AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रयागराजच्या या पाच पवित्र घाटांवर स्नान करतील साधू आणि ऋषीमुनी, जाणून घ्या या पवित्र घाटांचे महत्त्व

प्रयागराज भारतातील सर्वात पवित्र शहरांपैकी एक आहे. जिथे गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्यांचा संगम आहे. हे शहर धार्मिक महत्त्वासाठी ओळखले जाते आणि येथे दर बारा वर्षांनी महा कुंभमेळा भरतो. महा कुंभमेळ्याच्या काळात देश विदेशातून लाखो भाविक येथे येतात आणि या पवित्र घाटांवर स्नान करतात. प्रयागराजच्या त्या पाच पवित्र घाटाबद्दल जाणून घेऊन जिथे संत आणि ऋषींची प्रचंड गर्दी असते.

प्रयागराजच्या या पाच पवित्र घाटांवर स्नान करतील साधू आणि ऋषीमुनी, जाणून घ्या या पवित्र घाटांचे महत्त्व
| Edited By: | Updated on: Jan 01, 2025 | 3:56 PM
Share

13 जानेवारीपासून प्रयागराजमध्ये महा कुंभ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कुंभमेळा 45 दिवस चालणार आहे. यामध्ये सहा शाही स्नान होणार आहेत. पौष पौर्णिमेला पहिले शाही स्नान होईल. तर 26 फेब्रुवारीला शेवटच्या शाही स्नानाने महा कुंभाची सांगता होणार आहे. महा कुंभाच्या वेळी भाविक आणि संतांचा मोठा मेळावा भरणार आहे. प्रयागराजच्या पाच प्रमुख घाटांबद्दल जाणून घेऊया जिथे शाही स्नान केले जाणार आहे.

संगम घाट

हा घाट प्रयागराजचा सर्वात पवित्र घाट मानला जातो. संगम म्हणजे गंगा, यमुना आणि सरस्वती यांचा संगम. यामुळेच लोक याला त्रिवेणी घाट या नावाने ओळखतात. असे मानले जाते की जो कोणी या ठिकाणी श्रद्धेने स्नान करेल त्याची सर्व पाप नष्ट होतात. संगम घाटावर श्रद्धेने स्नान करणाऱ्यांना अलौकिक अनुभव मिळतो असे देखील मानले जाते.

अराइल घाट

अध्यात्माच्या मार्गावर असणारे लोक या घाटावर येतात. त्यामुळे या घाटावर भाविकांची संख्या कमी असते. ध्यान, प्रगती आणि योगाच्या दृष्टीने हा घाट अतिशय खास आहे. एवढेच नाही तर या घाटावर स्नान करणाऱ्यांना शुभ फळ मिळते. ज्यांना गर्दी पासून दूर राहायला आवडते त्यांच्यासाठी हा घाट अतिशय उत्तम आहे.

रामघाट

हा घाट ऐतिहासिक आहे. या घाटावर होणारी सायंकाळची आरती भाविकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. स्नान करण्यासोबतच येथे बोटिंगचा आनंद घेता येतो. हा घाट संगम घाटाच्या अगदी जवळ आहे. हा घाट संगम घाटासारखा प्रसिद्ध आहे.

दशाश्वमेध घाट

याचे नाव अश्वमेध यज्ञाशी संबंधित असल्याचे सांगितले जाते. अश्वमेध यज्ञ हा तोच यज्ञ मानला जातो जो राजा भगीरत यांनी गंगा पृथ्वीवर आणण्यासाठी केला होता. त्यामुळेच प्रयागराजच्या प्रमुख घाटांमध्ये या घाटाची गणना केली जाते. या ठिकाणी श्रद्धेने स्नान करण्यासाठी भाविक जात असतात.

लक्ष्मी घाट

या घाटावर सांस्कृतिक उपक्रम राबवले जातात. या घाटावर संपत्ती आणि समृद्धीचे देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. महा कुंभमेळ्याच्या काळातही भाविक या घाटावर पूजा करताना दिसतात. संगम सह सर्व घाट संत भक्तांच्या गर्दीने गजबजलेले असतात. येथे संत आणि भक्त स्नान करतात. असे मानले जाते की महा कुंभमेळ्याच्या वेळी पवित्र नद्यांचे पाणी अमृत होते. त्यामुळेच संत भक्त महा कुंभमेळ्याच्या वेळी घाटावर श्रद्धेने स्नान करताना दिसतात.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.
शहरातही आता चुलींना मागणी वाढली, गॅस सिलिंडर टंचाईवर शोधला उपाय
शहरातही आता चुलींना मागणी वाढली, गॅस सिलिंडर टंचाईवर शोधला उपाय.
खरातवर आणखी दोन गुन्हे दाखल, एकूण गुन्ह्यांची संख्या १०, हवाला रॅकेट..
खरातवर आणखी दोन गुन्हे दाखल, एकूण गुन्ह्यांची संख्या १०, हवाला रॅकेट...
रुपाली चाकणकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार ? काय म्हणाल्या अंधारे?
रुपाली चाकणकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार ? काय म्हणाल्या अंधारे?.
'ऑल पार्टी मिटींगला जे उपस्थित नाहीत ते...', राऊत यांची मोदींवर टीका
'ऑल पार्टी मिटींगला जे उपस्थित नाहीत ते...', राऊत यांची मोदींवर टीका.
रत्नागिरीत अवकाळी पावसाचा आंब्यांना फटका, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
रत्नागिरीत अवकाळी पावसाचा आंब्यांना फटका, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान.
'कर्माचे फळ...,' चाकणकरांच्या राजीनाम्यावर दमानिया यांची प्रतिक्रीया
'कर्माचे फळ...,' चाकणकरांच्या राजीनाम्यावर दमानिया यांची प्रतिक्रीया.
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही.
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?.