AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महिलांनी मासिक पाळीत तीर्थयात्रा करावी का? प्रेमानंद महाराजांनी दिलं मोठं उत्तर

मासिक पाळीमध्ये महिलांनी मंदिरामध्ये प्रवेश करावा की नाही? प्रेमानंद महाराजांनी थेट सांगूनच टाकलं. जाणून घ्या सविस्तर

महिलांनी मासिक पाळीत तीर्थयात्रा करावी का? प्रेमानंद महाराजांनी दिलं मोठं उत्तर
Image Credit source: Social media
| Updated on: Apr 07, 2026 | 5:25 PM
Share

Premanand Maharaj : मासिक पाळी (पीरियड्स) आणि महिलांच्या मंदिरप्रवेशाबाबत समाजात अनेक वर्षांपासून विविध समज-गैरसमज प्रचलित आहेत. पारंपरिक दृष्टिकोनानुसार, या काळात महिलांनी पूजा-पाठ किंवा मंदिरात जाणं टाळावं अशी धारणा होती. मात्र, अनेक विद्वानांच्या मते ही प्रथा धार्मिक ग्रंथांपेक्षा सामाजिक परंपरांमधून निर्माण झाली आहे.

याच संदर्भात एका महिला भक्ताने प्रेमानंद महाराज यांना प्रश्न विचारला. ती म्हणाली की, अनेक महिलांना तीर्थयात्रेदरम्यान मासिक पाळी सुरू होते. अशा वेळी त्यांनी दर्शन घ्यावं का टाळावं याबाबत संभ्रम निर्माण होतो. यावर उत्तर देताना प्रेमानंद महाराज यांनी स्पष्ट सांगितलं की, मासिक पाळी ही शरीराची नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि त्यासाठी महिलांनी धार्मिक अनुभवापासून पूर्णपणे दूर राहण्याची गरज नाही.

त्यांच्या मते, जर अशा परिस्थितीत पुन्हा त्या तीर्थस्थळी जाणं शक्य नसेल तर महिलांनी स्नान करून, प्रसाद, चंदन किंवा पवित्र जल शिंपडून श्रद्धेने दूरून दर्शन घ्यावं. मात्र, परंपरांचा आदर राखत मंदिरातील वस्तूंना स्पर्श टाळावा.

ही निंदनीय नाही तर स्वीकारण्यासारखी गोष्ट

प्रेमानंद महाराजांनी पुढे सांगितलं की, मासिक पाळी ही कोणतीही निंदनीय गोष्ट नसून ती स्वीकारण्यासारखी नैसर्गिक प्रक्रिया आहे. काही पौराणिक मान्यतांनुसार, देवेंद्राने वृत्रासुराचा वध केल्यानंतर लागलेल्या दोषाचे चार भाग करण्यात आले होते. त्यातील एक भाग स्त्रियांनी स्वीकारला, ज्याला मासिक पाळी मानलं जातं.

या कथेनुसार, ही प्रक्रिया अपवित्रतेचं नाही तर त्याग आणि सहनशीलतेचं प्रतीक मानलं जाते. प्रेमानंद महाराज यांनी स्पष्ट केलं की, महिलांना अशा कारणामुळे पूर्णपणे धार्मिक लाभांपासून वंचित ठेवणं योग्य नाही. त्यांनी सांगितलं की, परिस्थितीनुसार महिलांनी स्वतःची स्वच्छता राखून, नियमांचं पालन करत दूरून दर्शन घेणं हा देखील एक प्रकारचा आध्यात्मिक अनुभव आहे.

आजच्या काळात या विषयावर नव्याने विचार करण्याची गरज आहे. श्रद्धा आणि परंपरा यामध्ये संतुलन राखत महिलांना त्यांच्या श्रद्धेनुसार निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य मिळणं आवश्यक आहे. मासिक पाळी ही एक नैसर्गिक प्रक्रिया असून, त्याला अपवित्रतेशी जोडण्याऐवजी संवेदनशील आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहणं गरजेचं आहे.

Follow Us
काँग्रेस उमेदवार मागे घेण्यास तयार पण...त्या एका अटीमुळे......
काँग्रेस उमेदवार मागे घेण्यास तयार पण...त्या एका अटीमुळे.......
मुंबई मेट्रोची नववी मार्गिका आजपासून प्रवाशांच्या सेवेत, CM फडणवीसांनी
मुंबई मेट्रोची नववी मार्गिका आजपासून प्रवाशांच्या सेवेत, CM फडणवीसांनी.
काँग्रेसचा डाऊनफॉल? पार्थ पवारांचा उल्लेख आणि विरोधकांचे प्रत्युत्तर
काँग्रेसचा डाऊनफॉल? पार्थ पवारांचा उल्लेख आणि विरोधकांचे प्रत्युत्तर.
तर आम्हीही जशास तसे उत्तर देऊ; सुरज चव्हाणांचा काँग्रेसला इशारा
तर आम्हीही जशास तसे उत्तर देऊ; सुरज चव्हाणांचा काँग्रेसला इशारा.
ऐन परीक्षेच्या काळात शिक्षकांचं आंदोलन, परीक्षांवर होणार परिणाम?
ऐन परीक्षेच्या काळात शिक्षकांचं आंदोलन, परीक्षांवर होणार परिणाम?.
पार्थ पवार यांच्या विधानावर सुप्रिया सुळेंचं एका वाक्यात उत्तर
पार्थ पवार यांच्या विधानावर सुप्रिया सुळेंचं एका वाक्यात उत्तर.
केवढा हा माज? झुकती है दुनिया झुकानेवाला चाहिए... चौकशीदरम्यान खरातची
केवढा हा माज? झुकती है दुनिया झुकानेवाला चाहिए... चौकशीदरम्यान खरातची.
भाजपच्या दहशतीला घाबरत नाही इथे लोकशाही आहे, ट्रम्पशाही नाही
भाजपच्या दहशतीला घाबरत नाही इथे लोकशाही आहे, ट्रम्पशाही नाही.
लक्ष्मण जगतापांच्या निधनानंतर अजित पवारांनी निवडणुक लढवलीच, मग आता...
लक्ष्मण जगतापांच्या निधनानंतर अजित पवारांनी निवडणुक लढवलीच, मग आता....
जालना व्हायरल व्हिडिओमागचं सत्य समोर; ज्वालामुखी नव्हे तर विद्युत.....
जालना व्हायरल व्हिडिओमागचं सत्य समोर; ज्वालामुखी नव्हे तर विद्युत......