AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवरात्रीमध्ये घरातील झाडू बदल्यास घडेल चमत्कार, जाणून घ्या त्यामागचं रहस्य

नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर घरातील झाडू बदलण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे, नवरात्रीला झाडू बदलने ही केवळ एक प्रथा नाहीये, तर यामुळे घरात सकारात्मक ऊर्जेची निर्मिती होते, असं मानलं जातं.

नवरात्रीमध्ये घरातील झाडू बदल्यास घडेल चमत्कार, जाणून घ्या त्यामागचं रहस्य
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 27, 2025 | 7:36 PM
Share

नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर घरातील झाडू बदलण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे, नवरात्रीला झाडू बदलने ही केवळ एक प्रथा नाहीये, तर यामुळे घरात सकारात्मक ऊर्जेची निर्मिती होते, तसेच माता लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव आपल्यासोबत राहातो. वास्तू तज्ज्ञ आणि धार्मिक विद्वानांच्या मते नवरात्रीच्या दिवसांत झाडू बदलल्यामुळे घरात सुख, शांती आणि समृद्धी येते, तसेच उत्तम आरोग्य लाभतं.

घरातील साफसफाई आणि ऊर्जेचा संबंध

नवरात्रीच्या दिवसांमध्ये घरातील साफसफाईचं विशेष महत्त्व आहे. त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते, लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळतो, घरातील सर्व प्रकारच्या अडचणी दूर होतात. जुन्या झाडूमध्ये वर्षभर नकारात्मक ऊर्जा जमा होते, त्यामुळे त्या झाडूला बदललं जातं, नवरात्रीमध्ये घरात नवीन झाडू खरेदी केला जातो. आता नवरात्रीमध्ये झाडू कधी बदलावा? असा प्रश्नही अनेकांना पडतो. तर याचं उत्तर म्हणजे अमावस्या किंवा शनिवारी झाडू बदललं किंवा घरात नवीन झाडू आणणं हे शुभ मानलं जातं. या दिवशी घरात नवीन झाडू आणल्यास घरातील गरिबी दूर होते, घरात सुख, शांती, समृद्धी आणि धनाचं आगमन होतो. सोबतच कुटुंबातील व्यक्तींना उत्तम आरोग्य लाभतं.

नवीन झाडू कधी खरेदी करावा?

धर्मशास्त्रानुसार नवरात्रीमध्ये झाडू बदलनं हे अत्यंत शुभ मानलं जातं. झाडू बदलल्यामुळे घरात सुख, शांती आणि समृद्धी येते. झाडू हा अमावस्येला किंवा शनिवारी खरेदी करावा तसेच तो सकाळी खरेदी करू नये तर सायंकाळच्या वेळी खरेदी करावा असं वास्तुशास्त्र सांगतं, जुना झाडू बदलल्यामुळे तुमच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, तर नव्या झाडूसोबत घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते असं मानलं जातं. त्यामुळे नवरात्रीला झाडू बदलण्याची प्रथा आहे, वास्तुशास्त्र आणि धर्मशास्त्रामध्ये देखील याचे अनेक फायदे सांगण्यात आले आहेत.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच आंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.