AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खाली पडलेलं अन्न चुकूनही खाऊ नये; अन्यथा आकर्षित होतील ‘या भयानक गोष्टी

आपण लहानपणी अनेकदा हे ऐकलं असेल की खाली पडलेलं अन्न खायचं नसतं. त्यामागे काहीजणांच्या मते  अध्यात्म आहे तर काहींच्या मते विज्ञानाच्या दृष्टीने एक वेगळं महत्त्व आहे. पण आजही अनेक ठिकाणी खाली पडलेल्या अन्नाला खाणे अशुभ मानले जाते. कारण त्यामुळे घरात काही गोष्टी पटकन आकर्षित होतात असं म्हटलं गेलं आहे.  

खाली पडलेलं अन्न चुकूनही खाऊ नये; अन्यथा आकर्षित होतील 'या भयानक गोष्टी
Do not Eat Dropped Food, Myths, Science, and Spiritual Beliefs Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 17, 2025 | 3:32 PM
Share

आपण लहानपणी अनेकदा हे ऐकलं असेल की खाली पडलेलं अन्न खायचं नसतं. त्यामागे काहीजणांच्या मते वेगळाच विश्वास आहे तर काहींच्या मते विज्ञानाच्या दृष्टीने एक वेगळं महत्त्व आहे. जसं की अनेक घरांमध्ये, वडीलधारी लोक असेही म्हणतात की ब्रह्मराक्षस पडलेले अन्न खातात. हे ऐकण्यास थोडं विचित्र वाटेल, परंतु त्यामागे श्रद्धा, परंपरा आणि व्यावहारिक कारणे आहेत.

ब्रह्मराक्षसांसारख्या अदृश्य शक्ती पडलेल्या अन्नाकडे लवकर आकर्षित होतात

प्राचीन काळी लोकांचा असा विश्वास होता की ब्रह्मराक्षसांसारख्या अदृश्य शक्ती पडलेल्या अन्नाकडे लवकर आकर्षित होतात आणि अन्न आता मानवांसाठी पवित्र राहिलेले नाही. विज्ञानाच्या दृष्टिकोनातून पाहिले तर त्यामागे अनेक कारणे आहेत, जसे की घाण, बॅक्टेरिया आणि कीटकांचा धोका. यामागील श्रद्धा, गूढ आणि कारण काय आहे जाणून घेऊयात.

ब्रह्मराक्षांचा उल्लेख कुठून आला?

जुन्या हिंदू मान्यतेमध्ये, ब्रह्मराक्षस एक शक्तिशाली आणि क्रोधी आत्मा मानला जातो. असे म्हटले जाते की हे आत्मे पूर्वी विद्वान किंवा पंडित होते, परंतु काही कारणास्तव त्यांना शाप मिळाला आणि ते राक्षस बनले. धार्मिक कथांनुसार, ब्रह्मराक्षस नकारात्मक ऊर्जा आणि आजूबाजूच्या अशुद्ध गोष्टींमुळे आकर्षित होतात, ज्यामध्ये पडलेल्या अन्नाचाही समावेश आहे.

सांडलेले अन्न आणि अशुद्धता यांचा संबंध

आपल्या पूर्वजांचा असा विश्वास होता की ताटातून जमिनीवर पडलेले अन्न आता “भोग” किंवा “प्रसाद” म्हणून पवित्र मानण्यास पात्र नाही. मंदिरात अर्पण केलेला प्रसाद एकदा पडला की तो पुन्हा अर्पण केला जात नाही, त्याचप्रमाणे सांडलेले अन्न देखील अशुभ मानले जाते. तसेच याचे अजुन एक कारण म्हणजे जमिनीवर घाण, धूळ आणि अदृश्य जंतू असतात, ज्यामुळे अन्न लगेच अशुद्ध होते.

लोककथा आणि भीतीचा परिणाम

अनेकजण पूर्वी ब्रह्मराक्षसांच्या कथा सांगत असत, ही एक प्रकारची “भीती” होती जेणेकरून मुले पडलेले अन्न उचलू नयेत आणि स्वच्छतेची काळजी घेतील असं विज्ञानाने दावा केला आहे. त्यामुळे ही कथा खरी नसून त्याचा उद्देश लोकांना आरोग्याविषयी जागरूक करणे हाच होता.

वैज्ञानिक दृष्टिकोनातून

अन्न खाली पडताच धूळ, बॅक्टेरिया आणि सूक्ष्मजंतू त्यावर चिकटतात. जमीन कितीही स्वच्छ असली तरी त्यात सूक्ष्मजंतू नेहमीच असतात. ते खाल्ल्याने अन्नातून विषबाधा, पोटदुखी, उलट्या आणि जुलाब असे आजार होऊ शकतात.

आध्यात्मिक कारण

आध्यात्मिक श्रद्धेनुसार, अन्न केवळ शरीराचेच नाही तर आत्म्याचेही पोषण करते. जर अन्न जमिनीवर पडले तर त्याची ऊर्जा बदलते आणि ते खाण्यायोग्य राहत नाही. असेही मानले जाते की पडलेले अन्न अदृश्य शक्तींद्वारे खाल्ले जाते, ज्यामुळे एखाद्या व्यक्तीची ऊर्जा कमी होऊ शकते. म्हणून जुन्या लोकांचं म्हणणं असो किंवा विज्ञानाच्या सांगण्यानुसार असो खाली पडलेलं अन्न हे खाणं चांगलं नसतं हे, आरोग्यास नुकसान पोहचवू शकतं हे मात्र खरं आहे.

( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.