरतात. चाणक्य म्हणतात ज्या व्यक्तीला आयुष्यात वेळेचं गणित कळतं तो व्यक्ती यशस्वी होतो. प्रत्येक गोष्टीची विशिष्ट वेळ असते, त्या -त्या वेळेत जर त्या गोष्टी झाल्या तर यश तुम्हाला मिळतंच. परंतु तुम्ही जर वेळ चुकवली तर ती वेळ पुन्हा कधी तुमच्या आयुष्यात येत नाही आणि तुम्ही अपयशी होतात. तसेच तुम्हाला जर यश पाहिजे असेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे संयम. एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुमचा वाईट काळ सुरू असतो तेव्हा कधीही खचून जाऊ नका. संयम ठेवा, आणि जेव्हा तुमची चांगली वेळ येते तेव्हा अधिक जोमाने कामाला लागा यश तुम्हाला नक्की मिळेल, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. चाणक्य पुढे म्हणतात की या जगात दोन लोक कधीच यशस्वी होत नाहीत, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

विचार करूनही कृती न करणारे लोक – चाणक्य म्हणतात समाजात असे अनेक लोक असतात, जे खूप विचार करतात मात्र कृतीच करत नाहीत. म्हणजे एखाद्या व्यक्तीला एखाद्या कामाची सुरुवात करायची असते, तो त्याबद्दल प्रचंड विचार करतो, परंतु कृतीच करत नाही. असा व्यक्ती त्याच्या आयुष्यात अपयशी होतो, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

विचार न करता काम करणारे लोक – चाणक्य म्हणतात जसे काही लोक हे खूप विचार करतात, परंतु कृती काहीच करत नाहीत. तसेच काही लोक हे कोणताही विचार न करता कृती करतात, असे लोक देखील अपयशी होतात. जेव्हा तुम्ही कोणताही विचार न करता एखादं काम सुरू करात त्यामध्ये यश मिळण्याची शक्यता खूप कमी असते, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार...
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार....
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल.
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत.