AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अकाली मृत्यूला घाबरताय? ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा, जाणून घ्या 6 आश्चर्यकारक फायदे

ओम नमः शिवाय हा मंत्र भगवान शिवाला समर्पित आहे. हा मंत्र सर्वात शक्तिशाली मंत्रांपैकी एक मानला जातो. ओम हा विश्वाचा नाद मानला जातो. ब्रम्हांडामधील आवाज ऐकल्यानंतर ओम हा ध्वनी स्पष्टपणे ऐकू येतो असे विज्ञानाने सुद्धा मानले आहे.

अकाली मृत्यूला घाबरताय? ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा, जाणून घ्या 6 आश्चर्यकारक फायदे
om
| Edited By: | Updated on: Nov 07, 2021 | 11:53 AM
Share

मुंबई : ओम नमः शिवाय हा मंत्र भगवान शिवाला समर्पित आहे. हा मंत्र सर्वात शक्तिशाली मंत्रांपैकी एक मानला जातो. ओम हा विश्वाचा नाद मानला जातो. ब्रम्हांडामधील आवाज ऐकल्यानंतर ओम हा ध्वनी स्पष्टपणे ऐकू येतो असे विज्ञानाने सुद्धा मानले आहे. यामंत्राचे बहूमुल्य असे फायदे आहेत. चला जाणून घेऊया या मंत्राचा जप करण्याचे फायदे.

ओम नमः शिवाय हा भगवान शिवाच्या सर्वाधिक जपल्या जाणार्‍या मंत्रांपैकी एक आहे. हा मंत्र भगवान शिवाला समर्पित आहे ज्यांना महादेव म्हणूनही ओळखले जाते. शिव परंपरेनुसार भगवान शिव हे सर्वोच्च भगवान आहेत. ज्याच्याकडे विश्व निर्माण करण्याची, संरक्षित करण्याची आणि बदलण्याची शक्ती आहे.

ओम नमः शिवाय याचा अर्थ काय?

ओम हा विश्वाचा नाद मानला जातो. या शब्दाचा अर्थ प्रेम आणि शांतता. ‘नमः’ आणि ‘शिवाय’ यांचा एकत्रित अर्थ म्हणजे पृथ्वी, जल, अग्नि, वायू आणि आकाश हे पाच घटक. असे मानले जाते की हे पाच घटक या जगात उपस्थित असलेल्या प्रत्येक सृष्टीचे मुख्य घटक आहेत. भगवान शिव हे पाचही तत्वांचे स्वामी मानले जातात.

ओम नमः शिवाय जप करण्याचे फायदे

वर्षानुवर्षे लोक देवाला प्रार्थना म्हणून हा मंत्र जपत आहेत. चला जाणून घेऊया या मंत्राचा जप केल्याने कोणते फायदे होतात.

सर्वत्र आनंद

‘ओम नमः शिवाय’ हा जप पर्यावरणातील पाच घटकांमध्ये सुसंवाद साधतो, असे या तज्ज्ञाने सांगितले. त्याचा दररोज जप केल्याने सर्व 5 घटकांमध्ये शांती, प्रेम आणि सुसंवाद प्राप्त होतो. म्हणून, जर जेव्हा तुम्ही या मंत्राचा जप करता तेव्हा तुम्हाला केवळ तुमच्या आतच नाही तर तुमच्या आजूबाजूलाही आनंद वाटतो.

नकारात्मकता दूर करते

ओम नमः शिवाय तुमच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यास मदत करते. जेव्हा तुम्ही या मंत्राचा जप करता तेव्हा तुम्ही तुमच्या सभोवतालची सर्व नकारात्मक ऊर्जा काढून टाकता आणि सकारात्मकता आकर्षित करता.

शांत होण्यास मदत होते

ज्या दिवशी तुम्हाला खूप तणाव वाटत असेल त्या दिवशी तुम्ही ‘ओम नमः शिवाय’ या मंत्राचा जप करावा. हे तणावमुक्तीचे काम करते आणि तुमचे मन शांत करते. आराम करण्यास मदत करते.

तुम्हाला इंद्रियांवर नियंत्रण देते

ओम नमः शिवाय हा शक्तिशाली मंत्र आहे. त्याचा जप केल्याने तुम्हाला तुमच्या इंद्रियांवर ताबा मिळण्यास मदत होते. हे तुम्हाला तुमच्या जीवनासाठी दिशा देते आणि तुम्हाला स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करते.

ग्रहांचा नकारात्मक प्रभाव कमी होतो

‘ओम नमः शिवाय’ चा जप केल्याने तुम्ही ग्रहांचे नकारात्मक प्रभाव काही प्रमाणात कमी करू शकता.

अकाली मृत्यूची भीती दूर करते

अनेक लोक अकाली मृत्यूला घाबरतात. या मंत्राचा जप केल्याने ही भीती तर दूर होतेच पण अकाली मृत्यूची शक्यताही कमी होते.

ओम नमः शिवाय मंत्र कसा आणि केव्हा जपायचा?

हा मंत्र म्हणण्यापूर्वी स्नान करावे. पण दिवसाच्या कोणत्याही प्रहरात तुम्ही या मंत्राचा जप करू शकता. भगवान शिवाच्या मंत्राचा जप करण्याचा सर्वोत्तम काळ म्हणजे सूर्योदय आणि सूर्यास्त. मंत्राचा जप एकतर शांतपणे किंवा मनात मोठ्याने करावा. तुम्ही मंत्राचा जप तुम्हाला पाहिजे तितक्या वेळा करू शकता, उत्तम परिणामांसाठी तो किमान 108 वेळा जपला पाहिजे. ओम नमः शिवाय मंत्राचा जप तुमच्या कार्यालयात किंवा घरात कुठेही करता येतो. जप करताना तुम्ही सरळ स्थितीत बसल्याची खात्री करा.

टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ते येथे मांडले आहे.

शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.