AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raksha Bandhan 2022: रक्षा बंधनाचा मुहूर्त चुकला? केव्हा बांधता येईल राखी?

12 ऑगस्टला राखीचा शुभ मुहूर्त फार कमी काळासाठी होता, तर असे बरेच जण  असतील ज्यांनी हा शुभ मुहूर्त गमावला असेल. तुमच्यासोबतही असेच काही घडले असेल तर तुम्हाला फार काळजी करण्याची गरज नाही. रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त संपल्यानंतर तुम्ही राखी कधी बांधू शकता याबद्दल जाणून घेऊया.

Raksha Bandhan 2022: रक्षा बंधनाचा मुहूर्त चुकला? केव्हा बांधता येईल राखी?
| Updated on: Aug 12, 2022 | 6:26 PM
Share

रक्षाबंधन (Raksha bandhan 2022) हा सण भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक मानला जातो. या दिवशी बहिणी भावाच्या मनगटावर रेशीमधागा बांधून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात, मात्र यंदा रक्षाबंधनाच्या सणाबाबत लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. रक्षाबंधन हा सण पौर्णिमेला साजरा केला जातो. अशा स्थितीत या वर्षी पौर्णिमा 11 ऑगस्ट रोजी सकाळी 10.37 वाजता सुरू झाली आणि आज म्हणजेच 12 ऑगस्ट रोजी सकाळी 7.06 वाजता संपली. भद्रा कालावधीमुळे 11 ऑगस्ट रोजी अनेकांनी राखी सण साजरा केला नाही. जेव्हा भाद्रा अधोलोकात असते तेव्हा अशा वेळी राखी बांधणे खूप शुभ मानले जाते. अशा स्थितीत 12 ऑगस्टलाच सकाळी अनेकांनी राखीचा सण साजरा केला. कारण 12 ऑगस्टला राखीचा शुभ मुहूर्त फार कमी काळासाठी होता, तर असे बरेच जण  असतील ज्यांनी हा शुभ मुहूर्त गमावला असेल. तुमच्यासोबतही असेच काही घडले असेल तर तुम्हाला फार काळजी करण्याची गरज नाही. रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त (Subha Muhurat) संपल्यानंतर तुम्ही राखी कधी बांधू शकता याबद्दल जाणून घेऊया.

  1. जोतिषतज्ञांच्या मते  जर तुम्हाला शुभ मुहूर्तावर राखी बांधता आली नसेल, तर त्यानंतरही तुम्ही तुमच्या भावाला राखी बांधू शकता. राहुकाळ वगळता  तुम्ही कोणत्याही शुभ मुहूर्तावर राखी बांधू शकता.
  2. प्रतिपदा ही पौर्णिमेच्या दुसर्‍या दिवशी असते, त्यामुळे यावेळी राखी बांधणे टाळावे. येत्या आठवड्यात 15 दिवसांच्या आत राखी बांधणे योग्य ठरेल.
  3. याशिवाय चतुर्थी,  शनिवार आणि मंगळवार या दिवशी राखी बंधने टाळावे.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.