AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वरुथिनी एकादशीला पडणार पंचकांची सावली, जाणून घ्या कोणत्या कर्मांनी मिळेल पुण्य

या वर्षी 13 एप्रिल रोजी वरुथिनी एकादशी पंचकाच्या प्रभावाखाली आहे. याच दिवशी पंचक काळही सुरू होतो. पंचक काळ शुभ कार्यांसाठी अशुभ मानला जातो. त्यामुळे नेमकी या एकादशीला कोणते कार्ये केल्याने पुजेचे फायदे मिळतील ते जाणून घेऊयात.

वरुथिनी एकादशीला पडणार पंचकांची सावली, जाणून घ्या कोणत्या कर्मांनी मिळेल पुण्य
Varuthini EkadashiImage Credit source: Tv9 Network
| Edited By: | Updated on: Apr 11, 2026 | 10:38 AM
Share

सनातन धर्मात एकादशीचा उपवास अत्यंत विशेष मानला जातो. हा उपवास विश्वाचे रक्षक असलेल्या भगवान विष्णूला समर्पित आहे. प्रत्येक महिन्यात दोन एकादशीचे उपवास असतात. पहिला महिन्याच्या कृष्ण पक्षात आणि दुसरा शुक्ल पक्षात येतो. भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हा उपवास सर्वात शुभ प्रसंग आहे. अशातच वैशाख महिन्याच्या कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला वरुथिनी एकादशी म्हणून ओळखले जाते.

तर या वरुथिनी एकादशीच्या दिवशी विहित विधींनुसार भगवान विष्णूचे उपवास आणि पूजा केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी उपवास आणि भगवान विष्णूची उपासना ही जाणूनबुजून किंवा नकळत केलेली सर्व पापे नष्ट करण्यासाठी केला जातो. मात्र यंदा ही वरुथिनी एकादशी पंचकाच्या प्रभावाखाली देखील येत आहे. वरुथिनी एकादशी १३ एप्रिल रोजी आहे. याच दिवशी पंचक काळ देखील सुरू होतो. तर हा पंचक काळ शुभ कार्यांसाठी अशुभ मानला जातो. म्हणून वरुथिनी एकादशीच्या दिवशी कार्ये करण्याचे फायदे आपण जाणून घेऊयात.

वरुथिनी एकादशी 2026 तारीख आणि उपवास वेळ

पंचांगानुसार वैशाख महिन्याच्या कृष्ण पक्षाची एकादशी तिथी 12 आणि 13 एप्रिल रोजी पहाटे 1 वाजून 16 मिनिटांनी सुरू होते. ते ही तिथी 13 आणि 14 एप्रिल रोजी पहाटे 1 वाजून 08 मिनिटांनी संपेल. त्यामुळे उदय तिथीनुसार वरुथिनी एकादशीचा उपवास 13 एप्रिल, 2026 रोजी पाळला जाईल. या एकादशीचा उपवास 14 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजून 5‍4 मिनिटांनी ते 8 वाजून 31 मिनिटांपर्यंत या वेळेत सोडता येईल.

पंचक म्हणजे काय?

हिंदू पंचांगानुसार नक्षत्राला घटक मानले गेले आहे. यामध्ये काही नक्षत्र शुभ तर काही अशुभ मानली जातात. ज्योतिष्यानुसार धनिष्ठा, शततारका, पूर्वा भाद्रपद, उत्तरा भाद्रपद आणि रेवती ही पाच नक्षत्र एकत्र आल्याने अशुभ मानले जाते. नक्षत्रांच्या या स्थितीला पंचक असे म्हटले जाते. तसेच या पंचक काळात लग्न, गृहप्रवेश, नवीन बांधकाम, मुंडण संस्कार यांसारखी शुभ कामे करणे वर्ज्य मानले जाते. ऐवढेच नाहीतर या काळात मृत्यू होणे अशुभ मानले जाते.

एप्रिल 2026 वरुथिनी एकादशीच्या दिवशी सुरू होणारा पंचक काळ

वैदिक पंचांगानुसार पंचक 13 एप्रिल रोजी पहाटे 03वाजून 4‍4 मिनिटांनी सुरू होत आहे. ते 17 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजून 02 मिनिटांनी संपेल. हे पंचक सोमवारपासून सुरू होत असल्याने याला राजपंचक म्हटले जाईल.

वरुथिनी एकादशीला या गोष्टी केल्याने आशीर्वाद मिळतील

पंचक काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही, परंतु या काळात पूजा आणि उपवास करण्यास मनाई नाही. म्हणून वरुथिनी एकादशीचा उपवास पूर्ण विधीपूर्वक पाळा आणि भगवान विष्णूची पूजा करा. या एकादशीला केलेल्या दान आणि पुण्यकर्मांचे फळ शाश्वत मिळते. म्हणून वरुथिनी एकादशीला आपल्या ऐपतीनुसार दान करा. पाण्याने भरलेले एक भांडे दान करा. गरीब आणि गरजू लोकांना भोजन द्या. त्यांना सुती कपडे दान करा. या सर्व कर्मांचे पुण्य अनेक पटींनी वाढेल.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
बारामती पोटनिवडणुकीत 22 अपक्षांमुळे लढत चुरशीची; सुनेत्रा पवार मैदानात
बारामती पोटनिवडणुकीत 22 अपक्षांमुळे लढत चुरशीची; सुनेत्रा पवार मैदानात.
रिश्ते मायने रखते है म्हणत सुप्रिया सुळेंचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा
रिश्ते मायने रखते है म्हणत सुप्रिया सुळेंचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा.
करुणा मुंडेंची बारामती पोटनिवडणुकीतून माघार नाहीच, म्हणाल्या, जनतेने..
करुणा मुंडेंची बारामती पोटनिवडणुकीतून माघार नाहीच, म्हणाल्या, जनतेने...
रुपाली चाकणकरांच्या बहिणीला पोलिसांची नोटीस, नेमकं कारण काय?
रुपाली चाकणकरांच्या बहिणीला पोलिसांची नोटीस, नेमकं कारण काय?.
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या विकासाला गती मिळणार
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या विकासाला गती मिळणार.
ऑपरेशन टायगर होणार की नाही? एकनाथ शिंदे यांनी जे सांगितलं ते...
ऑपरेशन टायगर होणार की नाही? एकनाथ शिंदे यांनी जे सांगितलं ते....
नाशिक आयटी कंपनीत लैंगिक शोषण आणि धर्मांतराचा प्रयत्न उघड
नाशिक आयटी कंपनीत लैंगिक शोषण आणि धर्मांतराचा प्रयत्न उघड.
हा राजकीय-सामाजिक अपराध; मुंबई निधी वाटपावरून राजकारण तापलं
हा राजकीय-सामाजिक अपराध; मुंबई निधी वाटपावरून राजकारण तापलं.
ठाकरे गटात फूट पडणार? ऑपरेशन टायगरवर राऊतांचा जोरदार पलटवार
ठाकरे गटात फूट पडणार? ऑपरेशन टायगरवर राऊतांचा जोरदार पलटवार.
महाराष्ट्रात ही पद्धत कधीच नव्हती, विजय वडेट्टीवार संतापले
महाराष्ट्रात ही पद्धत कधीच नव्हती, विजय वडेट्टीवार संतापले.