AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Guru Pornima 2025 : गुरू कोणाला मानावं? आणि गुरु दीक्षा घेणं इतकं महत्त्वाचं का आहे? जाणून घ्या सविस्तर

गुरु पौर्णिमा हा दिवस आपल्या आयुष्यात ज्ञान, संस्कार आणि योग्य मार्गदर्शन देणाऱ्या गुरुजनांना समर्पित आहे. मात्र प्रश्न असा निर्माण होतो की, गुरू कोणाला मानावं? आणि गुरु दीक्षा घेणं खरंच आवश्यक आहे का? या प्रश्नांचा उहापोह करताना आपण या पवित्र दिवसाचे खरे महत्त्व समजून घेऊया.

Guru Pornima 2025 : गुरू कोणाला मानावं? आणि गुरु दीक्षा घेणं इतकं महत्त्वाचं का आहे? जाणून घ्या सविस्तर
Guru Pornima 2025: गुरु कोणाला मानाल? जाणून घ्या योग्य मार्गदर्शन
साक्षी कणसे
साक्षी कणसे | Edited By: | Updated on: Jul 10, 2025 | 9:50 AM
Share

गुरु पौर्णिमा हा दिवस गुरुजनांप्रती आदर, प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो. हा दिवस केवळ एक सण नसून, तो आपल्या आयुष्यातील एका मार्गदर्शक व्यक्तीबद्दल आत्मीयतेने आठवण काढण्याचा आणि त्यांच्या योगदानाचं स्मरण करण्याचा आहे. गुरु पौर्णिमा 2025 मध्ये 10 जुलै रोजी साजरी होणार आहे.

गुरु म्हणजे कोण?

संस्कृत भाषेत ‘गुरु’ या शब्दाचा अर्थ आहे “अंधारातून प्रकाशाकडे नेणारा”. प्राचीन काळापासून गुरूंना ईश्वरतुल्य मानलं गेलं आहे. वेद, पुराण, महाभारत यांसारख्या ग्रंथांमध्ये गुरूच्या महत्त्वाचं भरपूर वर्णन आढळतं. भगवान शिवांना या जगातील पहिले गुरु मानलं जातं, तर वेदव्यास यांचा जन्म ज्या दिवशी झाला, तो दिवस ‘गुरु पौर्णिमा’ म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या दिवशी गुरूंना वंदन करणं, त्यांचं स्मरण करणं आणि योग्य गुरु निवडणं विशेष महत्त्वाचं ठरतं.

गुरु का निवडावा?

गुरु हा केवळ धार्मिक किंवा आध्यात्मिक क्षेत्रापुरता मर्यादित नसतो. आजच्या काळात तो शिक्षक, मार्गदर्शक, जीवनात प्रेरणा देणारा कुणीही असू शकतो. आपल्या जीवनाला दिशा देणारा, योग्य-अयोग्य यातील फरक स्पष्ट करणारा आणि आपण चांगल्या मार्गावर चालावं यासाठी प्रेरणा देणारा कोणताही व्यक्ती गुरु म्हणून स्वीकारला जाऊ शकतो.

श्रीकृष्णाने अर्जुनाला स्पष्टपणे सांगितलं आहे की जसं माझी भक्ती करणं योग्य आहे, तसं गुरुची भक्ती करणंही योग्य आहे. गंगा नदी जशी सर्व नद्यांमध्ये श्रेष्ठ मानली जाते, तशी गुरुसेवा सर्व शुभकर्मांमध्ये श्रेष्ठ मानली जाते.

कोणाला बनवावं गुरु?

गुरु निवडताना ‘ज्ञानदाते’चा विचार केला पाहिजे. असा व्यक्ती जो केवळ माहिती देत नाही, तर आपल्याला विचार करायला शिकवतो, योग्य निर्णय घेण्यासाठी मदत करतो आणि आयुष्याला सकारात्मक वळण देतो तोच खरा गुरु! शास्त्रांनुसार, सद्गुरूची प्राप्ती होणं हे मोठं सौभाग्य मानलं जातं. फक्त कोणालाही गुरु म्हणून स्वीकारून चालत नाही, तर त्यांच्याशी प्रामाणिकपणे जोडलेलं असणं आवश्यक आहे.

गुरु दीक्षा का आवश्यक आहे?

सनातन धर्मानुसार, जो कोणी धार्मिक गुरू मानतो त्याने त्यांच्याकडून दीक्षा घेणं अत्यंत आवश्यक मानलं गेलं आहे. शास्त्रांमध्ये सांगितलं आहे की गुरु दीक्षा विना केवळ कर्म केल्याने त्याचे पुण्य मिळत नाही. उदाहरणार्थ कन्यादान, व्रत, दान, पूजाअर्चा, मंदिर बांधकाम, शिवालय किंवा जलसाठा निर्मिती अशा सर्व धार्मिक कार्यांमध्ये दीक्षा घेतल्याशिवाय फलप्राप्ती होत नाही असं स्पष्ट सांगितलं आहे.

Follow Us
शॉर्टकट'चा वापर करु नका', पंतप्रधान मोदींचा Gen-Z तरुणाईला संदेश
PM Modi : 'कधीही 'शॉर्टकट'चा वापर करु नका', पंतप्रधान मोदींचा Gen-Z तरुणाईला खास संदेश
विद्यार्थी घाबरत नाहीत, तुम्हीही घाबरू नका! राहुल गांधींचा मीडियाला...
Rahul Gandhi | विद्यार्थी घाबरत नाहीत, तुम्हीही घाबरू नका! राहुल गांधींचा मीडियाला थेट संदेश, म्हणाले...
मी रोज संसदेत येतो मात्र... गृहमंत्री अमित शाह यांचं मोठं विधान
मी रोज संसदेत येतो मात्र... गृहमंत्री अमित शाह यांचं मोठं विधान, विरोधकांना केलं चर्चेच आवाहन
कॅब-टॅक्सी चालकांसाठी मोठी बातमी! सरकारचा मोठा निर्णय; नियम मोडल्यास..
कॅब-टॅक्सी चालकांसाठी मोठी बातमी! सरकारचा मोठा निर्णय; नियम मोडल्यास ही चूक पडणार महागात
आता काही खरं नाही! आयुक्त तुकाराम मुंढेंनी बैठकीत सगळंच सागितलं...
आता काही खरं नाही! आयुक्त तुकाराम मुंढेंनी सगळंच सागितलं अन् एकनाथ शिंदेंनी दिले कडक निर्देश, थेट मकोका...
3 वर्षांत 22 लाखांहून अधिक कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप; या जिल्ह्यांत...
मराठा आरक्षणावर मोठी अपडेट! 3 वर्षांत 22 लाखांहून अधिक कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप; या जिल्ह्यांत सर्वाधिक वितरण
खड्डे, बंद कंपन्या आणि बेरोजगारी! वाजेंनी सरकारला एकाच वेळी घेरलं
Rajabhau Waje | खड्डे, बंद कंपन्या आणि बेरोजगारी! राजाभाऊ वाजेंनी सरकारला एकाच वेळी घेरलं
शिवसेनेच्या आमदारांना पवईच्या हॉटेलमध्ये... नरेश म्हस्के काय म्हणाले?
शिवसेनेच्या आमदारांना पवईच्या हॉटेलमध्ये... नरेश म्हस्केंनी सांगितलं पक्ष फुटीच्या अगदी काही दिवसांपूर्वी काय काय घडलं होतं?
एक तरी पत्र दाखवलं तर मी राजीनामा देईन.... शिंदे गटातील नेत्याचं विधान
एक तरी पत्र दाखवलं तर मी राजीनामा देईन नाहीतर.... शिंदे गटातील बड्या नेत्याचं राऊतांना खुलं चॅलेंज
मुंबईत मध्यरात्री मोठी दुर्घटना! घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळली....
मुंबईत मध्यरात्री मोठी दुर्घटना! घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळली, ५-६ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती