AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिवाळीमध्ये शिवलिंगावर ‘या’ वस्तू करा अर्पण, भगवान शंकर प्रसन्न होताच सर्व दुःख होतील दूर

दिवाळी हा सण खूप शुभ मानला जातो. या खास प्रसंगी, धनाची देवी लक्ष्मीदेवी आणि भगवान गणेश यांची पूजा केली जाते. अशातच तुम्ही दिवाळीत शिवलिंगावर जर या गोष्टी अर्पण केल्या तर तुमची सर्व दु:ख दूर होतील.

दिवाळीमध्ये  शिवलिंगावर 'या' वस्तू करा अर्पण, भगवान शंकर प्रसन्न होताच सर्व दुःख होतील दूर
Shivling
| Edited By: | Updated on: Oct 18, 2025 | 11:32 PM
Share

दिवाळीचा सण हा कार्तिक महिन्याच्या अमावस्येच्या दिवशी सुरू होतो. त्यात दिवाळी हा सण मोठ्या उत्साहात संपूर्ण देशभरात साजरा केला जातो. धार्मिक श्रद्धेनुसार या दिवशी लक्ष्मी देवी आणि विघ्नहर्ता गणपती बाप्पाची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि आपल्या जीवनात आनंद आणि शांती मिळते. तर दिवाळीच्या या शुभ दिवशी शिवलिंगावर अभिषेक करणे शुभ मानले जाते.

दिवाळीच्या या शुभ दिवसांमध्ये जर तुम्हालाही महादेवाचा आशीर्वाद घ्यायचा असेल , तर सकाळी स्नान केल्यानंतर शिवलिंगाचा अभिषेक करा. असे मानले जाते की या विधीमुळे महादेवाच्या आशीर्वादाने समस्या दूर होतात. चला तर मग आजच्या लेखात जाणून घेऊयात दिवाळीत शिवलिंगाचा अभिषेक करताना कोणत्या वस्तू अर्पण कराव्यात.

मानसिक ताण दूर होईल

मानसिक ताण कमी करण्यासाठी दिवाळीच्या दिवशी महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवलिंगावर गंगाजल किंवा दुधाने अभिषेक करा. असे मानले जाते की हा उपाय मानसिक ताण कमी करतो आणि भगवान शंकर यांच्या आशीर्वादाने जीवनात आनंद आणि शांती निर्माण होते.

समस्या दुर होऊन अडकलेली कामे पूर्ण होतील

दिवाळीच्या दिवशी शिवलिंगाला पांढरे फुले अर्पण करा आणि शंकर महादेवांच्या मंत्रांचा जप करा. धार्मिक श्रद्धेनुसार हे उपाय तुमच्या जीवनात आनंद आणि शांती आणते. शिवाय महादेवाच्या कृपेने तुमच्या जीवनात उद्भवणाऱ्या कोणत्याही समस्या दूर होतील तसेच अडकून राहीलेली कामे पुर्ण होतील.

आर्थिक अडचणी दूर होतील

तुम्हाला जर आर्थिक अडचणी येत असतील तर दिवाळीच्या दिवशी शिवलिंगावर तांदूळ अर्पण करा. असा विश्वास आहे की या उपायाने आर्थिक समस्या दूर होण्यास आणि आर्थिक लाभ होण्यास मदत होते.

संतान प्राप्तीचे सुख मिळेल

संतती प्राप्तीसाठी शिवलिंगावर गहू अर्पण करा. धार्मिक श्रद्धेनुसार हा उपाय घरात व तुमच्या जीवनात सुख आणि समृद्धी आणते असे मानले जाते.

दिवाळी कधी आहे (दिवाळी २०२५ तारीख)

वैदिक कॅलेंडरनुसार कार्तिक महिन्यातील अमावस्येची तारीख 20 ऑक्टोबर रोजी पहाटे 3 वाजून 44 मिनिटांनी सुरू होईल. ते 21 ऑक्टोबर रोजी पहाटे 5 वाजून 54 मिनिटांनी अमावस्या संपेल. त्यामुळे दिवाळी 20 ऑक्टोबर रोजी साजरी केली जाईल.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.