AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Garuda Purana : ‘या’ पाच व्यक्तींची संगत तुम्हाला विनाशाच्या मार्गावर नेईल

संगतीचा एखाद्या व्यक्तीच्या जीवनावर निश्चितच मोठा परिणाम होतो (Garuda Purana). जर संगत चांगली असेल, तर त्या व्यक्तीच्या जीवनाला एक योग्य दिशा मिळते, परंतु जर व्यक्तीची संगत वाईट असेल तर चांगली व्यक्ती देखील चुकीच्या मार्गावर जाते आणि आपलं आयुष्य खराब करते.

Garuda Purana : 'या' पाच व्यक्तींची संगत तुम्हाला विनाशाच्या मार्गावर नेईल
मृत्यूच्या वेळी कोणत्या लोकांना काय भोगावे लागतात कष्ट
| Updated on: Jun 06, 2021 | 10:28 AM
Share

मुंबई : संगतीचा एखाद्या व्यक्तीच्या जीवनावर निश्चितच मोठा परिणाम होतो (Garuda Purana). जर संगत चांगली असेल, तर त्या व्यक्तीच्या जीवनाला एक योग्य दिशा मिळते, परंतु जर व्यक्तीची संगत वाईट असेल तर चांगली व्यक्ती देखील चुकीच्या मार्गावर जाते आणि आपलं आयुष्य खराब करते. गरुड पुराणात देखील अशा काही लोकांबद्दल सांगण्यात आलं आहे, ज्यांपासून अंतर ठेवण्यातच शहाणपण आहे (Company Of These Five Types Of People Will Take You To Destruction By Garuda Purana).

सनातन धर्मातील 18 महापुराणांपैकी एक गरुड पुराण मानले जाते. अशा सर्व धोरणांचा उल्लेख गरुड पुराणात केला गेला आहे जो तुमच्या भविष्यासाठी उत्तम आहे. गरुड पुराणात जीवनापासून मृत्यूपर्यंत आणि मृत्यूनंतरच्या घटनांचे वर्णन केले आहे. गरुड पुराणात ज्या पाच लोकांपासून अंतर ठेवण्यास सांगण्यात आले आहे त्यांच्याबद्दल जाणून घेऊ –

नशिबाच्या भरवशावर राहणारे लोक

असे काही लोक आहेत जे केवळ नशिबाच्या भरवशावर असतात. असे लोक प्रत्यक्षात कर्म न करत आणि त्यासाठी इतरांना प्रेरित करण्याचा प्रयत्न करतात. पण, आयुष्यात कर्म केल्याशिवाय आपलं नशिबही आपल्याला साथ देत नाही. कर्म केल्याने नशीब बदलले जाऊ शकते, परंतु नशिबाच्या भरवशावर कर्म सोडू शकत नाही. नशिबावर अवलंबून असलेल्यांपासून दूर राहावे.

नकारात्मक विचार करणारे लोक

बरेच लोक जीवनात इतके नकारात्मक असतात की त्यांना प्रत्येक गोष्टीत काही नकारात्मकता दिसते. असे लोक आपल्या यशामध्ये नेहमीच अडथळा ठरतात. जर अशी नकारात्मक विचारसरणीची माणसे आपल्या सभोवताल राहत असतील तर त्यांच्यापासून अंतर ठेवण्यातच शहाणपण.

दिखावा करणारे लोक

काही व्यक्ती असे असतात ज्यांना फक्त प्रत्येक गोष्टीवर शो ऑफ करायचं असते, ते नेहमी स्वत:ला मोठं दाखवण्याचा प्रयत्न करतात. असे लोक स्वतःच्या अहंकाराला संतुष्ट करण्यासाठी हे करतात. यासाठी ते इतरांना दुखावण्यासही संकोच करत नाहीत. अशा लोकांपासून नेहमीच दूर रहावे.

व्यर्थ गोष्टींमध्ये वेळ वाया घालवणे

संगत नेहमी अशा लोकांची ठेवावी ज्यांच्याकडून तुम्हाला काहीतरी शिकायला मिळेल. परंतु काही व्यक्ती फक्त बोलतात आणि बोलण्यात व्यर्थ वेळ घालवतात, ते कोणतेही कार्य व्यवस्थित करत नाहीत. अशा व्यर्थ गोष्टी करणार्‍या लोकांपासून दूर राहणे आपल्यासाठी चांगले आहे. असे लोक आपला बहुमूल्य वेळ वाया घालवतात.

आळशी लोक

आळशी व्यक्ती त्याच्या अपयशाला स्वत:ला जबाबदार असतो. परंतु तो आपल्या अपयशाचा दोष नेहमी नशिबावर किंवा दुसऱ्या व्यक्तीला देतो. त्याला स्वतःच्या उणिवा दिसत नाही. अशा लोकांपासून नेहमीच दूर रहावे.

Company Of These Five Types Of People Will Take You To Destruction By Garuda Purana

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Garuda Purana | या तीन सवयी कुटुंबात भांडणे आणि मतभेदांचे कारण ठरु शकतात

Garuda Purana | ‘या’ सवयींमुळे देवी लक्ष्मी होतात नाराज, गरुड पुराणातही आहे याचा उल्लेख

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.