चाणक्य नीती: अपमानाचा बदला घेण्यासाठी चाणक्य यांच्या ‘या’ धोरणाचे करा पालन
चाणक्य नीतिनुसार कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्यामधील चांगल्या गुणांचा त्याग करू नये. वाईट परिस्थितीमध्ये हेच गुण आपल्या उपयोगात येतात आणि यशस्वी बनवतात. यासाठी अपमानाचा बदला घेण्यासाठी चाणक्यांच्या या धोरणचे पालन करा.

आचार्य चाणक्य यांची धोरणे आजही जीवनाला दिशा देणारी मानली जातात. कारण महान व्यक्तीमत्व असलेले आचार्य चाणक्य यांनी राजकारण, समाजकारण आणि जीवनातील त्यांच्या अनुभवांमधून आणि सखोल ज्ञानातून त्यांनी अनेक धोरणे तयार केली आहेत. जी आजही तितकीच प्रचलित आहेत. तसेच जी व्यक्ती त्यांच्या आयुष्यात चाणक्यानिती यांचे धोरणांचा अवलंब करून पुढे जातो ती व्यक्ती नेहमी यशाच्या शिखरावर पोहचते. त्यापैकी एका धोरणात, चाणक्य म्हणतात की अपमानाचा बदला व्याजासह घेतला पाहिजे, कारण जोपर्यंत आपण ते सहन करणे थांबवत नाही तोपर्यंत लोकं काहीही बोलणे थांबवणार नाहीत.” हे धोरण आपल्याला स्वाभिमान आणि स्वसंरक्षणाची भावना देते.
आचार्य चाणक्य यांच्या धोरणाचे पालन
आचार्य चाणक्य यांच्या नितीनुसार जर कोणी तुमचा अपमान केला तर त्याला दुर्लक्ष करणे हे तुमच्या कमकुवतपणाचे लक्षण असू शकते. जोपर्यंत तुम्ही अपमान सहन करत राहाल, तोपर्यंत लोक तुम्हाला कमकुवत समजले जाईल आणि तेच काम पुन्हा करतील. म्हणून अशा लोकांना त्यांच्या कृतींसाठी उत्तर द्यावे लागते जेणेकरून त्यांना समजेल की प्रत्येकजण सहनशील नसतो.
स्वाभिमानाशी तडजोड करू नका
चाणक्य यांचा असा विश्वास होता की स्वाभिमान ही सर्वात मोठी संपत्ती आहे. कोणी कितीही उच्च पदावर असला तरी, त्याचा वापर करून कोणीही तुमची प्रतिष्ठा दुखावत असेल तर त्याला उत्तर देणे आवश्यक आहे. पण हे उत्तर बुद्धिमत्तेनुसार आणि वेळेनुसार असले पाहिजे. अपमानाला भावना किंवा राग न बाळगता आणि योग्य वेळी योग्य पद्धतीने प्रतिसाद देणे चांगले.
कमी आदर चालेल, पण अनादर नाही
चाणक्य नीतिचा हा भाग खूप विचार करायला लावणारा आहे की जर कोणी तुम्हाला पूर्ण आदर देत नसेल तर तुम्ही थोडा कमी आदर देऊन तडजोड करू शकता. पण जर कोणी तुमचा वारंवार अपमान करत असेल तर त्याला दुर्लक्ष करणे म्हणजे आत्महत्येसारखे आहे. प्रत्येक व्यक्तीला आपला स्वाभिमान कसा जपायचा हे माहित असले पाहिजे.
आजच्या काळात चाणक्य नीतिची प्रासंगिकता
सध्याच्या जीवनात, मग ते ऑफिस असो, समाज असो किंवा वैयक्तिक जीवन असो – बऱ्याचदा लोकं गप्प राहतात आणि अपमान सहन करतात. पण चाणक्याचे हे धोरण आपल्याला शिकवते की प्रत्येक वेळी मौन हा उपाय नाही. स्वतःच्या प्रतिष्ठेचे रक्षण करण्यासाठी आवाज उठवणे, अन्यायाविरुद्ध उभे राहणे आणि वेळीच प्रतिसाद देणे यातच खरे शहाणपण आहे. चाणक्य आपल्याला शिकवतात की “सन्मान कमी असू शकतो, पण अपमानाचा बदला व्याजाने घ्यावा लागतो.”
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
