AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sarasvati River : या कारणांमुळे विलुप्त झाली सरस्वती नदी, असे आहेत वेगवेगळे पैलू

सरस्वती (Sarasvati River Fact's) नदीबाबत अनेक प्रकारचे संभ्रम आहेत. काहींच्या मते सरस्वती नदी अदृश्यपणे वाहत प्रयागला पोहोचते आणि इथे आल्यावर गंगा आणि यमुनेचा संगम होतो.

Sarasvati River : या कारणांमुळे विलुप्त झाली सरस्वती नदी, असे आहेत वेगवेगळे पैलू
सरस्वती नदी प्रतिकात्मक फोटोImage Credit source: Social Media
| Updated on: May 02, 2023 | 2:27 PM
Share

मुंबई : त्रिवेणीचा संगम प्रयागमध्ये होतो असे मानले जाते. त्रिवेणी म्हणजे गंगा, यमुना आणि सरस्वती या तीन नद्या, प्रयाग येथे गंगा आणि यमुना यांची भेट सर्वांना दिसते, पण सरस्वती (Sarasvati River Fact’s) नदीबाबत अनेक प्रकारचे संभ्रम आहेत. काहींच्या मते सरस्वती नदी अदृश्यपणे वाहत प्रयागला पोहोचते आणि इथे आल्यावर गंगा आणि यमुनेचा संगम होतो, तर  काहींच्या मते सरस्वती नदी कोठेही अस्तित्वात नाही आणि ती केवळ एक पौराणिक संकल्पना आहे. अखेर या रहस्यमय नदीचे सत्य काय आहे ते जाणून घेऊया.

असे आहेत वेगवेगळे पैलू

सरस्वती खरोखरच प्रयागला पोहोचली आणि गंगा, यमुनेला मिळाली हा वैज्ञानिक दृष्टया जरी संशोधनाचा विषय असला तरी याला प्राचीन काळापासून त्रिवेणीला संगम का म्हणतात? हा प्रश्न न टाळता येण्यासारखा आहे. या नदीच्या काठावर ब्रह्मावर्त, कुरुक्षेत्र होते असे म्हणतात, पण आज तेथे जलाशय आहे.

असाही उल्लेख आहे की बलरामाने द्वारका ते मथुरा असा प्रवास सरस्वती नदीने केला होता आणि युद्धानंतर यादवांचे नश्वर अवशेष त्यात विसर्जित करण्यात आले होते, म्हणजे नदीला त्यामधून प्रवास करण्यासाठी पुरेसा प्रवाह होता. ऋग्वेदात सरस्वती नदीचे वर्णन ‘यमुनेच्या पूर्वेला’ आणि ‘सतलजच्या पश्चिमेला’ असे केले आहे.

पृथ्वीच्या अंतर्भागाच्या रचनेत झालेल्या बदलामुळे सरस्वती भूगर्भात गेल्याचे दिसून येते आणि हे नदीच्या प्रवाहाविषयीच्या सामान्य समजुतीच्या अगदी जवळ आहे.

मिशेल डॅनिनो या फ्रेंच आद्य-इतिहासकाराने सरस्वती नदीचा उगम आणि तिच्या गायब होण्याच्या संभाव्य कारणांचा सखोल अभ्यास केला आहे. ते म्हणतात की ऋग्वेदातील मंडल 7 नुसार, एके काळी सरस्वती ही खूप मोठी नदी होती, जी डोंगरातून खाली वाहत होती. ‘द लॉस्ट रिव्हर’ या संशोधनात डॅनिनो सांगतात की, त्यांना पावसाळी नदी घग्गर नदीची ओळख झाली. त्यांनी अनेक स्त्रोतांकडून माहिती मिळवली आणि नदीच्या मूळ प्रवाहाचा शोध घेतला. ऋग्वेदातील भौगोलिक क्रमानुसार ही नदी यमुना व सतलज यांच्यामध्ये असून ती पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत आली आहे.

नदीचे पात्र हडप्पापूर्व होते आणि 4000 ईसापूर्व मध्यभागी ते कोरडे होऊ लागले. इतर अनेक मोठ्या प्रमाणात भौगोलिक बदल देखील झाले आणि 2 हजार वर्षांपूर्वी झालेल्या या बदलांमुळे उलार-पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्यांपैकी एक नदी नाहीशी झाली आणि ही नदी सरस्वती होती.

राजस्थानच्या एका अधिकाऱ्याने या नदीच्या परिसरातील विविध विहिरींच्या पाण्याची रासायनिक चाचणी केल्यानंतर सर्वांच्या पाण्यात रसायन एकच असल्याचे आढळून आले. या नदीच्या परिसरात असलेल्या विहिरीपासून काही अंतरावर असलेल्या विहिरींच्या पाण्याचे रासायनिक विश्लेषण वेगळेच असल्याचे निष्पन्न झाले. केंद्रीय जल मंडळाच्या शास्त्रज्ञांना हरियाणा आणि पंजाब तसेच राजस्थानच्या जैसलमेर जिल्ह्यात सरस्वती नदीच्या अस्तित्वाचे ठोस पुरावे मिळाले आहेत.

सरस्वती दिसेनाशी झाली, तर दृषद्वतीच्या प्रवाहाची दिशा बदलली. या दृषद्वतीलाच आज यमुना म्हणतात. त्याचा इतिहास 4,000 वर्षांपूर्वीचा असल्याचे मानले जाते. भूकंपामुळे जमीन वर आल्यावर सरस्वतीचे अर्धे पाणी यमुनेत पडले, त्यामुळे सरस्वतीचे पाणी यमुनेसह यमुनेत वाहू लागले. म्हणूनच प्रयाग हे तीन नद्यांचे संगम मानले जाते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

राहुल गांधींना नरवणेंच्या पुस्तकावर बोलताना रोखल्याने, काँग्रेस आक्रमक
राहुल गांधींना नरवणेंच्या पुस्तकावर बोलताना रोखल्याने, काँग्रेस आक्रमक.
पालघरमध्ये पोलिसांचं कोंबिंग ऑपरेशन, तब्बल 200 पोलीस तैनात!
पालघरमध्ये पोलिसांचं कोंबिंग ऑपरेशन, तब्बल 200 पोलीस तैनात!.
जयंती नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर
जयंती नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर.
जरांगे पाटलांना जीवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ
जरांगे पाटलांना जीवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ.
रंगरंगोटी झाली, लूक बदलला, दालन सज्ज; फक्त प्रतिक्षा नव्या महापौरांची
रंगरंगोटी झाली, लूक बदलला, दालन सज्ज; फक्त प्रतिक्षा नव्या महापौरांची.
त्या दोन नेत्यांचे दोन्ही पाय भाजपमध्येच;राऊतांचा दोन नेत्यांवर निशाना
त्या दोन नेत्यांचे दोन्ही पाय भाजपमध्येच;राऊतांचा दोन नेत्यांवर निशाना.
लोकसभेत विरोधकांच्या गदारोळावर अध्यक्षांकडून तीव्र नाराजी व्यक्त
लोकसभेत विरोधकांच्या गदारोळावर अध्यक्षांकडून तीव्र नाराजी व्यक्त.
शरद पवार, जय आणि पार्थ पवार यांच्यात दीड तास बैठक सुरु
शरद पवार, जय आणि पार्थ पवार यांच्यात दीड तास बैठक सुरु.
अजित पवार यांच्या स्मारकाची जागा निश्चित होण्याची शक्यता
अजित पवार यांच्या स्मारकाची जागा निश्चित होण्याची शक्यता.
15 तास कार, टॅक्सी, बसून, पुणे–मुंबई महामार्गावरील वाहतूक अजूनही ठप्प
15 तास कार, टॅक्सी, बसून, पुणे–मुंबई महामार्गावरील वाहतूक अजूनही ठप्प.