AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Garuda Purana : ‘या’ पाच व्यक्तींची संगत तुम्हाला विनाशाच्या मार्गावर नेईल

संगतीचा एखाद्या व्यक्तीच्या जीवनावर निश्चितच मोठा परिणाम होतो (Garuda Purana). जर संगत चांगली असेल, तर त्या व्यक्तीच्या जीवनाला एक योग्य दिशा मिळते, परंतु जर व्यक्तीची संगत वाईट असेल तर चांगली व्यक्ती देखील चुकीच्या मार्गावर जाते आणि आपलं आयुष्य खराब करते.

Garuda Purana : 'या' पाच व्यक्तींची संगत तुम्हाला विनाशाच्या मार्गावर नेईल
मृत्यूच्या वेळी कोणत्या लोकांना काय भोगावे लागतात कष्ट
| Updated on: Jun 06, 2021 | 10:28 AM
Share

मुंबई : संगतीचा एखाद्या व्यक्तीच्या जीवनावर निश्चितच मोठा परिणाम होतो (Garuda Purana). जर संगत चांगली असेल, तर त्या व्यक्तीच्या जीवनाला एक योग्य दिशा मिळते, परंतु जर व्यक्तीची संगत वाईट असेल तर चांगली व्यक्ती देखील चुकीच्या मार्गावर जाते आणि आपलं आयुष्य खराब करते. गरुड पुराणात देखील अशा काही लोकांबद्दल सांगण्यात आलं आहे, ज्यांपासून अंतर ठेवण्यातच शहाणपण आहे (Company Of These Five Types Of People Will Take You To Destruction By Garuda Purana).

सनातन धर्मातील 18 महापुराणांपैकी एक गरुड पुराण मानले जाते. अशा सर्व धोरणांचा उल्लेख गरुड पुराणात केला गेला आहे जो तुमच्या भविष्यासाठी उत्तम आहे. गरुड पुराणात जीवनापासून मृत्यूपर्यंत आणि मृत्यूनंतरच्या घटनांचे वर्णन केले आहे. गरुड पुराणात ज्या पाच लोकांपासून अंतर ठेवण्यास सांगण्यात आले आहे त्यांच्याबद्दल जाणून घेऊ –

नशिबाच्या भरवशावर राहणारे लोक

असे काही लोक आहेत जे केवळ नशिबाच्या भरवशावर असतात. असे लोक प्रत्यक्षात कर्म न करत आणि त्यासाठी इतरांना प्रेरित करण्याचा प्रयत्न करतात. पण, आयुष्यात कर्म केल्याशिवाय आपलं नशिबही आपल्याला साथ देत नाही. कर्म केल्याने नशीब बदलले जाऊ शकते, परंतु नशिबाच्या भरवशावर कर्म सोडू शकत नाही. नशिबावर अवलंबून असलेल्यांपासून दूर राहावे.

नकारात्मक विचार करणारे लोक

बरेच लोक जीवनात इतके नकारात्मक असतात की त्यांना प्रत्येक गोष्टीत काही नकारात्मकता दिसते. असे लोक आपल्या यशामध्ये नेहमीच अडथळा ठरतात. जर अशी नकारात्मक विचारसरणीची माणसे आपल्या सभोवताल राहत असतील तर त्यांच्यापासून अंतर ठेवण्यातच शहाणपण.

दिखावा करणारे लोक

काही व्यक्ती असे असतात ज्यांना फक्त प्रत्येक गोष्टीवर शो ऑफ करायचं असते, ते नेहमी स्वत:ला मोठं दाखवण्याचा प्रयत्न करतात. असे लोक स्वतःच्या अहंकाराला संतुष्ट करण्यासाठी हे करतात. यासाठी ते इतरांना दुखावण्यासही संकोच करत नाहीत. अशा लोकांपासून नेहमीच दूर रहावे.

व्यर्थ गोष्टींमध्ये वेळ वाया घालवणे

संगत नेहमी अशा लोकांची ठेवावी ज्यांच्याकडून तुम्हाला काहीतरी शिकायला मिळेल. परंतु काही व्यक्ती फक्त बोलतात आणि बोलण्यात व्यर्थ वेळ घालवतात, ते कोणतेही कार्य व्यवस्थित करत नाहीत. अशा व्यर्थ गोष्टी करणार्‍या लोकांपासून दूर राहणे आपल्यासाठी चांगले आहे. असे लोक आपला बहुमूल्य वेळ वाया घालवतात.

आळशी लोक

आळशी व्यक्ती त्याच्या अपयशाला स्वत:ला जबाबदार असतो. परंतु तो आपल्या अपयशाचा दोष नेहमी नशिबावर किंवा दुसऱ्या व्यक्तीला देतो. त्याला स्वतःच्या उणिवा दिसत नाही. अशा लोकांपासून नेहमीच दूर रहावे.

Company Of These Five Types Of People Will Take You To Destruction By Garuda Purana

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Garuda Purana | या तीन सवयी कुटुंबात भांडणे आणि मतभेदांचे कारण ठरु शकतात

Garuda Purana | ‘या’ सवयींमुळे देवी लक्ष्मी होतात नाराज, गरुड पुराणातही आहे याचा उल्लेख

ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....