AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lord Vishnu Birth | भगवान विष्णूंचा जन्म कसा झाला, गुरुवारी नारायणाची पूजा कशी करावी जाणून घ्या

हिंदू धर्मात भगवान विष्णूच्या पूजेसाठी गुरुवार हा दिवस खूप खास मानला जातो. मान्यता आहे की भगवान विष्णूची खऱ्या मनाने पूजा करणाऱ्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. हिंदू धर्मग्रंथानुसार गुरुवारी भगवान विष्णूची पूजा केल्यास व्यक्ती जीवनातील सर्व त्रासांपासून मुक्त होतो

Lord Vishnu Birth | भगवान विष्णूंचा जन्म कसा झाला, गुरुवारी नारायणाची पूजा कशी करावी जाणून घ्या
lord vishnu
| Edited By: | Updated on: Jul 15, 2021 | 3:01 PM
Share

मुंबई : हिंदू धर्मात भगवान विष्णूच्या पूजेसाठी गुरुवार हा दिवस खूप खास मानला जातो. मान्यता आहे की भगवान विष्णूची खऱ्या मनाने पूजा करणाऱ्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. हिंदू धर्मग्रंथानुसार गुरुवारी भगवान विष्णूची पूजा केल्यास व्यक्ती जीवनातील सर्व त्रासांपासून मुक्त होतो (Know The Story Behind Lord Vishnu Birth And How To Worship Vishnu).

भगवान विष्णूला जगाचे पालनकर्ता मानले जाते. मान्यता आहे की जर भाविकांनी गुरुवारी विष्णूची विधीवत पूजा केली आणि गुरुवारी काही उपाय केले तर त्यांच्या जीवनात कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवत नाही. भगवान विष्णूची उत्पत्ती कशी झाली आणि त्यांची पूजा कशी करावी हे जाणून घ्या –

विष्णूची पूजा कशी करावी?

? सर्वप्रथम गुरुवारी सूर्योदय होण्यापूर्वी सकाळी लवकर उठा. त्यानंतर आंघोळ करा आणि स्वच्छ कपडे घाला.

? एका पाटावर स्वच्छ कपडा घाला आणि त्यावर भगवान विष्णूची मूर्ती स्थापित करा.

? विष्णूजींना पिवळ्या गोष्टी खूप प्रिय आहेत. म्हणून भगवान विष्णूला पिवळे फुले आणि पिवळी फळे अर्पण करा.

? यानंतर भगवान विष्णूला धूप आणि दीप दाखवा. विष्णूजींची आरती करा.

? गुरुवारी केळीच्या झाडाच्या पूजेचंही विशेष महत्त्व आहे. म्हणून या दिवशी केळीच्या झाडाची पूजा करावी.

विष्णूची उत्पत्ती कशी झाली?

शिव पुराणानुसार भगवान शिव यांनीच भगवान विष्णूंची निर्मिती केली. एकदा शिवने पार्वतीला सांगितले की एक माणूस असावा जो विश्वाची देखभाल करेल. शक्तीच्या सामर्थ्याने विष्णू प्रकट झाले. ते अद्वितीय होते. ते कमळांसारखे नेत्र, चतुर्भुजी आणि कौस्तुकामणीने सुशोभित होते. सर्वत्र व्यापक असल्यामुळे त्यांचे नाव विष्णू पडले. पौराणिक कथेनुसार, भगवान शंकर म्हणाले की, मी तुम्हाला फक्त लोकांना आनंद देण्यासाठीच निर्माण केले आहे. कार्य सिद्धीसाठी तुम्ही तपश्चर्या करा.

विष्णूजींनी तपश्चर्या केली. पण, शंकरजींचे दर्शन झाले नाही. त्यांनी पुन्हा तपश्चर्या केली, तेव्हा त्यांनी पाहिलं की त्याच्या शरीरातून पाण्याचे अनेक प्रवाह वाहात होते. सर्वत्र पाणी-पाणी झाले होते. तेव्हा त्यांचे एक नाव नारायण पडले. सर्व घटक त्याच्यापासून उत्पन्न झाले. पौराणिक कथेनुसार, प्रथम निसर्गाचा उगम झाला. त्यानंतर सत, रज आणि तम हे तीन गुण आले. यानंतर, शब्द, स्पर्श, रुप, रस आणि गंध यांचा उगम झाला. मग पंचभूताचा जन्म झाला.

Know The Story Behind Lord Vishnu Birth And How To Worship Vishnu

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Skanda Sashti 2021 : आषाढ महिन्यातील स्कंद षष्ठी, जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजेची पद्धत आणि महत्व

मनुष्यच नाही तर देवी-देवताही चुका करतात, ती कुठली चूक होती ज्यामुळे यमराजला पृथ्वीवर जन्म घ्यावा लागला होता

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.