AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Margashirsha Purnima 2021 | कधी आहे मार्गशीर्ष पौर्णिमा ?, जाणून महत्त्व, शुभ मुहूर्त, उपासनेची पद्धत

हिंदू धर्मात पौर्णिमेला जास्त महत्त्व प्राप्त झाल आहे. त्यातही मार्गशीर्ष पौर्णिमा महत्त्वाची मानली जाते. या दिवशी श्री नारायण आणि माता लक्ष्मीची मनोभावे पूजा केल्यानेच मोक्षाचा मार्ग खुला होतो अशी मान्यता आहे.

Margashirsha Purnima 2021 | कधी आहे मार्गशीर्ष पौर्णिमा ?, जाणून महत्त्व, शुभ मुहूर्त, उपासनेची पद्धत
Margashirsha Purnima
| Edited By: | Updated on: Dec 10, 2021 | 8:46 PM
Share

मुंबई :  हिंदू धर्मात पौर्णिमेला जास्त महत्त्व आहे. त्यातही मार्गशीर्ष पौर्णिमा महत्त्वाची मानली जाते. या दिवशी श्री नारायण आणि माता लक्ष्मीची मनोभावे पूजा केल्यानेच मोक्षाचा मार्ग खुला होतो अशी मान्यता आहे. म्हणूनच या पौर्णिमेला शास्त्रात मोक्षदायिनी म्हटले आहे. चला तर मग जाणून घेऊयात मार्गशीर्ष पौर्णिमेची तिथी, शुभ मुहूर्त, उपासना पद्धती आणि महत्त्व याबद्दल येथे जाणून घ्या.

या दिवशी श्री नारायण आणि माता लक्ष्मीची मनोभावे पूजा केल्यानेच मोक्षाचा मार्ग खुला होतो, अशी मान्यता आहे. पौर्णिमेच्या रात्री, चंद्र त्याच्या 16 चरणांसह पूर्ण होतो. या दिवशी उपवास केल्याने कुंडलीतील चंद्राची स्थिती सुधारते आणि मानसिक तणाव आणि अशांततेपासून मुक्ती मिळते. या वर्षी मार्गशीर्ष पौर्णिमा तिथी शनिवार, १८ डिसेंबर रोजी येत आहे.

हा आहे शुभ काळ हिंदू कॅलेंडरनुसार, मार्गशीर्ष पौर्णिमा शनिवार, 18 डिसेंबर रोजी सकाळी 07.24 पासून सुरू होईल आणि दुसर्‍या दिवशी, 19 डिसेंबर, रविवारी सकाळी 10.05 पर्यंत चालू राहील. 18 डिसेंबर रोजी सकाळी 09.13 पर्यंत साध्य योग आहे, त्यानंतर शुभ योग सुरू होईल.

पूजा पद्धत मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी सकाळी भगवान नारायणाचे ध्यान करा आणि उपवासाचे व्रत घ्या. आंघोळीच्या वेळी पाण्यात थोडे गंगेचे पाणी आणि तुळशीची पाने टाकून ते पाणी डोक्याला लावून भगवंताचे स्मरण करून पूजा करा. त्यानंतर लक्ष्मीसोबत श्रीहरीचे चित्र स्थापित करा. त्यांचे स्मरण करून मग रोळी, चंदन, फुले, फळे, प्रसाद, अक्षत, धूप, दिवा इत्यादी अर्पण करा. यानंतर पूजेच्या ठिकाणी अग्नी प्रज्वलित करावा. यानंतर ‘ओम नमो भगवते वसु देवाय नम: स्वाहा इदं वसु देवाय इदम नम’ म्हणत हवन सामग्रीसह 11, 21, 51, किंवा 108 आहुती द्या. हवन संपल्यानंतर देवाचे ध्यान करावे. तुमच्या चुकीबद्दल त्यांची माफी मागा.

पूजेनंतर दान करावे पूजेनंतर आपल्या क्षमतेनुसार दान करावे. जर कुंडलीत चंद्राची स्थिती कमजोर असेल तर या दिवशी दूध, खीर, तांदूळ, मोती इत्यादी पांढर्‍या वस्तूंचे दान करावे.

मार्गशीर्ष पौर्णिमेचे महत्त्व मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी केलेले शुभ कार्य ३२ पट फल देते, म्हणून याला बत्तीसी पौर्णिमा असेही म्हणतात. ही तिथी देवी लक्ष्मीलाही खूप प्रिय आहे. या दिवशी देवी लक्ष्मीला खीर अर्पण करावी.

टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ते येथे मांडले आहे.

संबंधित बातम्या

Astro Tips For Friday | शुक्रवारी हे 4 उपाय कराच, धनलाभ नक्की होणार

Flat Vastu Rules | नवीन वर्षात घर घेताय? मग हे वास्तू नियम लक्षात ठेवा भरभराट नक्की होणार

Chanakya Niti | भरपूर पैसा, सुखी आयुष्याच्या शोधात आहात, मग आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या 5 गोष्टी कधी विसरु नका

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.