AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिवसातून किती वेळा हनुमान चालिसा वाचावी? जाणून घ्या

हनुमान चालिसा पठणाचे विशेष महत्त्व काय आहे, याविषयी तुम्हाला माहिती आहे का? नसेल माहिती तर आज आम्ही सांगणार आहोत. हनुमान चालिसा दिवसातून किती वेळा पठण करावी, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर पौराणिक मान्यतेनुसार जाणून घ्या.

दिवसातून किती वेळा हनुमान चालिसा वाचावी? जाणून घ्या
हनुमान चालिसा पठणाचे महत्त्व
| Edited By: | Updated on: Dec 26, 2024 | 4:00 PM
Share

हनुमान चालिसा पठणाचे विशेष महत्त्व आहे. मंगळवार आणि शनिवार हनुमानजींची स्तुती करण्यासाठी खास दिवस मानले जातात. या दिवशी लोक संकटांपासून मुक्त होण्यासाठी हनुमान चालिसाचे पठण करतात.

असे मानले जाते की हनुमानजींची स्तुती केल्याने सर्व प्रकारच्या संकटांपासून मुक्ती मिळते आणि आत्मविश्वास वाढतो. अनेकदा मनात प्रश्न येतो की, मंगळवार किंवा इतर कोणत्याही दिवशी हनुमानजींच्या स्तुतीसाठी किती वेळा हनुमान चालिसा पठण करावे? असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल तर जाणून घेऊया या प्रश्नाचे उत्तर.

दिवसातून किती वेळा हनुमान चालिसा वाचावी?

हनुमान चालीसाचे पठण केव्हाही करता येते, परंतु असे मानले जाते की मंगळवार आणि शनिवारी 7 वेळा पाठ केल्याने विशेष लाभ मिळतो. असे केल्याने हनुमानजींचा आशीर्वाद मिळतो. सकाळ किंवा संध्याकाळ ही पठणाची उत्तम वेळ मानली जाते.

सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे हनुमान चालीसा पठण करण्यासाठी कोणत्याही विशेष विधीची आवश्यकता नाही. तुम्ही कोणत्याही निर्जन ठिकाणी आरामात बसून मनातल्या मनात हनुमान चालीसा पठण करू शकता.

हनुमानजींच्या भक्तीसाठी कोणताही खास दिवस नसतो. हनुमान भक्त कधीही त्यांची स्तुती करू शकतात. यामागचे कारण म्हणजे हनुमान जी कलियुगातील जागृत देवता आहेत, त्यामुळे रोज हनुमानजींच्या स्तुतीला खूप महत्त्व आहे. हनुमान चालीसा पठण केल्याने संकटे तर दूर होतातच शिवाय मनाला ही शांती मिळते. त्यामुळे हनुमानजींची रोज स्तुती केली जाऊ शकते.

हनुमानाने चेंडू समजून सूर्य गिळला

हनुमान चालीसा पठण केले जाते कारण जेव्हा बाल हनुमानाने चेंडू समजून सूर्याला गिळले तेव्हा इंद्राने आपल्या वज्राने हनुमानजींना जखमी केले. यानंतर हनुमानाचे दिव्य पिता पवन देव संतापले आणि त्यांनी संपूर्ण सृष्टीची हवा थांबवली, ज्यामुळे सर्व प्राणी मरायला लागले. यानंतर इंद्रदेवांनी पवन देवयांची माफी मागितली आणि ब्रह्माजींनी हनुमानजींना पुन्हा जिवंत केले.

मंगलदेवांनी हनुमानजींना दिली भेट

जेव्हा हनुमानजींना पुन्हा जीवन मिळाले तेव्हा सर्व देवांनी हनुमानजींना एक वरदान दिले. मंगलदेव म्हणाले की, जो कोणी हनुमानजींची स्तुती करेल त्याला मंगळाच्या नकारात्मक प्रभावांपासून मुक्ती मिळेल. त्यामुळे मंगळवारी हनुमान चालिसा पठणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

हनुमान चालीसा पठणाचे फायदे

हनुमान चालीसा पठण केल्याने मनोबल वाढते. समस्यांशी झगडणाऱ्या व्यक्तीने जर नियमितपणे हनुमान चालिसाचे पठण केले तर त्याच्यात आव्हानांशी लढण्याची अद्भुत शक्ती असते. तसेच हनुमान चालीसा पठण केल्याने मानसिक तणाव दूर होतो आणि रोगप्रतिकारशक्तीही वाढते. हनुमान चालीसा पठणापासून नकारात्मक शक्तींना ही दूर ठेवले जाते.

(डिस्क्लेमर: वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
लाठ्या-बंदुका आणा... मी तिरंगा घेऊन येतो! सरकारला ठाकरेंचा थेट इशारा
Uddhav Thackeray | लाठ्या-बंदुका आणा... मी तिरंगा घेऊन येतो! सरकारला उद्धव ठाकरेंचा थेट इशारा
दिल्लीच्या आंदोलनाची धग मुंबईत! आदित्य -अमित एकाच मंचावर
Dadar | दिल्लीच्या आंदोलनाची धग मुंबईत! शिवाजी पार्कवर विद्यार्थ्यांचा महासागर; आदित्य ठाकरे-अमित ठाकरे एकाच मंचावर
पंतप्रधान मोदींचा अचानक Gen Z अवतार! सेल्फी व्हिडिओमागचं गुपित काय?
Pm Narendra Modi | पंतप्रधान मोदींचा अचानक Gen Z अवतार! सेल्फी व्हिडिओमागचं गुपित काय?
विद्यार्थ्यांवर पॅलेट गन का चालवली? जखमी आंदोलकाला समोर आणत....
Rahul Gandhi | विद्यार्थ्यांवर पॅलेट गन का चालवली? जखमी आंदोलकाला समोर आणत राहुल गांधींचा सरकारला थेट सवाल
CJP च्या दोन मागण्या मान्य, मात्र प्रधानांच्या राजीनाम्याचं काय?
CJP च्या दोन मागण्या मान्य, मात्र धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचं काय? काय म्हणालं सरकार?
पेपर फोडणाऱ्यांचं आता काय खरं नाही; दोषींना इतकी मोठी शिक्षा...
NEET Paper Leak Update | पेपर फोडणाऱ्यांचं आता काय खरं नाही; दोषींना इतकी मोठी शिक्षा, सरकारचा मोठा निर्णय
CJP-सरकारची निर्णायक बैठक सुरू; प्रधानांच्या राजीनाम्यावर CJP ठाम
मोठी बातमी! CJP-सरकारची निर्णायक बैठक सुरू; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर CJP ठाम
आज आम्हाला अटक होऊ शकते, पण.... अभिजित दिपके नेमकं काय म्हणाले?
Abhijeet Dipke | आज आम्हाला अटक होऊ शकते, पण.... अभिजित दिपके नेमकं काय म्हणाले?
आंदोलनाने सरकारची चिंता वाढली; दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्याच रद्द?
Delhi Police News | विद्यार्थी आंदोलनाने सरकारची चिंता वाढली; दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्याच केल्या रद्द, नवा आदेश काय?
हा शिवरायांचा महाराष्ट्र नाही! वर्षा गायकवाड यांचा संताप
Varsha Gaikwad | मुंबई पोलिसाकडून महिला आंदोलकाशी गैरवर्तन? हा शिवरायांचा महाराष्ट्र नाही! वर्षा गायकवाड यांचा संताप