AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिवाळीमध्ये शिवलिंगावर ‘या’ वस्तू करा अर्पण, भगवान शंकर प्रसन्न होताच सर्व दुःख होतील दूर

दिवाळी हा सण खूप शुभ मानला जातो. या खास प्रसंगी, धनाची देवी लक्ष्मीदेवी आणि भगवान गणेश यांची पूजा केली जाते. अशातच तुम्ही दिवाळीत शिवलिंगावर जर या गोष्टी अर्पण केल्या तर तुमची सर्व दु:ख दूर होतील.

दिवाळीमध्ये  शिवलिंगावर 'या' वस्तू करा अर्पण, भगवान शंकर प्रसन्न होताच सर्व दुःख होतील दूर
Shivling
| Edited By: | Updated on: Oct 18, 2025 | 11:32 PM
Share

दिवाळीचा सण हा कार्तिक महिन्याच्या अमावस्येच्या दिवशी सुरू होतो. त्यात दिवाळी हा सण मोठ्या उत्साहात संपूर्ण देशभरात साजरा केला जातो. धार्मिक श्रद्धेनुसार या दिवशी लक्ष्मी देवी आणि विघ्नहर्ता गणपती बाप्पाची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि आपल्या जीवनात आनंद आणि शांती मिळते. तर दिवाळीच्या या शुभ दिवशी शिवलिंगावर अभिषेक करणे शुभ मानले जाते.

दिवाळीच्या या शुभ दिवसांमध्ये जर तुम्हालाही महादेवाचा आशीर्वाद घ्यायचा असेल , तर सकाळी स्नान केल्यानंतर शिवलिंगाचा अभिषेक करा. असे मानले जाते की या विधीमुळे महादेवाच्या आशीर्वादाने समस्या दूर होतात. चला तर मग आजच्या लेखात जाणून घेऊयात दिवाळीत शिवलिंगाचा अभिषेक करताना कोणत्या वस्तू अर्पण कराव्यात.

मानसिक ताण दूर होईल

मानसिक ताण कमी करण्यासाठी दिवाळीच्या दिवशी महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवलिंगावर गंगाजल किंवा दुधाने अभिषेक करा. असे मानले जाते की हा उपाय मानसिक ताण कमी करतो आणि भगवान शंकर यांच्या आशीर्वादाने जीवनात आनंद आणि शांती निर्माण होते.

समस्या दुर होऊन अडकलेली कामे पूर्ण होतील

दिवाळीच्या दिवशी शिवलिंगाला पांढरे फुले अर्पण करा आणि शंकर महादेवांच्या मंत्रांचा जप करा. धार्मिक श्रद्धेनुसार हे उपाय तुमच्या जीवनात आनंद आणि शांती आणते. शिवाय महादेवाच्या कृपेने तुमच्या जीवनात उद्भवणाऱ्या कोणत्याही समस्या दूर होतील तसेच अडकून राहीलेली कामे पुर्ण होतील.

आर्थिक अडचणी दूर होतील

तुम्हाला जर आर्थिक अडचणी येत असतील तर दिवाळीच्या दिवशी शिवलिंगावर तांदूळ अर्पण करा. असा विश्वास आहे की या उपायाने आर्थिक समस्या दूर होण्यास आणि आर्थिक लाभ होण्यास मदत होते.

संतान प्राप्तीचे सुख मिळेल

संतती प्राप्तीसाठी शिवलिंगावर गहू अर्पण करा. धार्मिक श्रद्धेनुसार हा उपाय घरात व तुमच्या जीवनात सुख आणि समृद्धी आणते असे मानले जाते.

दिवाळी कधी आहे (दिवाळी २०२५ तारीख)

वैदिक कॅलेंडरनुसार कार्तिक महिन्यातील अमावस्येची तारीख 20 ऑक्टोबर रोजी पहाटे 3 वाजून 44 मिनिटांनी सुरू होईल. ते 21 ऑक्टोबर रोजी पहाटे 5 वाजून 54 मिनिटांनी अमावस्या संपेल. त्यामुळे दिवाळी 20 ऑक्टोबर रोजी साजरी केली जाईल.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; 'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही'
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा
कंगनाने वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
कंगना रणौतची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी भेट
साठ्ये महाविद्यालयाबाहेर मनविसे-एबीविपी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये नोंदणी मोहिमेवरून मनविसे आणि एबीविपीत वाद
भारताचा पाकिस्तानवर ५-३ असा दणदणीत विजय
भारताने पाकिस्तानला हरवून हॉकी वर्ल्डकपच्या नॉकआउटमध्ये स्थान मिळवले
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या; पोलिसांकडे तक्रार
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या: युवक काँग्रेसची पोलिसांकडे तक्रार
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर,
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर, काय म्हणाले?